शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

थातूरमातूर डागडुजीमुळे वाट ठरतेय अडचणीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:00 IST

वर्ष-दीड वर्षापूर्वी भूमिगत गटार योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली. याकरिता १०२ कोटी रुपये निधी मंजूर झाला. नगरपालिकेकडून नियोजनाच्या अभावात हे काम सुरू करण्यात आले. सुरुवातीपासूनच हे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले. मलनिस्सारण वाहिनीकरिता अनेकांना घरी पूर्वीच असलेली सुस्थितीतील वाहिनी फोडावी लागली.

ठळक मुद्देभूमिगत गटार योजना : पावसामुळे सर्वत्र चिखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नगरपालिकेच्या वतीने मागील वर्षभरापासून शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटार आणि अमृत योजनेने नागरिकांच्या अडचणीत चांगलीच भर घातली आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी थातूरमातूर डागडुजी केल्याने रस्तञयांवर चिखल असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. परिणामी, नागरिकांची वाट बिकट झाली आहे.वर्ष-दीड वर्षापूर्वी भूमिगत गटार योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली. याकरिता १०२ कोटी रुपये निधी मंजूर झाला. नगरपालिकेकडून नियोजनाच्या अभावात हे काम सुरू करण्यात आले. सुरुवातीपासूनच हे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले. मलनिस्सारण वाहिनीकरिता अनेकांना घरी पूर्वीच असलेली सुस्थितीतील वाहिनी फोडावी लागली. यात नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. याला अनेक ठिकाणी विरोध होऊनही हे काम सुरूच ठेवण्यात आले. याकरिता सुस्थितीतील सिमेंट रस्तेदेखील फोडण्यात आले. कार्यारंभ आदेशात योजनेचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर रस्त्यांची व्यवस्थित डागडुजी करण्याबाबत स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, फोडकामानंतर नालीप्रमाणे खोदलेले खड्डे नीट बुजविण्यात आले नाही. यात कंत्राटदाराकडून कमालीचा हलगर्जीपणा करण्यात आला. कित्येक ठिकाणी रस्ते व्हायब्रेटरच्या सहाय्याने फोडण्यात आले. मात्र, अद्याप काम करण्यात आले नाही. लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यांपासून सर्व काही ठप्प असल्याने हे बांधकामही सद्यस्थितीत रखडलेले आहे. लॉकडाऊनपूर्वी खोदकामाची थातूरमातूर डागडुजी केल्याने धंतोली, मालगुजारीपुरा, हवालदारपुरा, गोंड प्लॉट, साईनगर, प्रतापनगर व अन्य भागात रस्त्यावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य आहे. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसांत मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. मात्र, पालिका प्रशासनाला नागरिकांच्या त्रासाशी काहीही देणे-घेणे नाही. योजनेचे काम अधांतरीच असताना ती यशस्वी ठरणार की नाही, नगर प्रशासनाने कोट्यवधींचा केलेला खर्चही व्यर्थ ठरेल का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.रेल्वेस्थानक मार्गावरील चेंबर खचलेभूमिगत गटार योजनेकरिता नालीप्रमाणे खोदकाम करून जलवाहिनी अंथरल्यानंतर सिमेंटचे चेंबर तयार करण्यात आले. बांधकामानंतर अल्पावधीतच चेंबरला अनेक ठिकाणी तडे गेले. तर रेल्वेस्थानक मार्गावरील चेंबर पूर्णत: खचले असून त्यातील सळाखी उघड्या पडल्या आहेत. मात्र, याकडे कुणाचेही लक्ष नाही. या योजनेची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा