शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

भाजीपाल्याचे दर कडाडले, लसूण १२० रुपयाला पावभर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 16:18 IST

महागाईचा भडका : गृहिणीचे बजेट कोलमडले, सर्वसामान्यांचे हाल

पुरुषोत्तम नागपुरे लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : सध्या भाजीपाला व धान्याचे भाव गगनाला भिडल्याने, मध्यम वर्ग व गरिबांना महागाईचा फटका बसत आहेत. यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे महिन्याचे आर्थिक बजेट बिघडले आहे. यावर्षी पावसामध्ये उघडझाप असल्यामुळे भाजीपाल्यांची आवक कमी होऊन भावात प्रचंड तेजी आली आहे. १२० रुपयाला लसूण पावभर मिळत आहे. अद्रक, कांदे, मिरची, टोमॅटो, वांगी, गवार, भेंडी, फुलकोबी, कोथिंबीर यांचे भाव कडाडले असून इतर भाजीपालाही महाग झाला आहे.

जवळपास सर्वच भाजीपाल्यांचे भाव वाढत असताना टोमॅटोच्या भाववाढीमुळे महिलांच्या डोळ्यात अश्रू दाटून येत आहेत. रोजच्या आहारातील कांद्याचे भाव सुद्धा गगनाला भिडत असल्याने, कांदा उत्पादक शेतकरी आनंदी झाला असला तरी दलालांनी त्यालाही अंधारात ठेवून आपलं चांगभलं केले आहे. तद्वतच इंधनापासून गॅस सिलिंडरची किंमत सुद्धा वाढल्याने महिलांचे आर्थिक बजेट पार कोलमडले आहे. वातावरणातील नैसर्गिक चक्राच्या बदलामुळे भाजीपाल्याला मोठा फटका बसत असून उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे सर्वत्र लहान मोठ्या शहरांमध्ये व विशेषतः ग्रामीण भागामध्ये भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 

आता टोमॅटो ६० रुपये किलो, अद्रक २५० रुपये, मिरची २०० रुपये, कोथिंबीर ४०० रुपये, गवार १०० रु., कारले ८० रुपये, शेवग्याच्या शेंगा १०० रुपये, भेंडी ८० रुपये, असे भाव पाहायला मिळत आहेत. बहुधा येणारे एक-दोन महिने भावात घसरण होण्याची शक्यता दिसत नाही. मटण, मासे, डाळीचे भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात वधारले आहेत. तूरडाळीचा भाव गगनाला भिडला असून तूरडाळ १६० रुपये दराने विकत घ्यावी लागत आहे. काही महिन्यांपूर्वी भाजीपाल्यांचे दर इतके कोसळले होते की बाजारातून टोमॅटो फेकून देण्याची वेळ कास्तकार बंधूंवर आली होती. 

आता मात्र शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत असला तरीही बदलत्या हवामानाचा विपरीत परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट झालेली आढळून येत आहे. म्हणून भाववाढ होत असली तरीही बळीराजाच्या पदरी निराशाच दिसून येत आहे. त्यामुळे या भाववाढीवर नियंत्रण येणे गरजेचे आहे. साठेबाजी करणाऱ्या तथाकथित दलालांना वठणीवर आणणे गरजेचे झाले आहे. 

टॅग्स :wardha-acवर्धाInflationमहागाई