शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

वणा नदीवर होणार नवीन बंधाºयांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:24 IST

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वणा नदीवर तयार करण्यात येत असलेला बंधारा निकृष्ट कामामुळे नापास ठरला.

ठळक मुद्देजलसंकटावर होणार मात : आमदारांनी कसली कंबर

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वणा नदीवर तयार करण्यात येत असलेला बंधारा निकृष्ट कामामुळे नापास ठरला. आता नवीन बंधारा बांधण्याच्या दृष्टिकोनातून निधी आणण्यासाठी आ. समीर कुणावार यांनी कंबर कसल्याचे दिसते.शहराला बारमाही पाणी पुरवठा करण्यासाठी शहरालगत वाहणारी वणा नदी वरदान ठरली. हिंगणघाट येथे नदीचे पाणी अडविण्याची व्यवस्था नसल्याने उन्हाळ्यातील दोन महिने शहरात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. लाखो रुपये खर्च करुन धरणाचे पाणी विकत घेऊन पाणी पुरवठा करण्याची कसरत करावी लागते. पाणी अडविण्याची व्यवस्था नसल्याने हा निरर्थक खर्च होतो. सन २०१० मध्ये वणा नदीचे पाणी अडविण्यासाठी शासनस्तरावर ५ कोटींचा बंधारा मंजूर झाला. बंधाºयासाठी आलेला निधी खर्च होऊन गेला तरी बंधाºयाचे काम अर्धवट राहिले. उन्हाळ्यातील पाणी समस्या लक्षात घेता आ. कुणावर यांनी अर्धवट बंधाºयाचे काम पूर्ण करण्यासाठी शासनाकडे वाढीव निधीकरिता पाठपुरावा सुरू केला. दरम्यान अर्धवट बंधाºयाच्या घोळा संदर्भात शहरातील सामाजिक कार्यकर्ते उच्च न्यायालयात गेले. त्यानंतर घडलेल्या घडोमोडीतून या अर्धवट बांधलेल्या बंधाºयाची गुणवत्ता परीक्षण विभागाकडून चाचणी करण्यात आली. या चाचणीत ७२ नमून्यापैकी ४० नमूने निकृष्ट ठरविण्यात आले. त्यामुळे आ. कुणावार यांच्या वाढीव निधीच्या मागणीला ब्रेक लागला. दरम्यान हिंगणघाट शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी ६१ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. त्यातून शहरामध्ये ११ नवीन पाण्याच्या टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र, १८५ कि़मी. ची नवीन पाईप लाईन, नवीन पंपींग मशीन, असा सगळा मोठा डोलारा उभा राहणार असून त्याचे काम सुरू झाले आहे. शहरात पाच जलकुंभ असून उन्हाळ्यात नागरिकांना जलसंकटाला सामोरे जावे लागत होते. नवीन बंधारा नागरिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे.नवीन बंधारा होणारच : समीर कुणावारआमदार कुणावार यांच्याशी संपर्क साधून त्यांची बाजू जाणून घेतली असता उन्हाळ्यात शहरवासीयांना पाण्याची कमतरता जाणवू नये म्हणून आपण सध्या अपूर्ण व्यवस्थेत असणाºया बंधाºयावर वाढीव निधी मिळून तो बंधारा पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी केली होती. शासनाकडून यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. गुणवत्ता चाचणीत या बंधाºयाचे झालेले काम निकृष्ट प्रतीचे निघाल्याने आता या बंधाºयाच्या कामासाठी वाढीव निधी मिळूच शकत नाही. अशातच अमृत योजनेचे महत्त्वाकांक्षी काम पूर्ण झाल्यानंतर पाणी संचय क्षमता आतापेक्षा खूप जास्त वाढणार आहे. परंतु, अडतच नाही तर शहरात आणणार कोठून, अशी सध्याची स्थिती आहे. याची जाणीव आपण मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना दिली. त्यानुसार मंत्रालयात नवीन बंधारा बांधण्याच्या दृष्टीकोनातून तीन बैठकी झाल्या. लवकरच या कामासाठी निधी उपलब्ध होईल, असे आ. समीर कुणावार यांनी सांगितले.