शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

दोन एकरांत घेतले तब्बल १८ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 09:22 IST

Wardha news आर्वी तालुक्यातील दौलतपूर येथील युवा शेतकरी सुरेश वसंत कदम याने जानेवारीच्या ३१ तारखेला सोयाबीन लावले आणि केवळ दोन एकरांत सोयाबीनचे १८ क्विंटल उत्पादन घेतले.

ठळक मुद्देसोयाबीनच्या भरघोस उत्पन्नामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांना या बियाण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सुरेश कदम यांनी सोयाबीन मार्केटमध्ये न नेता शेतकरी बांधवांना बियाण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे कृषी अधिकारी व अनेक शेतकऱ्यांनी कौतु

वर्धा  : मागील हंगामात नापिकी झाल्याने त्रस्त शेतकऱ्याने खचून न जात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दोन एकरात तब्बल १८ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेतले असून, युवा शेतकऱ्याच्या शेतातील पीक पाहण्यासाठी कृषितज्ज्ञ अधिकारी आणि शेतकऱ्यांनी शेतीची पाहणी करीत भेट दिली.

उन्हाळी सोयाबीनचे उत्पन्न शेतकरी अल्प घेतात. कारण त्यात उत्पादन न होण्याची भीती असते. सर्व खर्च वाया जात असल्याने शेतकरी पावसाळ्यातच जून, जुलै महिन्यांत नगदी पीक म्हणून सोयाबीनचे उत्पन्न घेतात. मात्र, यावर्षी कापूस, सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांची चांगलीच वाताहात केली होती. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता. आर्वी तालुक्यातील दौलतपूर येथील युवा शेतकरी सुरेश वसंत कदम याने जानेवारीच्या ३१ तारखेला सोयाबीन लावले आणि केवळ दोन एकरांत सोयाबीनचे १८ क्विंटल उत्पादन घेतले. परिसरात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला भेट देत सोयाबीन पेरणीसाठी आम्हाला द्या, असा तगादा लावला.

सुरेश कदम असे यांची दौलतपूर शिवारात सहा एकर शेती आहे. त्यात त्यांनी उन्हाळी सोयाबीन लावले होते. त्यापूर्वी कापूस आणि सोयाबीन पिकाने दगा दिल्याने या शेतकऱ्याचा खर्चही निघाला नव्हता त्यामुळे ते चिंताग्रस्त होते. अखेर त्यांनी उन्हाळी सोयाबीन पीक घेण्याचा निर्णय घेतला. शेतातील पऱ्हाटी उपटून शेत स्वच्छ केले. दोन एकरांत गायत्री सीड्स आणि चार एकरांत दोन पुन्हा वेगवेगळ्या सोयाबीन व्हरायटीची पेरणी केली. यासाठी त्यांना एकरी दहा हजारांचा खर्च आला. मात्र चार एकरांत किडीचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन गेले. परंतु दोन एकरांत चांगले सोयाबीन झाल्याने त्यांना तारले.

सहा एकर सोयाबीनचे तीन प्लॉट लावले. तीन वेगवेगळ्या कंपनीचे सोयाबीन लावले. स्प्रिंकलरने त्यांना सातवेळा पाणी दिले. चारवेळा रासायनिक खते व फवारणी केली. कृषितज्ज्ञांनी पाहणी करून मार्गदर्शन केले.

गायत्री २०१९ आणि २०३४ या सोयाबीनने दोन एकरांत १८ क्विंटल उत्पादन दिले, उर्वरित चार एकरांत चार क्विंटल सोयाबीन झाले आहे. हे सोयाबीन बाजारात न विकता परिसरातील शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे बियाणासाठी देणार आहे.

सुरेश वसंत कदम, युवा शेतकरी, देऊरवाडा

 

............................

टॅग्स :agricultureशेती