शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

शासन निर्णय विरोधात प्राथमिक शिक्षक संघटना झाल्या आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 14:45 IST

एल्गार पुकारणार : शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नियुक्तीला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमधील नियमित शिक्षक अतिरिक्त ठरवून कंत्राटी पद्धतीने नियुक्तीचा शासनाने निर्णय घेतला आहे. या विरोधात राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी संताप व्यक्त करीत राज्यव्यापी आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ गुरुजी संच मान्यतेचा शासन निर्णय काढला. या शासन निर्णयातील तरतुदींमुळे राज्यात शिक्षकांची पदे कमी होणार आहेत. १५ मार्चचा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करण्यासाठी राज्यातील शिक्षक संघटनांनी सातत्याने शासनाकडे आग्रह धरला आहे. शासनाने सुद्धा यात योग्य ते बदल केली जाईल अशी भूमिका घेतली होती. तसे विधिमंडळात आश्वासन शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिले होते. मात्र ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी प्राथमिक शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत चुकीचा निर्णय राज्य शासनाने घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या प्राथमिक शाळेची पटसंख्या २० किंवा २० पेक्षा कमी आहे अशा शाळेत मंजूर असणाऱ्या दोन शिक्षकांपैकी एका शिक्षकाला अतिरिक्त ठरले जाणार असून त्या जागी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक किंवा शिक्षणशास्त्र पदवी पदविका धारण करणाऱ्या उमेदवाराला १५ हजार रुपये मासिक मानधनावर कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वैध नाही किंवा लिंक झालेले नाही, असा विद्यार्थी प्राथमिक शाळेत दाखल असून सुद्धा त्याला दाखल न समजता कोणत्याही योजनांचा लाभ दिला जाणार नाही. राज्य शासनाने शिक्षक दिनाच्या दिवशी एकीकडे शिक्षकांचा गौरव करत असताना कमी पटसंख्येच्या दुर्गम भागातील वाडी वस्तीवरील शाळा एक शिक्षकी करून मोडीत काढण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याची भूमिका राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी घेतली आहे. 

या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षक राज्यातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आभासी सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या तयारीच्या दृष्टीने पुणे येथे १४ सप्टेंबर रोजी सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष सरचिटणीस आबासाहेब जगताप, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे अध्यक्ष देवीदास बसवदे, पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अनिल पलांडे आदींनी केले आहे. 

महत्वाच्या मागण्या प्रलंबितच शाळा सुरू होऊन तीन महिने होत आले असताना सुद्धा ७५ टक्के पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत. ज्या मोजक्या शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले त्या गणवेशाचे कापड अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. अनेक शाळातील विद्यार्थ्यांना अद्यापही पूर्ण संख्येने पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक प्राथमिक शाळांना सुयोग्य इमारती व स्वच्छतागृहे नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शिक्षकांच्या महत्वाच्या मागण्या प्रदीर्घकाळ प्रलंबित आहेत. 

टॅग्स :wardha-acवर्धा