शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

दिवाळीकरिता गावाकडे येणाऱ्यांचे दिवाळे; ट्रॅव्हल्सच्या प्रवासी भाड्यात भरमसाठ वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2022 12:21 IST

रेल्वेगाड्या रद्दचा फटका

वर्धा : दिवाळीनिमित्त नोकरी व शिक्षणाकरिता पुणे, मुंबईत राहणारे व्यक्ती आपल्या गावाकडे येत असतात. याकरिता रेल्वेलाच प्रथम प्राधान्य देत तिकिटांचे बुकिंगही करून ठेवतात. मात्र, आता ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रशासनाने तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करून रेल्वेगाड्या रद्द करण्याचा सपाटा चालविला आहे. याचाच फायदा खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीने उचलून तिकिटांच्या दरात भरमसाठ वाढ केल्याने आता गावाकडे येणाऱ्यांच्या खिशावर चांगलाच ताण पडत आहे.

जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी व नागरिक नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने पुणे, मुंबई या मोठ्या शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. दिवाळीला ते आपल्या गावी येत असतात. त्याकरिता त्यांची आधीपासून तयारी सुरू होऊन ते रेल्वेचे तिकीटही बुक करून ठेवतात. यावर्षीही बहुतांश जणांनी रेल्वेचे तिकीट बुक केले होते. दिवाळीचा आनंदोत्सव परिवारासोबत कसा साजरा करावा, याबाबत कार्यक्रमही आखला होता. मात्र, ऐन सणाच्या दिवसात रेल्वे रुळाच्या देखभाल-दुरुस्तीकरिता रेल्वेगाड्या रद्द केल्यात. त्यामुळे अनेकांचे तिकीट रद्द झाल्याने त्यांच्या आनंदोत्सवावर विरजण पडले आहे.

खासगी ट्रॅव्हसचे तिकीटही वर्धा ते पुणे, मुंबईकरिता सहा हजारांच्या वर असल्याने या दिवाळीत गावाकडे जाणे नको रे बाबा! असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मोठा रोष व्यक्त होत आहे. सारेच दिवाळीला गावाकडेे येण्यासाठी आसुसले आहे. त्यांच्याकरिता शासनाने व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

दहा रेल्वेगाड्या झाल्या रद्द

दिवाळीच्या तोंडावरच वर्धा ते पुणे मार्गावर धावणाऱ्या एक-दोन नाही तर तब्बल दहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये निजामुद्दीन पुणे, महाराष्ट्र एक्स्प्रेस, पुणे-अजनी, भुसावळ-पुणे, पुणे-भुसावळ, पुणे-नागपूर आणि नागपूर-पुणे या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे पुण्यावरून वर्ध्याला येणाऱ्यांचा रेल्वे प्रवासच अडचणीत आला आहे.

पुणे येथून विदर्भातील सर्व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व प्रवासी प्रवास करतात. काही महिन्यांपासून पुणे-नागपूर दरम्यान जवळपास सर्वच रेल्वेगाड्या वारंवार रद्द करण्यात येत आहेत. पुणे-नागपूर दरम्यानच्या रेल्वेगाड्या सुरू ठेवणे व त्याला पर्यायी मार्ग काढणे ही रेल्वे विभागाची प्राथमिकता असली पाहिजे. गाड्या सरसकट रद्द करण्यापेक्षा पर्यायी मार्गाने म्हणजेच पनवेल-कल्याण-इगतपुरी-मनमाडमार्गे नागपूर-पुणे दरम्यानची वाहतूक वळविल्यास सरसकट गाड्या रद्द होणार नाही आणि प्रवाशांचीही गैरसोय होणार नाही, असे पत्र रेल्वेमंत्र्यांना पाठविले आहे.

रामदास तडस, खासदार, वर्धा

टॅग्स :ticketतिकिटroad transportरस्ते वाहतूकDiwaliदिवाळी 2022