शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यासाठी सरसावला खासगी डॉक्टरांचा मंच

By admin | Updated: June 24, 2015 02:19 IST

मंगल कार्यालये, लॉन, हॉटेल तसेच कॅटरींगचा व्यवसाय करणारे रस्त्याच्या कडेला शिळे व शिल्लक अन्न टाकतात. यामुळे रस्ते ‘गार्बेज झोन’ झालेत.

वर्धा : मंगल कार्यालये, लॉन, हॉटेल तसेच कॅटरींगचा व्यवसाय करणारे रस्त्याच्या कडेला शिळे व शिल्लक अन्न टाकतात. यामुळे रस्ते ‘गार्बेज झोन’ झालेत. पावसाळ्यात यातून विविध आजारांचा फैलाव होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत वैद्यकीय जनजागृती मंचने वर्धा-नागपूर मार्गावरील बायपास रस्त्याच्या कडेला खड्डा करून शिळे अन्न पूरले. यामुळे सदर रस्ता तुर्तास दुर्गंधीमुक्त झाला. शहरात मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल वा कॅटरींग व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पालिकेकडून संबधितांनी परवानगी घेणे गरजेचे असते. यात शिळ्या अन्नाची विल्हेवाट कशी लावणार, त्यामुळे नागरिकांना वा शहराच्या सार्वजनिक आरोग्यास धोका होणार नाही, हे पटवून देणे गरजेचे असते; पण येथे अशी कुठलीही प्रक्रिया पार पाडली जात नसल्याचेच दिसते. यामुळेच शहराबाहेरील रस्त्यांच्या कडेला शिळे व शिल्लक अन्न टाकत असल्याचे आढळून येते. उन्ह आणि पावसामुळे हे अन्न कुजून परिसरात दुर्गंधी पसरते. यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होतो. शिवाय विविध आजारांचा फैलाव होतो. या बाबी टाळण्याकरिता शिळे अन्न उघड्यावर न टाकता ते खोल खड्डा करून त्यात पूरणे गरजेचे आहे; पण यावर कुणीही अंमल करताना दिसत नाही. वर्धा ते नागपूर मार्गावरील बायपासच्या कडेला सर्रास शिल्लक अन्न टाकले जाते. सध्या पावसाळा असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. ही बाब लक्षात घेऊन वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे या अन्नाची विल्हेवाट लावण्याचा प्रतिकात्मक उपक्रम हाती घेण्यात आला. यात मंगळवारी बायपासच्या कडेला खड्डा करून शिळ्या अन्नाचे ढिगारे जेसीबीच्या साह्याने खड्ड्यात टाकण्यात आले. शिवाय तेथे फलकही लावण्यात आला. या उपक्रमामुळे बायपास दुर्गंधीमुक्त झाला आहे. शहरातील प्रत्येक कॅटरींग, मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल व्यावसायिकाने शिळे अन्न खड्ड्यात टाकून आजारांना आळा घालावा, असे आवाहन मंचाने केले. पालिकेने तत्सम व्यावसायिकाला शिल्लक अन्न खड्ड्यात पुरण्याची सक्ती करणे गरजेचे आहे. या उपक्रमात वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, डॉ. यशवंत हिवंज, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, डॉ. प्रवीण सातपुते, डॉ. अमोल गाढवकर, डॉ. नितीन मेसेकर, डॉ. शंतनू चव्हाण, डॉ. सुनील अष्टपुत्रे, डॉ. शैलेंद्र कराळे यांच्यासह सदस्यांनी सहभाग घेतला.(कार्यालय प्रतिनिधी)शिळ्या अन्नावर होऊ शकतो बायोगॅस प्रकल्पशहरात मोठ्या प्रमाणात कॅटरींग व्यावसायिक आहेत. शिवाय मंगल कार्यालये, लॉन व हॉटेलमधूनही अन्न शिल्लक राहते. हे अन्न वापरल्यास बायोगॅस प्रकल्पाची निर्मिती करणेही शक्य आहे. नागपूर शहरात अनेक व्यावसायिकांद्वारे असे प्रकल्प उभारण्यात आले असून ते यशस्वी ठरले आहेत. यासाठी व्यावसायिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कुजलेल्या अन्नातून चांगल्या प्रतीची गॅस उपलब्ध होऊ शकते हे सिद्ध झाले आहे. खतांची निर्मितीही शक्यशिळे व शिल्लक राहिलेले अन्न खोल खड्ड्यात पुरल्यास काही दिवसांत त्या अन्नाचे मातीमध्ये रूपांतर होते. ही माती खत म्हणून वापरता येणे शक्य आहे. यासाठीही शहरातील तत्सम व्यावसायिकांनी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. रस्त्याच्या कडेला व कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर शिळे अन्न टाकल्यास विविध आजार पसरतात. हे टाळण्याकरिता सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.