शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नाच्या जुन्या निकषांमुळे एचआयव्हीग्रस्त मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:59 IST

आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांना शासनाच्यावतीने विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात येते.

ठळक मुद्दे१९८० च्या निकषावर २०१७ मध्ये मदत : २१ हजार रुपयांची अट बदलविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांना शासनाच्यावतीने विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात येते. याच योजनेचा लाभ एच.आय.व्ही. एड्स बाधितांनाही होतो; मात्र जुन्या निकषांमुळे अशा रुग्णांना आणि गरजवंतांना या योजनांपासून दूर राहण्याची वेळ आली आहे. मदतीचा लाभ मिळविण्याकरिता असलेले निकष हे १९८० चे आहेत. आज २०१७ मध्ये स्थिती बदलल्याने हे जुने निकष मदत मिळण्याकरिता अडचणीचे ठरत अनेकांना मदतीपासून वंचित रहावे लागत आहे.शासनाच्या विविध सामाजिक कल्याणकारी योजनांत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना यासारख्या अनेक योजनांचा समावेश आहे. या योजनांचा लाभ मिळण्याकरिता लाभार्थ्यांना वार्षिक उत्पन्नाचा निकष सन १९८० पासून वार्षिक उत्पन्नाची मर्यादा २१ हजार रुपये आहे. आज २०१७ मध्येही हाच निकष आहे. अद्यापपावेतो या निकषांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल शासनाने न केल्यामुळे दुर्धर आजार असलेल्या गरीब गरजु व निराधार व्यक्तींना शासनामार्फत वार्षिक २१ हजार रुपये उत्पन्नाचा दाखला मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. या निकषात बदल झाल्यास दुर्धर आजार असलेल्या व्यक्ती या योजनाकरिता लाभ घेण्यास अपात्र ठरणार नाही. वार्षिक २१ हजार रुपये उत्पन्नाचा निकष बदल करावा अन्यथा वार्षिक उत्पन्न निकष मर्यादा वाढविण्यात यावी. जेणेकरुन जास्तीत दुर्धर आजार असलेल्या गरीब गरजू व निराधार व्यक्ती शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक लोकोपयोगी कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणे सोयीस्कर होईल. यातूनच एच.आय.व्ही. संसर्गित व्यक्तीचे आयुष्यमान वाढविण्यास सहकार्य मिळेल.मिनिमम वेजेसच्या काळात २१ हजारांची अटआज गरीबातील गरीब व्यक्ती दिवसाला १०० रुपये रोज कमवितो. महिन्याला ३ हजार रुपये तर वर्षाला ३६ हजार रुपये होतात. यातही शासनाने मिनिमम वेजेस ठरवून दिले आहेत. यामुळे २१ हजार रुपयांचे उत्पन्नाची अट योजनेचा लाभ घेण्याकरिता अडचणीची ठरत आहे. सामाजिक योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासनाच्या वार्षिक उत्पन्नाच्या निकषामध्ये बदल करून एच.आय.व्ही. सह जीवन जगणाºया जास्तीत जास्त लोकांना या सामाजिक योजनाचा लाभ मिळू शकेल याकरिता निकषात बदल करण्याची अनेकांची मागणी आहे.