शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

समृद्धी महामार्गाच्या कामाने वाढविल्या शेतकऱ्यांच्या अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 16:23 IST

Wardha News Agriculture नागपूर-मुंबई महामार्गाकरिता गौणखनिजाची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. तसेच उडणाऱ्या धुळीने उत्पादनातही घट झाल्याने शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे अफकॉन कंपनीच्या मनमर्जी कारभाराचा पिकांना फटकागौण खनिजाचे उत्खनन सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर-मुंबई महामार्गाचे काम अ‍ॅफकॉन्स कपंनीच्या माध्यमातून केले जात असून कंत्राटदाराच्या मनमर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या महामार्गाकरिता गौणखनिजाची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. तसेच उडणाऱ्या धुळीने उत्पादनातही घट झाल्याने शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील सेलू, वर्धा व आर्वी या तीन तालुक्यातील ५७९. ४६४ हेक्टरमधून समृद्धी महामार्ग जात असून याकरिता जमिनी संपदित केल्या आहेत. या महामार्गाचा कंत्राट असलेल्या अफकॉन्स कंपनीने सुरुवातीपासून अवैध उत्खननासह अवैध वाहतूक सुरू केल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अफकॉन्स कंपनीविरुद्ध अवैध उत्खननप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. तरीही कंपनीच्या कामकाजात सुधारणा झालेली नसल्याने महामार्गालगतच्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

आर्वी तालुक्यातील सोरटा-विरूळ भागात महामार्गाचे काम सुरू असून रस्त्यावरुन दिवसरात्र जडवाहतूक सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची वाट लागली असून उडणाऱ्या धुळीने पिकांचेही नुकसान होत असल्याने विरूळ, सोरटा, रसुलाबाद, पिंपळगाव, निजामपूर, टाकळी, मारडा, सालफळ तर वर्धा तालुक्यातील पिपरी, गणेशपूर, पांढरकवडा या गावांतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आधीच निसर्गकोपाने संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे अ‍ॅफकॉन्सच्या कामाने आणखीच कंबरडे मोडले आहे. त्यामुळे अ‍ॅफकॉन्सच्या मनमर्जी कामाला ब्रेक लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पोलीस, महसूल विभागाचीही साथसमृद्धी महामार्गाकरिता होणारी अवजड वाहतूक शेतकऱ्यांसह गावकऱ्यांकरिता धोक्याची ठरत आहे. दिवसरात्र होणाऱ्या या वाहतुकीने मोठे नुकसान होत असल्याने याबाबत शेतकऱ्यांनी पोलिसांकडे किंवा महसूल विभागाकडे तक्रार केली तर कारवाई न करता शेतकऱ्यांनाच दमदाटी केली जाते. त्यामुळे कंत्राटदार कंपनीचा मनमर्जी कारभार सुरू असून शेतकऱ्यांची वाट लावली जात असल्याचा आरोप होत आहे.

संतप्त शेतकऱ्यांनी संरक्षण भिंतीचे काम रोखलेआर्वी तालुक्यातील पिंपळगाव, विरुळ, निजामपूर, टाकळी, रसुलाबाद येथील शेतकऱ्यांच्या जमिनी समृद्धी महामार्गाकरिता संपादित करण्यात आल्या असून काहींचे संपादन शिल्लक राहिले आहे. असे असताना समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराने संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू केल्यामुळे शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाली असती. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी हे बांधकाम रोखले असून जमिनीचे तत्काळ संपादन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :highwayमहामार्गSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग