शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे प्रिस्क्रीप्शन योजनेला हरताळ

By admin | Updated: October 30, 2014 22:56 IST

शासनाच्या आरोग्य विभागाने गाजावाजा करून चिठ्ठीमुक्त दवाखाना ही योजना सुरू केली़ यासाठी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत औषधी साठा उपलब्ध करून देण्यात आला;

आकोली : शासनाच्या आरोग्य विभागाने गाजावाजा करून चिठ्ठीमुक्त दवाखाना ही योजना सुरू केली़ यासाठी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत औषधी साठा उपलब्ध करून देण्यात आला; पण काही दिवस लोटले असतानाच झिरो प्रिस्क्रीप्शन योजनेला हरताळ फासला जात असल्याचे दिसते़ आंजी (मोठी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी साठा उपलब्ध नसल्याने औषधांची चिठ्ठी लिहून दिली जात असल्याचे समोर आले़ यामुळे चिठ्ठीमुक्त दवाखान्याचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ चिट्ठीमुक्त दवाखाना (झिरो प्रिस्क्रीप्शन) ही योजना सध्या वांझोटीच ठरली आहे़ आंजीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साधे खोकल्याचे औषधही उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे़ यामुळे सामान्य रुग्णांना बाहेरून औषधी विकत घ्यावी लागत आहे़ शासनाच्या योजना ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ अशी झाली आहे़ लोकाभिमुख योजनांची घोषणा केली जाते; पण अंमलबजावणी शून्य असते़ यामुळे सामान्यांना योजनांचा लाभ होत नाही़ अशीच अवस्था शासनाच्या झिरो प्रिस्क्रीप्शन या योजनेची झाली आहे. रुग्णांना बाहेरून महागडी औषधी खरेदी करावी लागू नये म्हणून ही योजना राबविण्यात आली होती़ मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी व गाजावाजा करण्यात आला; पण ढिसाळ नियोजनामुळे सामान्यांना दिलासा देणारी ही योजना आचके देत असल्याचे दिसते़ गोरगरीबांसाठी राबविण्यात येणाऱ्या बहुतांश योजना कागदावरच राबविल्या जात असल्याचे वास्तव आहे. राजू परीहार रा. सुकळी (बाई) हे आंजी (मोठी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले होते. त्यांना ताप व खोकल्याचा आजार होता. डॉक्टरांनी त्यांना चार गोळ्या दिल्या आणि खोकल्याचे औषध औषधी दुकानातून विकत घेण्याकरिता चिट्ठी लिहून दिली. वास्तविक, दवाखान्यात औषधी उपलब्ध नसेल तर कर्मचाऱ्यांकरवी औषधी दुकानातून औषध विकत घेऊन रुग्णांना द्यायचे आहे. यासाठी निधीची तरतूदही करण्यात आलेली आहे; पण सामान्य रुग्णांना योजनेचा लाभ मिळू नये, याकरिताच यंत्रणा राबताना दिसते. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत आरोग्यसेवेचा विशेष लाभ होताना दिसत नाही़ आंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रातूनच औषधी उपलब्ध करून द्यावी, तेथील कारभारात सुसुत्रता आणावी आणि रुग्णांची हेळसांड थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांद्वारे करण्यात आली आहे़(वार्ताहर)