शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

वणा नदीवर होणार नवीन बंधाºयांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:24 IST

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वणा नदीवर तयार करण्यात येत असलेला बंधारा निकृष्ट कामामुळे नापास ठरला.

ठळक मुद्देजलसंकटावर होणार मात : आमदारांनी कसली कंबर

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वणा नदीवर तयार करण्यात येत असलेला बंधारा निकृष्ट कामामुळे नापास ठरला. आता नवीन बंधारा बांधण्याच्या दृष्टिकोनातून निधी आणण्यासाठी आ. समीर कुणावार यांनी कंबर कसल्याचे दिसते.शहराला बारमाही पाणी पुरवठा करण्यासाठी शहरालगत वाहणारी वणा नदी वरदान ठरली. हिंगणघाट येथे नदीचे पाणी अडविण्याची व्यवस्था नसल्याने उन्हाळ्यातील दोन महिने शहरात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. लाखो रुपये खर्च करुन धरणाचे पाणी विकत घेऊन पाणी पुरवठा करण्याची कसरत करावी लागते. पाणी अडविण्याची व्यवस्था नसल्याने हा निरर्थक खर्च होतो. सन २०१० मध्ये वणा नदीचे पाणी अडविण्यासाठी शासनस्तरावर ५ कोटींचा बंधारा मंजूर झाला. बंधाºयासाठी आलेला निधी खर्च होऊन गेला तरी बंधाºयाचे काम अर्धवट राहिले. उन्हाळ्यातील पाणी समस्या लक्षात घेता आ. कुणावर यांनी अर्धवट बंधाºयाचे काम पूर्ण करण्यासाठी शासनाकडे वाढीव निधीकरिता पाठपुरावा सुरू केला. दरम्यान अर्धवट बंधाºयाच्या घोळा संदर्भात शहरातील सामाजिक कार्यकर्ते उच्च न्यायालयात गेले. त्यानंतर घडलेल्या घडोमोडीतून या अर्धवट बांधलेल्या बंधाºयाची गुणवत्ता परीक्षण विभागाकडून चाचणी करण्यात आली. या चाचणीत ७२ नमून्यापैकी ४० नमूने निकृष्ट ठरविण्यात आले. त्यामुळे आ. कुणावार यांच्या वाढीव निधीच्या मागणीला ब्रेक लागला. दरम्यान हिंगणघाट शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी ६१ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. त्यातून शहरामध्ये ११ नवीन पाण्याच्या टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र, १८५ कि़मी. ची नवीन पाईप लाईन, नवीन पंपींग मशीन, असा सगळा मोठा डोलारा उभा राहणार असून त्याचे काम सुरू झाले आहे. शहरात पाच जलकुंभ असून उन्हाळ्यात नागरिकांना जलसंकटाला सामोरे जावे लागत होते. नवीन बंधारा नागरिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे.नवीन बंधारा होणारच : समीर कुणावारआमदार कुणावार यांच्याशी संपर्क साधून त्यांची बाजू जाणून घेतली असता उन्हाळ्यात शहरवासीयांना पाण्याची कमतरता जाणवू नये म्हणून आपण सध्या अपूर्ण व्यवस्थेत असणाºया बंधाºयावर वाढीव निधी मिळून तो बंधारा पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी केली होती. शासनाकडून यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. गुणवत्ता चाचणीत या बंधाºयाचे झालेले काम निकृष्ट प्रतीचे निघाल्याने आता या बंधाºयाच्या कामासाठी वाढीव निधी मिळूच शकत नाही. अशातच अमृत योजनेचे महत्त्वाकांक्षी काम पूर्ण झाल्यानंतर पाणी संचय क्षमता आतापेक्षा खूप जास्त वाढणार आहे. परंतु, अडतच नाही तर शहरात आणणार कोठून, अशी सध्याची स्थिती आहे. याची जाणीव आपण मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना दिली. त्यानुसार मंत्रालयात नवीन बंधारा बांधण्याच्या दृष्टीकोनातून तीन बैठकी झाल्या. लवकरच या कामासाठी निधी उपलब्ध होईल, असे आ. समीर कुणावार यांनी सांगितले.