शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

थातूरमातूर डागडुजीमुळे वाट ठरतेय अडचणीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:00 IST

वर्ष-दीड वर्षापूर्वी भूमिगत गटार योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली. याकरिता १०२ कोटी रुपये निधी मंजूर झाला. नगरपालिकेकडून नियोजनाच्या अभावात हे काम सुरू करण्यात आले. सुरुवातीपासूनच हे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले. मलनिस्सारण वाहिनीकरिता अनेकांना घरी पूर्वीच असलेली सुस्थितीतील वाहिनी फोडावी लागली.

ठळक मुद्देभूमिगत गटार योजना : पावसामुळे सर्वत्र चिखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नगरपालिकेच्या वतीने मागील वर्षभरापासून शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटार आणि अमृत योजनेने नागरिकांच्या अडचणीत चांगलीच भर घातली आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी थातूरमातूर डागडुजी केल्याने रस्तञयांवर चिखल असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. परिणामी, नागरिकांची वाट बिकट झाली आहे.वर्ष-दीड वर्षापूर्वी भूमिगत गटार योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली. याकरिता १०२ कोटी रुपये निधी मंजूर झाला. नगरपालिकेकडून नियोजनाच्या अभावात हे काम सुरू करण्यात आले. सुरुवातीपासूनच हे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले. मलनिस्सारण वाहिनीकरिता अनेकांना घरी पूर्वीच असलेली सुस्थितीतील वाहिनी फोडावी लागली. यात नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. याला अनेक ठिकाणी विरोध होऊनही हे काम सुरूच ठेवण्यात आले. याकरिता सुस्थितीतील सिमेंट रस्तेदेखील फोडण्यात आले. कार्यारंभ आदेशात योजनेचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर रस्त्यांची व्यवस्थित डागडुजी करण्याबाबत स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, फोडकामानंतर नालीप्रमाणे खोदलेले खड्डे नीट बुजविण्यात आले नाही. यात कंत्राटदाराकडून कमालीचा हलगर्जीपणा करण्यात आला. कित्येक ठिकाणी रस्ते व्हायब्रेटरच्या सहाय्याने फोडण्यात आले. मात्र, अद्याप काम करण्यात आले नाही. लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यांपासून सर्व काही ठप्प असल्याने हे बांधकामही सद्यस्थितीत रखडलेले आहे. लॉकडाऊनपूर्वी खोदकामाची थातूरमातूर डागडुजी केल्याने धंतोली, मालगुजारीपुरा, हवालदारपुरा, गोंड प्लॉट, साईनगर, प्रतापनगर व अन्य भागात रस्त्यावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य आहे. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसांत मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. मात्र, पालिका प्रशासनाला नागरिकांच्या त्रासाशी काहीही देणे-घेणे नाही. योजनेचे काम अधांतरीच असताना ती यशस्वी ठरणार की नाही, नगर प्रशासनाने कोट्यवधींचा केलेला खर्चही व्यर्थ ठरेल का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.रेल्वेस्थानक मार्गावरील चेंबर खचलेभूमिगत गटार योजनेकरिता नालीप्रमाणे खोदकाम करून जलवाहिनी अंथरल्यानंतर सिमेंटचे चेंबर तयार करण्यात आले. बांधकामानंतर अल्पावधीतच चेंबरला अनेक ठिकाणी तडे गेले. तर रेल्वेस्थानक मार्गावरील चेंबर पूर्णत: खचले असून त्यातील सळाखी उघड्या पडल्या आहेत. मात्र, याकडे कुणाचेही लक्ष नाही. या योजनेची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा