शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

आरोग्यासाठी सरसावला खासगी डॉक्टरांचा मंच

By admin | Updated: June 24, 2015 02:19 IST

मंगल कार्यालये, लॉन, हॉटेल तसेच कॅटरींगचा व्यवसाय करणारे रस्त्याच्या कडेला शिळे व शिल्लक अन्न टाकतात. यामुळे रस्ते ‘गार्बेज झोन’ झालेत.

वर्धा : मंगल कार्यालये, लॉन, हॉटेल तसेच कॅटरींगचा व्यवसाय करणारे रस्त्याच्या कडेला शिळे व शिल्लक अन्न टाकतात. यामुळे रस्ते ‘गार्बेज झोन’ झालेत. पावसाळ्यात यातून विविध आजारांचा फैलाव होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत वैद्यकीय जनजागृती मंचने वर्धा-नागपूर मार्गावरील बायपास रस्त्याच्या कडेला खड्डा करून शिळे अन्न पूरले. यामुळे सदर रस्ता तुर्तास दुर्गंधीमुक्त झाला. शहरात मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल वा कॅटरींग व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पालिकेकडून संबधितांनी परवानगी घेणे गरजेचे असते. यात शिळ्या अन्नाची विल्हेवाट कशी लावणार, त्यामुळे नागरिकांना वा शहराच्या सार्वजनिक आरोग्यास धोका होणार नाही, हे पटवून देणे गरजेचे असते; पण येथे अशी कुठलीही प्रक्रिया पार पाडली जात नसल्याचेच दिसते. यामुळेच शहराबाहेरील रस्त्यांच्या कडेला शिळे व शिल्लक अन्न टाकत असल्याचे आढळून येते. उन्ह आणि पावसामुळे हे अन्न कुजून परिसरात दुर्गंधी पसरते. यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होतो. शिवाय विविध आजारांचा फैलाव होतो. या बाबी टाळण्याकरिता शिळे अन्न उघड्यावर न टाकता ते खोल खड्डा करून त्यात पूरणे गरजेचे आहे; पण यावर कुणीही अंमल करताना दिसत नाही. वर्धा ते नागपूर मार्गावरील बायपासच्या कडेला सर्रास शिल्लक अन्न टाकले जाते. सध्या पावसाळा असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. ही बाब लक्षात घेऊन वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे या अन्नाची विल्हेवाट लावण्याचा प्रतिकात्मक उपक्रम हाती घेण्यात आला. यात मंगळवारी बायपासच्या कडेला खड्डा करून शिळ्या अन्नाचे ढिगारे जेसीबीच्या साह्याने खड्ड्यात टाकण्यात आले. शिवाय तेथे फलकही लावण्यात आला. या उपक्रमामुळे बायपास दुर्गंधीमुक्त झाला आहे. शहरातील प्रत्येक कॅटरींग, मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल व्यावसायिकाने शिळे अन्न खड्ड्यात टाकून आजारांना आळा घालावा, असे आवाहन मंचाने केले. पालिकेने तत्सम व्यावसायिकाला शिल्लक अन्न खड्ड्यात पुरण्याची सक्ती करणे गरजेचे आहे. या उपक्रमात वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, डॉ. यशवंत हिवंज, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, डॉ. प्रवीण सातपुते, डॉ. अमोल गाढवकर, डॉ. नितीन मेसेकर, डॉ. शंतनू चव्हाण, डॉ. सुनील अष्टपुत्रे, डॉ. शैलेंद्र कराळे यांच्यासह सदस्यांनी सहभाग घेतला.(कार्यालय प्रतिनिधी)शिळ्या अन्नावर होऊ शकतो बायोगॅस प्रकल्पशहरात मोठ्या प्रमाणात कॅटरींग व्यावसायिक आहेत. शिवाय मंगल कार्यालये, लॉन व हॉटेलमधूनही अन्न शिल्लक राहते. हे अन्न वापरल्यास बायोगॅस प्रकल्पाची निर्मिती करणेही शक्य आहे. नागपूर शहरात अनेक व्यावसायिकांद्वारे असे प्रकल्प उभारण्यात आले असून ते यशस्वी ठरले आहेत. यासाठी व्यावसायिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कुजलेल्या अन्नातून चांगल्या प्रतीची गॅस उपलब्ध होऊ शकते हे सिद्ध झाले आहे. खतांची निर्मितीही शक्यशिळे व शिल्लक राहिलेले अन्न खोल खड्ड्यात पुरल्यास काही दिवसांत त्या अन्नाचे मातीमध्ये रूपांतर होते. ही माती खत म्हणून वापरता येणे शक्य आहे. यासाठीही शहरातील तत्सम व्यावसायिकांनी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. रस्त्याच्या कडेला व कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर शिळे अन्न टाकल्यास विविध आजार पसरतात. हे टाळण्याकरिता सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.