शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

वर्धा तालुक्यासह देवळी, आर्वी व हिंगणघाट तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. आर्वी तालुक्याच्या काही भागात जवळपास तासभर पाऊस पडल्याने रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. तालुक्यात बुधवारच्या रात्रीपासून तर पहाटेपर्यंत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती.

ठळक मुद्देकापूस भिजला : दिवसभर होते ढगाळी वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/आर्वी/वडनेर : निसर्गकोपातून सावरल्यानंतर गुलाबी बोंड अळीचा सामना करीत पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु असतानाच गुरुवारच्या पहाटे अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्रच कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. यामुळे शेतशिवारातील कापूस भिजला असून तूर, चना व गव्हाच्या पिकाचेही नुकसान झाले आहे. दिवसभऱ्याच्या ढगाळी वातावरणामुळे पुन्हा पावसाची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावला आहे.वर्धा तालुक्यासह देवळी, आर्वी व हिंगणघाट तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. आर्वी तालुक्याच्या काही भागात जवळपास तासभर पाऊस पडल्याने रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. तालुक्यात बुधवारच्या रात्रीपासून तर पहाटेपर्यंत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. शेतातील कापूसही ओला झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. पहाटेच्या पावसाने शेतकऱ्यांनी दिवस निघतातच शेताकडे धाव घेऊन शेताली जनावरांचे वैरण झाकण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, जनावरांचे वैरणही ओले झाल्याने शेतकऱ्यापुढे नवीन संकट उभे ठाकले आहे. अशीच परिस्थिती वडनेर परिसरातही असल्याने कापूस, गहू, तूर व चना पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आज दिवसभर ढगाळी वातावरण असल्याने पिकांवर किडीचा प्रादुर्भावही वाढण्याची दाट शक्यता आहे. तसेच पुन्हा पाऊस येण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता झळकत आहे. मागील चार वर्षांपासून शेतकºयांना सतत नापिकीचा सामना करावा लागत असल्याने आता जगावे की मरावे, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. देवळी तालुक्यातील चिकणी परिसरातही पावसाने दणका दिल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. पावसामुळे दिवसभर हवेत गारवा पसरला होता. शहरातील रस्तेही काही प्रमाणात सुनसान झाले होते. या थंडीचा अनेकांनी मजाही लुटला.

टॅग्स :Rainपाऊस