शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

वाचन व चिंतनातूनच स्पर्धा परीक्षेची तयारी

By admin | Updated: March 1, 2016 01:33 IST

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे असेल तर सातत्याने वाचन, चिंतन आणि मनन करणे आवश्यक आहे.

प्रफुल्ल पाटील : महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयात व्यक्तीमत्व विकास व स्पर्धा परीक्षा कार्यशाळाकारंजा(घा.) : स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे असेल तर सातत्याने वाचन, चिंतन आणि मनन करणे आवश्यक आहे. सोबतच वृत्तपत्रातील अग्रलेख बारकाईने वाचा, पाचवी ते बारावी पर्यंतच्या शालेय पुस्तकांचा सखोल अभ्यास करा असा सल्ला प्रा. प्रफुल्ल पाटील यांनी दिला. कारंजा येथे महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाद्वारे आयोजित एकदिवसीय व्यक्तीमत्व विकास व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत प्रमुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण विद्यार्थी बुद्धीमत्तेने शहरी विद्यार्थ्यापेक्षा कमी नाहीत. त्यांना केवळ संधी उपलब्ध करून देवून योग्य दिशा देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. ही कार्यशाळा अ. भा. गुरुदेव सेवामंडळाच्या सभागृहात प्रा. डॉ. सुनील पखाले यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य प्रा. रामचंद्र ठोंबरे आणि दिलीप मानकर यांच्या उपस्थितीत सदर कार्यशाळा घेण्यात आली. व्यक्तीमत्व विकास कसा साधता येईल या विषयावर मार्गदर्शन करताना प्राचार्य ठोंबरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. जुन्या गैरसमजुती आणि समाजमान्यता पुसून टाकून, नवीन गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. संवाद साधताना गोड बोला, हळू बोला, कमी बोला आणि विचारपूर्वक बोला, शक्यतोवर रागाने बोलणे टाळा, पुस्तकांना मित्र बनवा यातूनच तुमचा व्यक्तीमत्व विकास साधल्या जाईल. असे त्यांनी सांगितले. प्राचार्य पखाले यांनी ‘वाचाल तर वाचाल’ हा कानमंत्र दिला. १०० विद्यार्थी या शिबिरात उपस्थित होते. वाचनालयाचे सचिव प्रा. अरुण कांबळे यांनी प्रास्ताविकातून पाहुण्याचा परिचय करून देत कार्यशाळेचे उद्दिष्ट समजावून सांगितले. संचालन अंकूश खडतकर यांनी केले. आभार गं्रथपाल रमेश चाफले यांनी मानले. यशस्वीतेकरिता किशोर कडमधाड, चेतन नासरे, प्रभाकर बरगट, पळसराम जसुतकर, अंकीत, विजय बारई यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)