शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

शेतीसमोरील समस्याच सर्व असंतोषाच्या मुळाशी

By admin | Updated: November 12, 2016 01:13 IST

वर्षभरात केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशभर निघालेल्या महामोर्च्यांमध्ये लोक मोठ्या प्रमाणात एकत्र आलेत.

श्याम मानव : कृषीआधारित अर्थव्यवस्था व ‘स्वामिनाथन’ हाच पर्यायवर्धा : वर्षभरात केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशभर निघालेल्या महामोर्च्यांमध्ये लोक मोठ्या प्रमाणात एकत्र आलेत. या मोर्च्यांचे मानसशास्त्र जर सरकारने वेळीच ओळखले नाही तर येणारा काळ हा तीव्र संघर्षाचा असेल. असंतोषाच्या ज्वालामूखीचा भविष्यकाळात आकस्मिक विस्फोट होऊ नये, यासाठी कृषिआधारित व्यवस्था निर्माण करणे आणि स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करणे, हाच पर्याय असल्याचे मत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केले.‘मराठा क्रांती मूक मोर्चामागील असंतोषाची मूळ कारणे’ या विषयावर घेण्यात आलेल्या जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. स्थानिक लोक महाविद्यालयाच्या प्रांगणात विविध परिवर्तनवादी सामाजिक संघटनांच्या सहकार्याने या विषयावर प्रथमच आयोजित व्याख्यानात प्रा. मानव यांनी अत्यंत तटस्थपणे आपली भूमिका मांडली. मंचावर प्रा. शेख हाशम, प्रा. जनार्दन देवतळे, अ‍ॅड. के.पी. लोहवे, अ.भा. अंनिसचे राज्य संघटक अ‍ॅड. गणेश हलकारे, महिला आघाडी प्रमुख छाया सावरकर, राज्यसचिव प्रशांत सपाटे, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय इंगळे तिगावकर, जिल्हाध्यक्ष हरीश इथापे, संघटक पंकज वंजारे यांची उपस्थिती होती. आंदोलनामुळे भविष्यकालीन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय सहसंबंधावर होणाऱ्या परिणामांची मांडणी करताना प्रा. मानव म्हणाले, मराठा, जाट, पटेल, गुज्जर, माळी या सर्व शेतीवर निर्भर असणाऱ्या जातीच्या मोर्चामागील अस्वस्थता शेती संस्कृतीतील समस्यांमुळे उद्भवली. यापूर्वी जगभर निघालेले मोर्चे पाहता अत्यंत कमी कालावधीत ठराविक नेतृत्वाशिवायही लक्षावधी लोक एकत्र येतात, यामागची मानसिक अस्वस्थता नीट ओळखली पाहिजे. मराठा क्रांती मूक मोर्चाद्वारे अनेक मागण्या पुढे आल्या अस्ल्याचे सांगितले. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)