शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 23:40 IST

जिल्हा परिषदेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग विविध कारणांनी चांगलाच गाजत आहे. प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांसह माजी मुख्याध्यापकाची चौकशी प्रक्रिया संथ गतीने सुरु असल्याने शंकांना पेव फुटले आहे.

ठळक मुद्देआज जि.प.ची सर्वसाधारण सभा : माजी मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी व बायोमॅट्रीक्सचा विषय गाजणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषदेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग विविध कारणांनी चांगलाच गाजत आहे. प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांसह माजी मुख्याध्यापकाची चौकशी प्रक्रिया संथ गतीने सुरु असल्याने शंकांना पेव फुटले आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत इतर विषयांसोबतच हे विषयी चर्चीले जाणार असून प्रामुख्याने शिक्षण विभागच टार्गेट राहण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात सध्या सर्वत्रच डेंग्यू व डेंग्यू सदृश्य आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत पाच ते सहा जणांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात काही ठिकाणी नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. ही नाराजी सभागृहातही व्यक्त होण्याची शक्यता आहे. या सभेत सन २०१८-१९ चे सुधारीत अंदाजपत्रक मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागातील कार्याचा लेखाजोखा असणारा वार्षीक प्रशासन अहवालही मंतजुरीकरिता सभागृहात ठेवण्यात येणार आहे. परंतू या दोन्ही विषयावर चर्चा करण्यासाठी मोठा कालावधी लागत असल्याने या विषयासंदर्भात आता विरोधक काय भूमिका घेते, त्यावर सर्व अवलंबून आहे.झडशीच्या वाढीव गावठाणाचा प्रश्नसेलू तालुक्यातील झडशी ग्रामपंचायतीच्या मालकीची वाढीव गावठाणाची ३ एकर जागा हडपून त्यावर अतिक्रमण करण्यात आले. हा विषय जिल्हा परिषदेच्या सभागृहात विविध प्रकाराने रंगविण्यात आला. परिणामी ग्रामपंचायतने न्यायालयाचे दार ठोठावल्याने अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी गावठाणाच्या जागेचे कमी-जास्त पत्रक सादर करण्याचे आदेश दिले. या चौकशीदरम्यान मुळ मालकाने वाढीव गावठाणासाठी दिलेली जागा, आपल्या सातबारावरुन कमी न करताच तिची विल्हेवाट लावल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याच सभेत पुन्हा हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राष्ट्रीय पशुधन विमा योजनेत जिल्ह्याला भोपळापशुपालकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून राष्ट्रीय पशुधन विमा योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला पाच हजार जनावरांचे लक्ष दिले होते.परंतू वर्धा जिल्ह्याला निधीच प्राप्त न झाल्याने ही योजनाच राबविली नाही. असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी जि.प.तेलंग यांच्या पत्राला उत्तर देतांना कळविले आहे. वर्धा जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असतानाही या योजनेत एकाही शेतकºयाला लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शेतकºयांबाबतची उदासिनता पाहून या गंभीर विषयावर जोरदार चर्चा होणार आहे.या तीन प्रश्नांसह विविध मुद्यांवर गाजणार सर्वसाधारण सभामाजी मुख्याध्यापकाची चौकशी आस्ते-कदमनेरी पुनर्वसनचे तत्कालीन मुख्याध्यापक लोमेश वऱ्हडे यांच्या कार्याप्रणालीवर आक्षेप नोंदवित चौकशी आरंभली होती. पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केद्र प्रमुखांनी चौकशी केली असता नियमबाह्य खर्च, रेकॉर्ड उपलब्ध नसणे,कोटेशन फाईल उपलब्ध नसणे, अधिकार नसताना खात्यातून रक्कम काढणे, वेळेत संबंधितांना कार्यभार न सोपविणे, विद्यार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवणे, खरेदी केलेले शाळेतील साहित्य उपलब्ध नसणे आदींबाबत अनियमितता आढळून आल्या आहे.तसेच दस्ताऐवज गहाळ करणे हे शासकीय अभिलेख जतन कायदा २००५ नुसार हा फौजदारी गुन्हा आहे. असे असतांनाही हा अहवाल सुरुवातीला आठवडाभर शिक्षणाधिकाऱ्यांकडे तर आता दोन दिवसांपासून मुख्य कार्यपालन अधिकाºयांकडे कारवाईकरिता प्रलंबीत आहे. यावरुन गंभीर प्रकरण असतांना कारवाई सौम्य करण्यासाठी तर प्रयत्न सुरु नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सभागृहात या प्रश्नाला वाचा फुटण्याची गरज आहे.शिक्षणाधिकाऱ्याची बयाणास चालढकलप्राथमिकचे शिक्षणाधिकारी विठोबा कानवडे यांच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्यांनी आॅनलाईन तक्रार केली होती. तसेच विविध शिक्षक संघटना आणि पदाधिकाऱ्यांशीही त्यांची योग्य वागणूक नसल्याने त्यांच्या अनेक तक्रारी झाल्या होत्या. सोबतच शिक्षणदिनाचा कार्यक्रम आयोजित न करण्याचा दोषही नशीबी बसल्याने शासनाने त्यांच्या चौकशीचा आदेश दिला.मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या सूचनेवरुन अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.जुईकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी इलमे यांनी चौकशीला सुरुवात केली. तक्रारकर्त्यांचे बयाण नोंदविण्यात आले.परंतू मागील आठ दिवसांपासून शिक्षणाधिकाऱ्यानी बयाण देण्यासाठी चालढकल चालविली आहे. बयाण नोदविण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने चौकशी अधिकारी काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.बायोमॅट्रीक्स प्रणालीला वाकुल्याशासनाने विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील हजेरी बायोमॅट्रीक्स प्रणालीने घेण्याचे आदेश दिले. यासंदर्भात कार्यवाही करण्याची जबाबदारी माध्यमिक शिक्षण विभागावर सोपविण्यात आली.परंतू माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळे या आदेशाला हरताळ फासल्या गेला. जिल्ह्यात ६० पेक्षा जास्त विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय असतानाही बोटावर मोजण्या इतक्याच महाविद्यालयाने बायोमॅट्रीक्स प्रणाली सुरु केली.परंतू त्यानुसार हजेरी होते की नाही? याबाबत साशंकता आहे. सत्राच्या सुुरुवातीलाच आदेश पारीत झाला असतांना अर्धे सत्र संपूनही या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच माध्यमिक शिक्षण विभागाने कामाला गती दिली आहे.तरीही आजची स्थिती जाणून घेणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदEducationशिक्षण