शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी 200 कोटींची जमीन 3 कोटीत घेतली" , वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
4
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
5
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
6
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
7
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
8
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
9
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
10
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
11
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
12
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
13
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
14
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
15
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
16
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
17
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
18
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
19
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
20
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ

४५०० वरच स्थिरावला कापसाचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:46 IST

यंदा विविध कारणांनी खरीपात शेतकºयांना कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला. यातच आता अधिक मजुरी देत महिलांकडून कापसाची वेचणी करावी लागत आहे.

ठळक मुद्देशेतकरी अडचणीत : ६ हजार दराची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदा विविध कारणांनी खरीपात शेतकºयांना कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला. यातच आता अधिक मजुरी देत महिलांकडून कापसाची वेचणी करावी लागत आहे. अशा स्थितीत कापसाला ६ हजार रुपये भाव मिळेल, या आशेवर असलेल्या शेतकºयाला केवळ ४४०० ते ४५०० रुपये क्विंटल भाव खासगी व्यापारी देत आहे. यामुळे शासनाकडून कापूस उत्पादक शेतकºयांची मोठी कुचंबना करण्यात येत आहे.विदर्भात वर्धा जिल्ह्यात उत्कृष्ट प्रतीचा कापूस पिकतो. यामुळे कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडियासह राज्य व देशातील अनेक व्यापारी कापूस खरेदीसाठी वर्धा जिल्ह्यात येतात. यंदाही सरकारची खरेदी सुरू होण्यापूर्वी व्यापाºयांची कापूस खरेदी सुरू झाली आहे; पण व्यापाºयांकडून शेतकºयांना केवळ ४४०० ते ४५०० रुपये भाव दिला जात आहे. दररोज हा भाव बदलत असून कोणत्या दिवशी कोणता भाव राहिल, याची शाश्वती राहिलेली नाही. शासनाने केवळ नावापूरते कापूस खरेदी केंद्र सुरू केले. त्याकडे कुणीही शेतकरी येऊ नये, अशी व्यवस्थाच केली असल्याचे चित्र आहे. यावर्षी कापसावर अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला तसेच किटकनाशकाचा खर्चही वाढला. अत्यल्प पावसामुळे कापसाचे उत्पादन कमी येण्याची शक्यता असताना कापसाचा भाव मात्र स्थीरावलेला आहे. कापूस वेचणीचा खर्च दरवर्षीपेक्षा यंदा वाढल्याचे दिसून येत आहे. किमान एका महिला मजुरावर ७० रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहेत. अशा परिस्थितीत केवळ ४४०० रुपये भावावर शेतकºयाला कापूस पीक परवडणारे नाही, हे वास्तव आहे.इतर देशांत यावर्षी कापसाचे पाहिजे तेवढे उत्पादन झाले नाही. यामुळे भारतातील कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती; पण भाव ४५०० वर स्थिरावले आहे. यामुळे शेतकºयांचा हिरमोड होत असल्याचे दिसून येत आहे.यंदा कापसाला प्रती क्विंटल ६००० रुपये भाव मिळायला हवा; पण सरकारकडून याबाबत काहीही उपाययोजना करण्यात आली नाही. यामुळे खासगी व्यापारी ४४०० रुपये दराने कापूस खरेदी करीत आहे. शासनाने क्विंटलमागे २५०० रुपये बोनस सरसकट कापूस उत्पादक शेतकºयांना द्यावा. पणन महासंघ, सीसीआय व खासगी व्यापारी यांना कापूस विकणाºया सर्व शेतकºयांचा या बोनसमध्ये समावेश करावा.- सुधाकर देवराव माहुरे, शेतकरी, मौजा जखाळा, घोराड.