शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

नियोजनशून्यतेमुळे सिंचनाची समस्या

By admin | Updated: February 6, 2016 02:20 IST

लोअर वर्धा मुख्य कालव्याच्या जागेचे चुकीच्या पद्धतीने सर्व्हेक्षण करण्यात आल्यामुळे या परिसरातील ईसापूर, एकपाळा, काजळसरा, वाटखेडा, टाकळी खोडे आदी ...

देवळी : लोअर वर्धा मुख्य कालव्याच्या जागेचे चुकीच्या पद्धतीने सर्व्हेक्षण करण्यात आल्यामुळे या परिसरातील ईसापूर, एकपाळा, काजळसरा, वाटखेडा, टाकळी खोडे आदी गावातील दोन हजार हेक्टर शेतजमीन सिंचनापासून वंचित आहे. जमिनीचा चढाव असल्यामुळे या भागात मुख्य कालवा किंवा उपकालवा नेणे शक्य नसल्याचे प्रकल्पाचे अधिकारी सांगत आहे. परंतु कालव्याची ही जागा चुकीच्या पद्धतीने तसेच कुणाचेतरी दबावात येवून निवडण्यात आल्यामुळे हा गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. लोअर वर्धा प्रकल्पांतर्गत संपूर्ण देवळी तालुका सिंचनाखाली आला असल्याचा गाजावाजा होत आहे. शेतापर्यंत सिंचन व्यवस्था करणारी पाटचऱ्यांची कामे पूर्णत्त्वास येण्याआधीच लोअर वर्धाचे पाणी शेतकऱ्यांना दिले जात आहे. परंतु नितांत गरज असलेल्या भागात कालव्याचे पाणी नाही तर दुसरीकडे गरज नसलेल्या काळीच्या शेत परिसरात मुबलक पाणी उपलब्ध असल्याची शोकांतिका आहे.एकपाळा शिवारातील लोअर वर्धाचा मुख्य कालवा रमेश मरघाडे, चकोले, विष्णु वैद्य व इतर कास्तकारांच्या शेतजमिनी असलेल्या खोलगट भागातून घेण्यात आला. हाच कालवा डॉ. चोरे, वाटखेडा चौकी, एकपाळा व वाटखेडा शिवार अश्या जमिनीच्या चढावाच्या बाजूने घेतला असता तर या परिसरातील संपूर्ण शेती सिंचनाखाली आली असती. आधी याच पद्धतीचे सर्व्हेक्षण व नियोजन करण्यात आले होते. परंतु नंतर कुणाच्यातरी दबावात येऊन लोअर वर्धाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी हा निर्णय फिरविल्याचे बोलले जात आहे. ज्या भागात १०० फुट जमिनीत खोल खोदून सुद्धा विहिरींना पाणी लागत नाही अश्याच ठिकाणी कालव्याच्या पाण्याचे नियोजन नसल्यामुळे शेतकरी हतबल होत आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांची नियोजनशुन्यता तसेच बेजबाबदारवृत्ती या प्रकारला कारणीभूत आहे. या परिसरातील कास्तकारांनी खा. तडस, आ. कांबळे तसेच विभागाच्या संबंधित मंत्र्यांना निवेदने देवून नवीन कालव्याची मागणी केली आहे.(प्रतिनिधी)