शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसमोरील समस्याच सर्व असंतोषाच्या मुळाशी

By admin | Updated: November 12, 2016 01:13 IST

वर्षभरात केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशभर निघालेल्या महामोर्च्यांमध्ये लोक मोठ्या प्रमाणात एकत्र आलेत.

श्याम मानव : कृषीआधारित अर्थव्यवस्था व ‘स्वामिनाथन’ हाच पर्यायवर्धा : वर्षभरात केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशभर निघालेल्या महामोर्च्यांमध्ये लोक मोठ्या प्रमाणात एकत्र आलेत. या मोर्च्यांचे मानसशास्त्र जर सरकारने वेळीच ओळखले नाही तर येणारा काळ हा तीव्र संघर्षाचा असेल. असंतोषाच्या ज्वालामूखीचा भविष्यकाळात आकस्मिक विस्फोट होऊ नये, यासाठी कृषिआधारित व्यवस्था निर्माण करणे आणि स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करणे, हाच पर्याय असल्याचे मत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केले.‘मराठा क्रांती मूक मोर्चामागील असंतोषाची मूळ कारणे’ या विषयावर घेण्यात आलेल्या जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. स्थानिक लोक महाविद्यालयाच्या प्रांगणात विविध परिवर्तनवादी सामाजिक संघटनांच्या सहकार्याने या विषयावर प्रथमच आयोजित व्याख्यानात प्रा. मानव यांनी अत्यंत तटस्थपणे आपली भूमिका मांडली. मंचावर प्रा. शेख हाशम, प्रा. जनार्दन देवतळे, अ‍ॅड. के.पी. लोहवे, अ.भा. अंनिसचे राज्य संघटक अ‍ॅड. गणेश हलकारे, महिला आघाडी प्रमुख छाया सावरकर, राज्यसचिव प्रशांत सपाटे, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय इंगळे तिगावकर, जिल्हाध्यक्ष हरीश इथापे, संघटक पंकज वंजारे यांची उपस्थिती होती. आंदोलनामुळे भविष्यकालीन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय सहसंबंधावर होणाऱ्या परिणामांची मांडणी करताना प्रा. मानव म्हणाले, मराठा, जाट, पटेल, गुज्जर, माळी या सर्व शेतीवर निर्भर असणाऱ्या जातीच्या मोर्चामागील अस्वस्थता शेती संस्कृतीतील समस्यांमुळे उद्भवली. यापूर्वी जगभर निघालेले मोर्चे पाहता अत्यंत कमी कालावधीत ठराविक नेतृत्वाशिवायही लक्षावधी लोक एकत्र येतात, यामागची मानसिक अस्वस्थता नीट ओळखली पाहिजे. मराठा क्रांती मूक मोर्चाद्वारे अनेक मागण्या पुढे आल्या अस्ल्याचे सांगितले. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)