शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठा खंडितच; लागवड केलेले अद्रक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:16 IST

पढेगाव, चिकणीसह संपूर्ण जिल्ह्याला मंगळवारी वादळीवाऱ्याने तडाखा दिला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याकरिता नुकसानभरपाईची मागणी केली गेली. महसूल विभागाने याची नोंद घेतली.

ठळक मुद्देकृषिपंप जोडणी तुटल्या, खांबही वाकले : शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान होण्याच्या मार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : पढेगाव, चिकणीसह संपूर्ण जिल्ह्याला मंगळवारी वादळीवाऱ्याने तडाखा दिला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याकरिता नुकसानभरपाईची मागणी केली गेली. महसूल विभागाने याची नोंद घेतली. तसेच खासदार, आमदारांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणीसुद्धा केली. मात्र, अद्याप वीजपुरवठा पूर्णत: सुरळीत झालेला नाही. यामुळे अद्रक लागवड धोक्यात आली आहे.जिल्ह्यातील पढेगाव येथील शेतकरी सुरेश बापुराव महाकाळकार यांनी १ जून ला मौजा (धोत्रा रेल्वे) शिवारात ओलीताखाली असलेल्या ०.५० हे.आर. शेतात अद्रकाची लागवड केली. याकरिता त्यांना १२ क्विंटल अद्रकाचे बेणे लागले. बेण्यांसह त्यांना दीड लाख रूपये खर्च आला. यावर्षी अद्रकाचे विक्रमी उत्पन्न घेण्याचे स्वप्न धुळीस मिळाल्याचे महाकाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.१ जूनला लागवड केलेल्या अद्रकाच्या शेताला पाण्याची नितांत गरज असतानाच ४ जूनला झालेल्या वादळीवाऱ्यामुळे कृषिपंपाला वीज पुरवठा करणाºया तारा तुटल्या, खांबही वाकलेत. यामुळे महाकाळकर यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे लागवड झालेले अद्रक पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. याकरिता सदर शेतकºयाने सावंगी (मेघे) येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात तक्रार दाखल केली. परंतु, अद्यापही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.दोन दिवसात जर अद्रक लागवड केलेल्या शेताला पाणी मिळाले नाही तर मोठे नुकसान होईल.- सुरेश महाकाळकर, पढेगाव.