शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

आवडीच्या शिक्षणाला प्राधान्य द्या

By admin | Updated: May 27, 2014 01:04 IST

जग सुंदर आहे. याकडे पाहण्याची दृष्टी ही सकारात्मक असायला पाहिजे. यातूनच सृजनात्मक गुणांचा विकास घडून येतो. चाकोरीबद्ध शिक्षण प्रणाली असल्याने खरे

सेवाग्राम : जग सुंदर आहे. याकडे पाहण्याची दृष्टी ही सकारात्मक असायला पाहिजे. यातूनच सृजनात्मक गुणांचा विकास घडून येतो. चाकोरीबद्ध शिक्षण प्रणाली असल्याने खरे शिक्षण आपल्याला वातावरणातून आणि परिस्थितीतून प्राप्त होते. व्यक्ती स्वातंत्र्यता आपण जतन करताना सन्मान जोपासला पाहिजे, असे विचार राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजा अवसक यांनी शिबिराच्या समारोपप्रसंगी केले. १२ तास वेगवेगळ्या वातावरणातील संस्कारातील ही बालके १५ दिवस सोबत राहून जे शिकले ते कुठल्याही शाळेत हे ज्ञान त्यांना मिळणार नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि माणूस म्हणून जगण्यासाठी जे शिक्षण मिळते ते शिबिरातून पालकांनो स्पर्धेतून बाहेर पडा आणि आवडीच्या शिक्षणाला प्राधान्य द्या असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले. नई तालीम परिसरातील शांती भवन मध्ये प्राथमिक शिबिर आयोजित करण्यात आले होते. समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राजा अवसक तर अतिथी म्हणून नई तालीम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, डॉ. विभा गुप्ता व जि.प.सदस्य सुनिता ढवळे उपस्थित होत्या. उपस्थितांनी इ.डब्लु. आर्य नायकम, आशादेवी व पू. सानेगुरुजी यांच्या प्रतिमेला सूतमाळा अर्पण केली. ‘मन के विना से करते हे स्वागत’ या स्वागत गीत व पुष्प गुच्छाने मान्यवरांचे स्वागत केले. राजा अवसक म्हणाले, आजची मुलं हुशार आहेत. सर्व साधने त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. टी.व्ही.मुळे जग जवळ आलं पण घरातील संवाद मात्र कमी झाला. खेळण्याच्या, संवादाच्या वयातच ही मुलं पारखी झाली आणि हिंसात्मक दृष्ट्यातून चुकीच्या गोष्टी व्हायला लागल्या. फसव्या वातावरणात आपण जगत असून स्पर्धेच्या भयाने जीव घुसमटतो. स्पर्धा हा पशुंचा गुण पण आता तो मानवांचा बनला आहे. थोरा मोठ्यांच्या गोष्टी गीतांच्या माध्यमातून आणि महात्मा यांचा विचार अंगीकारा. यावेळी उपस्थित अतिथींनीही मार्गदर्शन केले. मठकरांनी स्वदेशी वस्तू वापराव्या अन्न,पाणी यांचा योग्य वापर करावा आणि प्रत्येकाखादी वस्त्र असावे असा आग्रह धरला. आदित्य अक्षद सोमनाथे, ओम काळे, राधिका, क्षितीज या बालकांनी तसेच पालक विजय धुमाळे यांनी मनोगत व्यक्त केले. समूह गीत व नाटके सादर करण्यात आली. ‘खेळ मांडला’ या ओम काळेच्या गीताने टाळया घेतल्या. योग, व्यायाम, स्वत:चे काम स्वत करणे, संगीत, गाणी, चित्रकला, कागद काम, हसत खेळत गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी व्यवस्थीत शिकणे, बोलणे, मनातील भीती घालविणे, सामान्य व्यवहार, मैदानी खेळ व कथा कथन असा दैनिक कार्यक्रम शिबिराचा होता. यावेळी गजेंद्र सुरकार, हरिष इथापे, डॉ. उल्हास जाजू, डॉ. शिवचरण ठाकूर, संजय आत्राम, गजानन अंबुलकर, अविनाश सोमनाथे, शरद ताकसांडे आदींनी मार्गदर्शन केले. ११ ते १३ या वयोगटातील ३७ मुल मुली सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शन डॉ. सुगन बरंठ यांनी केले. संचालन नितीन पाटील यांनी तर आभार पवन यांनी मानले. (वार्ताहर)