शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘विद्रोही’च्या सभामंडपात प्रीतीसंगम...

By गजानन चोपडे | Updated: February 5, 2023 14:50 IST

फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांपेक्षा केवळ जेवणाच्या मेन्यूवरच मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी भर दिल्याचा घणाघाती आरोपही विद्रोही संमेलनाच्या मंचावर करण्यात आला.

कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्यनगरी (वर्धा) : ज्या संमेलनाच्या उद्घाटन सत्रात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर सडकून टीका करण्यात आली, त्या संमेलनाच्या साहित्यनगरीला भेट देत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी वैचारिक प्रगल्भतेचा परिचय दिला. 

 फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांपेक्षा केवळ जेवणाच्या मेन्यूवरच मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी भर दिल्याचा घणाघाती आरोपही विद्रोही संमेलनाच्या मंचावर करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संमेलनाला हजेरी लावणाऱ्या साहित्यिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, अचानक दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि डॉ. अभय बंग यांनी थेट ‘विद्रोही’चा सभामंडप गाठला. या दोन्ही ज्येष्ठ साहित्यिकांना बघून आयोजकांना आश्चर्याचा धक्का बसला. दोघांचाही यावेळी सूतमाळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तिकीट लागतेय बावा... संमेलनाकडे रसिकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. वर्धेकरांचीही तोकडीच उपस्थिती दिसून येत आहे. वर्धेत स्वावलंबी मैदानावर दरवर्षी, लॉयन्स क्लबतर्फे अनेक कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमाला प्रवेशासाठी तिकीट आकारले जाते. त्यामुळे साहित्य संमेलनालाही तिकीट असल्याची धारणा वर्धेकरांची झाली आहे. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या दिवशीही साहित्य रसिकांची व श्रोत्यांची गर्दी संमेलनात दिसून आली नाही. शाळकरी मुलांना आणून संमेलनाची शोभा वाढविण्याचा प्रयत्न आयोजकांना करावा लागला. 

दुपारचे जेवण अन् परिसंवादात वामकुक्षी बहुतांश परिसंवादात श्रोत्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. त्यातच दुपारच्या जेवणानंतर काहीजण आसनांवरच वामकुक्षी घेत असल्याचे चित्र दिसून आले. परिसंवादापूर्वी वक्त्यांचा परिचय आणि स्वागत एवढे लांबले की उपस्थितांपैकी अनेकांनी सभा मंडपाबाहेर जाणे पसंत केले. काही माध्यम प्रतिनिधी वगळता परिसंवाद ऐकणारे फार कमी होते. त्यामुळे वक्त्यांचा जोशही कमी दिसून आला. 

भारुकाकांचे उपोषण विद्यार्थ्याची आत्महत्या रोखण्यासाठी आणि  त्यांना नवी प्रेरणा देण्यासाठी महेंद्र गौरीशंकर बैसाणे यांनी ‘भारूकाकाची पत्रे’ हे पुस्तक लिहिले आहे.  हे पुस्तक पालकांसह विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता शासनाने प्रयत्न करावे, यासाठी भारुकाकांची धडपड सुरू आहे. त्यांनी माजी संमेलनाध्यक्षांसह शासनाकडेही पाठपुरावा केला; पण त्यांना न्याय मिळाला नाही. अखेर त्यांनी साडेचार महिन्यांपासून आत्मक्लेश सुरू केला आहे. संमेलनस्थळीच सध्या आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनliteratureसाहित्य