शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आवासमध्ये जिल्हा राज्यात दुसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 22:45 IST

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ सामाजिक आर्थिक जनगणनेनुसार तयार दारिद्र्य रेषेखाली यादीतील उतरत्या क्रमाने लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात येतात.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची बैठकीत माहिती

आॅनलाईन लोकमतवर्धा : पंतप्रधान आवास योजनेचा लाभ सामाजिक आर्थिक जनगणनेनुसार तयार दारिद्र्य रेषेखाली यादीतील उतरत्या क्रमाने लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात येतात. यामध्ये कोणत्याही प्रकारची हेराफेरी होत होत नाही. म्हणूनच वर्धा जिल्हा राज्यात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकूल वाटपामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी जिल्हा परिषद सभागृहात आयोजित जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण समितीच्या बैठकीत (दिशा) समितीचे अध्यक्ष खा. रामदास तडस यांना दिली.या बैठकीला नगराध्यक्ष अतुल तराळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा करूणा जुहीकर, स्वीकृत सदस्य रितेश लोखंडे, अर्चना वानखेडे व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.वैयक्तिक लाभाच्या योजनेबद्दल नागरिकांना काही तक्रारी असल्यास त्यांनी लोकशाही दिनात लेखी स्वरूपात मांडाव्यात. यावर प्रशासनाच्यावतीने निष्पक्ष न्याय देण्यात येईल. सर्व कार्यालयांनी स्वागत समारंभ किंवा इतर कार्यक्रम प्रसंगी स्वागतासाठी फुलांचा वापर न करता बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू देऊन स्वागत करावे. यामुळे बचत गटाचे आर्थिक स्त्रोत्र वाढून खर्च झालेल्या पैशाचे सार्थक होईल. तसेच कार्यालयात कागदी फाईलचा वापर करावा, अशा सर्व विभाग प्रमुखांना करण्यात आल्यात.यावेळी केंद्र शासनाच्या राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजना, जिवन्नोती अभियान, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, भूमि अभिलेख आधुनिकीकरण, दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती अभियान, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य मिशन, सर्व शिक्षा अभियान, एकात्मिक बाल विकास योजना, उज्वला योजनाचा आढावा संबंधित विभागाकडून घेण्यात आला.केंद्र शासनाच्या योजना गावपातळीवर पोहचवा- रामदास तडसकेंद्र शासनाच्या विविध योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येतात. या सर्व योजनाचा गावपातळीवर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी दिशा समितीने तालुकास्तरावर समाधान शिबिराचे आयोजन करून नागरिकांना लाभ द्यावा, अशा सूचना खा. रामदास तडस यांनी जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण बैठकीत सर्व शाखा प्रमुखांना दिल्यात.प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व तक्रारीचे निराकरण करण्यासाठी कृषी विभागांनी विमा कपंनीला तालुकास्तरावर कार्यालय सुरू करण्यासाठी सूचना द्याव्या. २०१९ पर्यंत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रत्येकाला घरकूल देण्यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्न करावे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्यास केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करावे, अशा सूचना तडस यांनी केल्यास तसेच सध्या जिल्ह्यात शेतकºयांच्या सोयाबीन पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव आला असल्याने शेतकºयाचे नुकसान होत आहे. त्यासाठी कृषी विभागांनी सर्वेक्षण करून पंचनामे करावे, असेही ते म्हणाले.