शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

नियोजनशून्यतेमुळे सिंचनाची समस्या

By admin | Updated: February 6, 2016 02:20 IST

लोअर वर्धा मुख्य कालव्याच्या जागेचे चुकीच्या पद्धतीने सर्व्हेक्षण करण्यात आल्यामुळे या परिसरातील ईसापूर, एकपाळा, काजळसरा, वाटखेडा, टाकळी खोडे आदी ...

देवळी : लोअर वर्धा मुख्य कालव्याच्या जागेचे चुकीच्या पद्धतीने सर्व्हेक्षण करण्यात आल्यामुळे या परिसरातील ईसापूर, एकपाळा, काजळसरा, वाटखेडा, टाकळी खोडे आदी गावातील दोन हजार हेक्टर शेतजमीन सिंचनापासून वंचित आहे. जमिनीचा चढाव असल्यामुळे या भागात मुख्य कालवा किंवा उपकालवा नेणे शक्य नसल्याचे प्रकल्पाचे अधिकारी सांगत आहे. परंतु कालव्याची ही जागा चुकीच्या पद्धतीने तसेच कुणाचेतरी दबावात येवून निवडण्यात आल्यामुळे हा गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. लोअर वर्धा प्रकल्पांतर्गत संपूर्ण देवळी तालुका सिंचनाखाली आला असल्याचा गाजावाजा होत आहे. शेतापर्यंत सिंचन व्यवस्था करणारी पाटचऱ्यांची कामे पूर्णत्त्वास येण्याआधीच लोअर वर्धाचे पाणी शेतकऱ्यांना दिले जात आहे. परंतु नितांत गरज असलेल्या भागात कालव्याचे पाणी नाही तर दुसरीकडे गरज नसलेल्या काळीच्या शेत परिसरात मुबलक पाणी उपलब्ध असल्याची शोकांतिका आहे.एकपाळा शिवारातील लोअर वर्धाचा मुख्य कालवा रमेश मरघाडे, चकोले, विष्णु वैद्य व इतर कास्तकारांच्या शेतजमिनी असलेल्या खोलगट भागातून घेण्यात आला. हाच कालवा डॉ. चोरे, वाटखेडा चौकी, एकपाळा व वाटखेडा शिवार अश्या जमिनीच्या चढावाच्या बाजूने घेतला असता तर या परिसरातील संपूर्ण शेती सिंचनाखाली आली असती. आधी याच पद्धतीचे सर्व्हेक्षण व नियोजन करण्यात आले होते. परंतु नंतर कुणाच्यातरी दबावात येऊन लोअर वर्धाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी हा निर्णय फिरविल्याचे बोलले जात आहे. ज्या भागात १०० फुट जमिनीत खोल खोदून सुद्धा विहिरींना पाणी लागत नाही अश्याच ठिकाणी कालव्याच्या पाण्याचे नियोजन नसल्यामुळे शेतकरी हतबल होत आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांची नियोजनशुन्यता तसेच बेजबाबदारवृत्ती या प्रकारला कारणीभूत आहे. या परिसरातील कास्तकारांनी खा. तडस, आ. कांबळे तसेच विभागाच्या संबंधित मंत्र्यांना निवेदने देवून नवीन कालव्याची मागणी केली आहे.(प्रतिनिधी)