शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

दिवाळीकरिता गावाकडे येणाऱ्यांचे दिवाळे; ट्रॅव्हल्सच्या प्रवासी भाड्यात भरमसाठ वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2022 12:21 IST

रेल्वेगाड्या रद्दचा फटका

वर्धा : दिवाळीनिमित्त नोकरी व शिक्षणाकरिता पुणे, मुंबईत राहणारे व्यक्ती आपल्या गावाकडे येत असतात. याकरिता रेल्वेलाच प्रथम प्राधान्य देत तिकिटांचे बुकिंगही करून ठेवतात. मात्र, आता ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रशासनाने तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करून रेल्वेगाड्या रद्द करण्याचा सपाटा चालविला आहे. याचाच फायदा खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीने उचलून तिकिटांच्या दरात भरमसाठ वाढ केल्याने आता गावाकडे येणाऱ्यांच्या खिशावर चांगलाच ताण पडत आहे.

जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी व नागरिक नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने पुणे, मुंबई या मोठ्या शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. दिवाळीला ते आपल्या गावी येत असतात. त्याकरिता त्यांची आधीपासून तयारी सुरू होऊन ते रेल्वेचे तिकीटही बुक करून ठेवतात. यावर्षीही बहुतांश जणांनी रेल्वेचे तिकीट बुक केले होते. दिवाळीचा आनंदोत्सव परिवारासोबत कसा साजरा करावा, याबाबत कार्यक्रमही आखला होता. मात्र, ऐन सणाच्या दिवसात रेल्वे रुळाच्या देखभाल-दुरुस्तीकरिता रेल्वेगाड्या रद्द केल्यात. त्यामुळे अनेकांचे तिकीट रद्द झाल्याने त्यांच्या आनंदोत्सवावर विरजण पडले आहे.

खासगी ट्रॅव्हसचे तिकीटही वर्धा ते पुणे, मुंबईकरिता सहा हजारांच्या वर असल्याने या दिवाळीत गावाकडे जाणे नको रे बाबा! असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मोठा रोष व्यक्त होत आहे. सारेच दिवाळीला गावाकडेे येण्यासाठी आसुसले आहे. त्यांच्याकरिता शासनाने व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

दहा रेल्वेगाड्या झाल्या रद्द

दिवाळीच्या तोंडावरच वर्धा ते पुणे मार्गावर धावणाऱ्या एक-दोन नाही तर तब्बल दहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये निजामुद्दीन पुणे, महाराष्ट्र एक्स्प्रेस, पुणे-अजनी, भुसावळ-पुणे, पुणे-भुसावळ, पुणे-नागपूर आणि नागपूर-पुणे या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे पुण्यावरून वर्ध्याला येणाऱ्यांचा रेल्वे प्रवासच अडचणीत आला आहे.

पुणे येथून विदर्भातील सर्व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व प्रवासी प्रवास करतात. काही महिन्यांपासून पुणे-नागपूर दरम्यान जवळपास सर्वच रेल्वेगाड्या वारंवार रद्द करण्यात येत आहेत. पुणे-नागपूर दरम्यानच्या रेल्वेगाड्या सुरू ठेवणे व त्याला पर्यायी मार्ग काढणे ही रेल्वे विभागाची प्राथमिकता असली पाहिजे. गाड्या सरसकट रद्द करण्यापेक्षा पर्यायी मार्गाने म्हणजेच पनवेल-कल्याण-इगतपुरी-मनमाडमार्गे नागपूर-पुणे दरम्यानची वाहतूक वळविल्यास सरसकट गाड्या रद्द होणार नाही आणि प्रवाशांचीही गैरसोय होणार नाही, असे पत्र रेल्वेमंत्र्यांना पाठविले आहे.

रामदास तडस, खासदार, वर्धा

टॅग्स :ticketतिकिटroad transportरस्ते वाहतूकDiwaliदिवाळी 2022