शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

वीज खांब झुकले, तारा तुटलेल्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:06 IST

शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांचा नेहमीच सामना करावा लागतो. याचाच प्रत्यय सध्या तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील शेतकऱ्यांना येत आहे. पावसाने दहा दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी सिंचन करून पिके वाचवू शकले असते; पण वादळी पावसात वाकलेले खांब व तुटलेल्या तारांची अद्याप दुरूस्ती करण्यात आली नाही.

ठळक मुद्देसोनेगाव (बाई) येथील प्रकार : महावितरणचे दुर्लक्ष, बीजांकूर कोमेजले

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांचा नेहमीच सामना करावा लागतो. याचाच प्रत्यय सध्या तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील शेतकऱ्यांना येत आहे. पावसाने दहा दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी सिंचन करून पिके वाचवू शकले असते; पण वादळी पावसात वाकलेले खांब व तुटलेल्या तारांची अद्याप दुरूस्ती करण्यात आली नाही. यामुळे आठ दिवसांपासून सिंचन ठप्प आहे. परिणामी, जमिनीतील बिजांकूरही कोमेजले आहे.यंदा मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सतत पाच-सहा दिवस दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. विशेषत: ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, त्याच शेतकऱ्यांनी पेरणी केली. सोनेगाव (बाई) येथील सिंचनाची सोय असलेल्या असंख्य शेतकºयांनी कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. दहा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी सिंचनाच्या तयारीत आहे; पण पहिल्या पावसात वादळाने वाकलेले वीज खांब व तुटलेल्या तारा महावितरणने अद्याप दुरूस्त केल्या नाहीत. यामुळे सिंचन व्यवस्था कोलमडली आहे. वारंवार महावितरण कार्यालयात सूचना व तक्रार करूनही दुरूस्ती करण्यात आली नाही. महावितरणच्यास या कोटगेपणामुळे सिंचन व्यवस्था असताना शेतकऱ्यांना लाखमोलाची पिके वाचविता येत नाही. डोळ्यादेखत बिजांकूर कोमेजताना पाहून शेतकऱ्यांचे काळीज धडधडत आहे.आठ दिवसांपासून महावितरणने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने शेत शिवारात विद्युत खांब झुकलेले तथा ठिकठिकाणी तारा तुटल्याचे दिसून येत आहे. या तारा व वाकलेल्या खांबांमुळे शेतीची कामेही खोळंबली आहेत. कृषी पंप बंद असल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. महावितरणने याकडे लक्ष देत त्वरित लवकरात लवकर दुरूस्ती करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.दुरूस्तीचा दिवस उजाडेच नाजिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचे दमदार हजेरी लावली. यातच वादळी वाऱ्यामुळे देवळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विद्युत खांब झुकले. शिवाय तारा तुटल्याने शेतशिवारांतील विद्युत प्रवाह खंडित झाला. सोनेगाव बाई येथील शेतांतील कृषी पंपांचा विद्युत पुरवठा आठ दिवसांपासून बंद आहे. अनेक ठिकाणी वीज खांब झुकले असून तारा तुटलेल्या आहेत. शेतांमध्ये खांब व तारा असल्याने शेतीची कामे करणेही कठीण झाले आहे. याबाबत तक्रारी करूनही दुरूस्ती होत नसल्याने असंतोष पसरला आहे. वायगांव येथील विद्युत कार्यालयात तक्रार करायला गेल्यावर उद्या दुरूस्ती करून देतो, असे सांगितले जाते; पण सहा दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा दुरूस्तीचा दिवसच उजाडला नाही. यामुळे शेतकरी मात्र त्रस्त आहे.

टॅग्स :electricityवीजDeoliदेवळी