शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

शेतीसमोरील समस्याच सर्व असंतोषाच्या मुळाशी

By admin | Updated: November 12, 2016 01:13 IST

वर्षभरात केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशभर निघालेल्या महामोर्च्यांमध्ये लोक मोठ्या प्रमाणात एकत्र आलेत.

श्याम मानव : कृषीआधारित अर्थव्यवस्था व ‘स्वामिनाथन’ हाच पर्यायवर्धा : वर्षभरात केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशभर निघालेल्या महामोर्च्यांमध्ये लोक मोठ्या प्रमाणात एकत्र आलेत. या मोर्च्यांचे मानसशास्त्र जर सरकारने वेळीच ओळखले नाही तर येणारा काळ हा तीव्र संघर्षाचा असेल. असंतोषाच्या ज्वालामूखीचा भविष्यकाळात आकस्मिक विस्फोट होऊ नये, यासाठी कृषिआधारित व्यवस्था निर्माण करणे आणि स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करणे, हाच पर्याय असल्याचे मत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केले.‘मराठा क्रांती मूक मोर्चामागील असंतोषाची मूळ कारणे’ या विषयावर घेण्यात आलेल्या जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. स्थानिक लोक महाविद्यालयाच्या प्रांगणात विविध परिवर्तनवादी सामाजिक संघटनांच्या सहकार्याने या विषयावर प्रथमच आयोजित व्याख्यानात प्रा. मानव यांनी अत्यंत तटस्थपणे आपली भूमिका मांडली. मंचावर प्रा. शेख हाशम, प्रा. जनार्दन देवतळे, अ‍ॅड. के.पी. लोहवे, अ.भा. अंनिसचे राज्य संघटक अ‍ॅड. गणेश हलकारे, महिला आघाडी प्रमुख छाया सावरकर, राज्यसचिव प्रशांत सपाटे, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय इंगळे तिगावकर, जिल्हाध्यक्ष हरीश इथापे, संघटक पंकज वंजारे यांची उपस्थिती होती. आंदोलनामुळे भविष्यकालीन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय सहसंबंधावर होणाऱ्या परिणामांची मांडणी करताना प्रा. मानव म्हणाले, मराठा, जाट, पटेल, गुज्जर, माळी या सर्व शेतीवर निर्भर असणाऱ्या जातीच्या मोर्चामागील अस्वस्थता शेती संस्कृतीतील समस्यांमुळे उद्भवली. यापूर्वी जगभर निघालेले मोर्चे पाहता अत्यंत कमी कालावधीत ठराविक नेतृत्वाशिवायही लक्षावधी लोक एकत्र येतात, यामागची मानसिक अस्वस्थता नीट ओळखली पाहिजे. मराठा क्रांती मूक मोर्चाद्वारे अनेक मागण्या पुढे आल्या अस्ल्याचे सांगितले. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)