शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

वणा नदीवर होणार नवीन बंधाºयांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:24 IST

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वणा नदीवर तयार करण्यात येत असलेला बंधारा निकृष्ट कामामुळे नापास ठरला.

ठळक मुद्देजलसंकटावर होणार मात : आमदारांनी कसली कंबर

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वणा नदीवर तयार करण्यात येत असलेला बंधारा निकृष्ट कामामुळे नापास ठरला. आता नवीन बंधारा बांधण्याच्या दृष्टिकोनातून निधी आणण्यासाठी आ. समीर कुणावार यांनी कंबर कसल्याचे दिसते.शहराला बारमाही पाणी पुरवठा करण्यासाठी शहरालगत वाहणारी वणा नदी वरदान ठरली. हिंगणघाट येथे नदीचे पाणी अडविण्याची व्यवस्था नसल्याने उन्हाळ्यातील दोन महिने शहरात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. लाखो रुपये खर्च करुन धरणाचे पाणी विकत घेऊन पाणी पुरवठा करण्याची कसरत करावी लागते. पाणी अडविण्याची व्यवस्था नसल्याने हा निरर्थक खर्च होतो. सन २०१० मध्ये वणा नदीचे पाणी अडविण्यासाठी शासनस्तरावर ५ कोटींचा बंधारा मंजूर झाला. बंधाºयासाठी आलेला निधी खर्च होऊन गेला तरी बंधाºयाचे काम अर्धवट राहिले. उन्हाळ्यातील पाणी समस्या लक्षात घेता आ. कुणावर यांनी अर्धवट बंधाºयाचे काम पूर्ण करण्यासाठी शासनाकडे वाढीव निधीकरिता पाठपुरावा सुरू केला. दरम्यान अर्धवट बंधाºयाच्या घोळा संदर्भात शहरातील सामाजिक कार्यकर्ते उच्च न्यायालयात गेले. त्यानंतर घडलेल्या घडोमोडीतून या अर्धवट बांधलेल्या बंधाºयाची गुणवत्ता परीक्षण विभागाकडून चाचणी करण्यात आली. या चाचणीत ७२ नमून्यापैकी ४० नमूने निकृष्ट ठरविण्यात आले. त्यामुळे आ. कुणावार यांच्या वाढीव निधीच्या मागणीला ब्रेक लागला. दरम्यान हिंगणघाट शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी ६१ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. त्यातून शहरामध्ये ११ नवीन पाण्याच्या टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र, १८५ कि़मी. ची नवीन पाईप लाईन, नवीन पंपींग मशीन, असा सगळा मोठा डोलारा उभा राहणार असून त्याचे काम सुरू झाले आहे. शहरात पाच जलकुंभ असून उन्हाळ्यात नागरिकांना जलसंकटाला सामोरे जावे लागत होते. नवीन बंधारा नागरिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे.नवीन बंधारा होणारच : समीर कुणावारआमदार कुणावार यांच्याशी संपर्क साधून त्यांची बाजू जाणून घेतली असता उन्हाळ्यात शहरवासीयांना पाण्याची कमतरता जाणवू नये म्हणून आपण सध्या अपूर्ण व्यवस्थेत असणाºया बंधाºयावर वाढीव निधी मिळून तो बंधारा पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी केली होती. शासनाकडून यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. गुणवत्ता चाचणीत या बंधाºयाचे झालेले काम निकृष्ट प्रतीचे निघाल्याने आता या बंधाºयाच्या कामासाठी वाढीव निधी मिळूच शकत नाही. अशातच अमृत योजनेचे महत्त्वाकांक्षी काम पूर्ण झाल्यानंतर पाणी संचय क्षमता आतापेक्षा खूप जास्त वाढणार आहे. परंतु, अडतच नाही तर शहरात आणणार कोठून, अशी सध्याची स्थिती आहे. याची जाणीव आपण मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना दिली. त्यानुसार मंत्रालयात नवीन बंधारा बांधण्याच्या दृष्टीकोनातून तीन बैठकी झाल्या. लवकरच या कामासाठी निधी उपलब्ध होईल, असे आ. समीर कुणावार यांनी सांगितले.