शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

‘विद्रोही’च्या सभामंडपात प्रीतीसंगम...

By गजानन चोपडे | Updated: February 5, 2023 14:50 IST

फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांपेक्षा केवळ जेवणाच्या मेन्यूवरच मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी भर दिल्याचा घणाघाती आरोपही विद्रोही संमेलनाच्या मंचावर करण्यात आला.

कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्यनगरी (वर्धा) : ज्या संमेलनाच्या उद्घाटन सत्रात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर सडकून टीका करण्यात आली, त्या संमेलनाच्या साहित्यनगरीला भेट देत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी वैचारिक प्रगल्भतेचा परिचय दिला. 

 फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांपेक्षा केवळ जेवणाच्या मेन्यूवरच मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी भर दिल्याचा घणाघाती आरोपही विद्रोही संमेलनाच्या मंचावर करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संमेलनाला हजेरी लावणाऱ्या साहित्यिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, अचानक दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि डॉ. अभय बंग यांनी थेट ‘विद्रोही’चा सभामंडप गाठला. या दोन्ही ज्येष्ठ साहित्यिकांना बघून आयोजकांना आश्चर्याचा धक्का बसला. दोघांचाही यावेळी सूतमाळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तिकीट लागतेय बावा... संमेलनाकडे रसिकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. वर्धेकरांचीही तोकडीच उपस्थिती दिसून येत आहे. वर्धेत स्वावलंबी मैदानावर दरवर्षी, लॉयन्स क्लबतर्फे अनेक कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमाला प्रवेशासाठी तिकीट आकारले जाते. त्यामुळे साहित्य संमेलनालाही तिकीट असल्याची धारणा वर्धेकरांची झाली आहे. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या दिवशीही साहित्य रसिकांची व श्रोत्यांची गर्दी संमेलनात दिसून आली नाही. शाळकरी मुलांना आणून संमेलनाची शोभा वाढविण्याचा प्रयत्न आयोजकांना करावा लागला. 

दुपारचे जेवण अन् परिसंवादात वामकुक्षी बहुतांश परिसंवादात श्रोत्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. त्यातच दुपारच्या जेवणानंतर काहीजण आसनांवरच वामकुक्षी घेत असल्याचे चित्र दिसून आले. परिसंवादापूर्वी वक्त्यांचा परिचय आणि स्वागत एवढे लांबले की उपस्थितांपैकी अनेकांनी सभा मंडपाबाहेर जाणे पसंत केले. काही माध्यम प्रतिनिधी वगळता परिसंवाद ऐकणारे फार कमी होते. त्यामुळे वक्त्यांचा जोशही कमी दिसून आला. 

भारुकाकांचे उपोषण विद्यार्थ्याची आत्महत्या रोखण्यासाठी आणि  त्यांना नवी प्रेरणा देण्यासाठी महेंद्र गौरीशंकर बैसाणे यांनी ‘भारूकाकाची पत्रे’ हे पुस्तक लिहिले आहे.  हे पुस्तक पालकांसह विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता शासनाने प्रयत्न करावे, यासाठी भारुकाकांची धडपड सुरू आहे. त्यांनी माजी संमेलनाध्यक्षांसह शासनाकडेही पाठपुरावा केला; पण त्यांना न्याय मिळाला नाही. अखेर त्यांनी साडेचार महिन्यांपासून आत्मक्लेश सुरू केला आहे. संमेलनस्थळीच सध्या आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनliteratureसाहित्य