शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

दोन एकरांत घेतले तब्बल १८ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 09:22 IST

Wardha news आर्वी तालुक्यातील दौलतपूर येथील युवा शेतकरी सुरेश वसंत कदम याने जानेवारीच्या ३१ तारखेला सोयाबीन लावले आणि केवळ दोन एकरांत सोयाबीनचे १८ क्विंटल उत्पादन घेतले.

ठळक मुद्देसोयाबीनच्या भरघोस उत्पन्नामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांना या बियाण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सुरेश कदम यांनी सोयाबीन मार्केटमध्ये न नेता शेतकरी बांधवांना बियाण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे कृषी अधिकारी व अनेक शेतकऱ्यांनी कौतु

वर्धा  : मागील हंगामात नापिकी झाल्याने त्रस्त शेतकऱ्याने खचून न जात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दोन एकरात तब्बल १८ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेतले असून, युवा शेतकऱ्याच्या शेतातील पीक पाहण्यासाठी कृषितज्ज्ञ अधिकारी आणि शेतकऱ्यांनी शेतीची पाहणी करीत भेट दिली.

उन्हाळी सोयाबीनचे उत्पन्न शेतकरी अल्प घेतात. कारण त्यात उत्पादन न होण्याची भीती असते. सर्व खर्च वाया जात असल्याने शेतकरी पावसाळ्यातच जून, जुलै महिन्यांत नगदी पीक म्हणून सोयाबीनचे उत्पन्न घेतात. मात्र, यावर्षी कापूस, सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांची चांगलीच वाताहात केली होती. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता. आर्वी तालुक्यातील दौलतपूर येथील युवा शेतकरी सुरेश वसंत कदम याने जानेवारीच्या ३१ तारखेला सोयाबीन लावले आणि केवळ दोन एकरांत सोयाबीनचे १८ क्विंटल उत्पादन घेतले. परिसरात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला भेट देत सोयाबीन पेरणीसाठी आम्हाला द्या, असा तगादा लावला.

सुरेश कदम असे यांची दौलतपूर शिवारात सहा एकर शेती आहे. त्यात त्यांनी उन्हाळी सोयाबीन लावले होते. त्यापूर्वी कापूस आणि सोयाबीन पिकाने दगा दिल्याने या शेतकऱ्याचा खर्चही निघाला नव्हता त्यामुळे ते चिंताग्रस्त होते. अखेर त्यांनी उन्हाळी सोयाबीन पीक घेण्याचा निर्णय घेतला. शेतातील पऱ्हाटी उपटून शेत स्वच्छ केले. दोन एकरांत गायत्री सीड्स आणि चार एकरांत दोन पुन्हा वेगवेगळ्या सोयाबीन व्हरायटीची पेरणी केली. यासाठी त्यांना एकरी दहा हजारांचा खर्च आला. मात्र चार एकरांत किडीचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन गेले. परंतु दोन एकरांत चांगले सोयाबीन झाल्याने त्यांना तारले.

सहा एकर सोयाबीनचे तीन प्लॉट लावले. तीन वेगवेगळ्या कंपनीचे सोयाबीन लावले. स्प्रिंकलरने त्यांना सातवेळा पाणी दिले. चारवेळा रासायनिक खते व फवारणी केली. कृषितज्ज्ञांनी पाहणी करून मार्गदर्शन केले.

गायत्री २०१९ आणि २०३४ या सोयाबीनने दोन एकरांत १८ क्विंटल उत्पादन दिले, उर्वरित चार एकरांत चार क्विंटल सोयाबीन झाले आहे. हे सोयाबीन बाजारात न विकता परिसरातील शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे बियाणासाठी देणार आहे.

सुरेश वसंत कदम, युवा शेतकरी, देऊरवाडा

 

............................

टॅग्स :agricultureशेती