शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

दोन एकरांत घेतले तब्बल १८ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 09:22 IST

Wardha news आर्वी तालुक्यातील दौलतपूर येथील युवा शेतकरी सुरेश वसंत कदम याने जानेवारीच्या ३१ तारखेला सोयाबीन लावले आणि केवळ दोन एकरांत सोयाबीनचे १८ क्विंटल उत्पादन घेतले.

ठळक मुद्देसोयाबीनच्या भरघोस उत्पन्नामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांना या बियाण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सुरेश कदम यांनी सोयाबीन मार्केटमध्ये न नेता शेतकरी बांधवांना बियाण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे कृषी अधिकारी व अनेक शेतकऱ्यांनी कौतु

वर्धा  : मागील हंगामात नापिकी झाल्याने त्रस्त शेतकऱ्याने खचून न जात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दोन एकरात तब्बल १८ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेतले असून, युवा शेतकऱ्याच्या शेतातील पीक पाहण्यासाठी कृषितज्ज्ञ अधिकारी आणि शेतकऱ्यांनी शेतीची पाहणी करीत भेट दिली.

उन्हाळी सोयाबीनचे उत्पन्न शेतकरी अल्प घेतात. कारण त्यात उत्पादन न होण्याची भीती असते. सर्व खर्च वाया जात असल्याने शेतकरी पावसाळ्यातच जून, जुलै महिन्यांत नगदी पीक म्हणून सोयाबीनचे उत्पन्न घेतात. मात्र, यावर्षी कापूस, सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांची चांगलीच वाताहात केली होती. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता. आर्वी तालुक्यातील दौलतपूर येथील युवा शेतकरी सुरेश वसंत कदम याने जानेवारीच्या ३१ तारखेला सोयाबीन लावले आणि केवळ दोन एकरांत सोयाबीनचे १८ क्विंटल उत्पादन घेतले. परिसरात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला भेट देत सोयाबीन पेरणीसाठी आम्हाला द्या, असा तगादा लावला.

सुरेश कदम असे यांची दौलतपूर शिवारात सहा एकर शेती आहे. त्यात त्यांनी उन्हाळी सोयाबीन लावले होते. त्यापूर्वी कापूस आणि सोयाबीन पिकाने दगा दिल्याने या शेतकऱ्याचा खर्चही निघाला नव्हता त्यामुळे ते चिंताग्रस्त होते. अखेर त्यांनी उन्हाळी सोयाबीन पीक घेण्याचा निर्णय घेतला. शेतातील पऱ्हाटी उपटून शेत स्वच्छ केले. दोन एकरांत गायत्री सीड्स आणि चार एकरांत दोन पुन्हा वेगवेगळ्या सोयाबीन व्हरायटीची पेरणी केली. यासाठी त्यांना एकरी दहा हजारांचा खर्च आला. मात्र चार एकरांत किडीचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन गेले. परंतु दोन एकरांत चांगले सोयाबीन झाल्याने त्यांना तारले.

सहा एकर सोयाबीनचे तीन प्लॉट लावले. तीन वेगवेगळ्या कंपनीचे सोयाबीन लावले. स्प्रिंकलरने त्यांना सातवेळा पाणी दिले. चारवेळा रासायनिक खते व फवारणी केली. कृषितज्ज्ञांनी पाहणी करून मार्गदर्शन केले.

गायत्री २०१९ आणि २०३४ या सोयाबीनने दोन एकरांत १८ क्विंटल उत्पादन दिले, उर्वरित चार एकरांत चार क्विंटल सोयाबीन झाले आहे. हे सोयाबीन बाजारात न विकता परिसरातील शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे बियाणासाठी देणार आहे.

सुरेश वसंत कदम, युवा शेतकरी, देऊरवाडा

 

............................

टॅग्स :agricultureशेती