शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

वीज खांब झुकले, तारा तुटलेल्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:06 IST

शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांचा नेहमीच सामना करावा लागतो. याचाच प्रत्यय सध्या तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील शेतकऱ्यांना येत आहे. पावसाने दहा दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी सिंचन करून पिके वाचवू शकले असते; पण वादळी पावसात वाकलेले खांब व तुटलेल्या तारांची अद्याप दुरूस्ती करण्यात आली नाही.

ठळक मुद्देसोनेगाव (बाई) येथील प्रकार : महावितरणचे दुर्लक्ष, बीजांकूर कोमेजले

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांचा नेहमीच सामना करावा लागतो. याचाच प्रत्यय सध्या तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील शेतकऱ्यांना येत आहे. पावसाने दहा दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी सिंचन करून पिके वाचवू शकले असते; पण वादळी पावसात वाकलेले खांब व तुटलेल्या तारांची अद्याप दुरूस्ती करण्यात आली नाही. यामुळे आठ दिवसांपासून सिंचन ठप्प आहे. परिणामी, जमिनीतील बिजांकूरही कोमेजले आहे.यंदा मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सतत पाच-सहा दिवस दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. विशेषत: ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, त्याच शेतकऱ्यांनी पेरणी केली. सोनेगाव (बाई) येथील सिंचनाची सोय असलेल्या असंख्य शेतकºयांनी कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. दहा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी सिंचनाच्या तयारीत आहे; पण पहिल्या पावसात वादळाने वाकलेले वीज खांब व तुटलेल्या तारा महावितरणने अद्याप दुरूस्त केल्या नाहीत. यामुळे सिंचन व्यवस्था कोलमडली आहे. वारंवार महावितरण कार्यालयात सूचना व तक्रार करूनही दुरूस्ती करण्यात आली नाही. महावितरणच्यास या कोटगेपणामुळे सिंचन व्यवस्था असताना शेतकऱ्यांना लाखमोलाची पिके वाचविता येत नाही. डोळ्यादेखत बिजांकूर कोमेजताना पाहून शेतकऱ्यांचे काळीज धडधडत आहे.आठ दिवसांपासून महावितरणने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने शेत शिवारात विद्युत खांब झुकलेले तथा ठिकठिकाणी तारा तुटल्याचे दिसून येत आहे. या तारा व वाकलेल्या खांबांमुळे शेतीची कामेही खोळंबली आहेत. कृषी पंप बंद असल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. महावितरणने याकडे लक्ष देत त्वरित लवकरात लवकर दुरूस्ती करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.दुरूस्तीचा दिवस उजाडेच नाजिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचे दमदार हजेरी लावली. यातच वादळी वाऱ्यामुळे देवळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विद्युत खांब झुकले. शिवाय तारा तुटल्याने शेतशिवारांतील विद्युत प्रवाह खंडित झाला. सोनेगाव बाई येथील शेतांतील कृषी पंपांचा विद्युत पुरवठा आठ दिवसांपासून बंद आहे. अनेक ठिकाणी वीज खांब झुकले असून तारा तुटलेल्या आहेत. शेतांमध्ये खांब व तारा असल्याने शेतीची कामे करणेही कठीण झाले आहे. याबाबत तक्रारी करूनही दुरूस्ती होत नसल्याने असंतोष पसरला आहे. वायगांव येथील विद्युत कार्यालयात तक्रार करायला गेल्यावर उद्या दुरूस्ती करून देतो, असे सांगितले जाते; पण सहा दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा दुरूस्तीचा दिवसच उजाडला नाही. यामुळे शेतकरी मात्र त्रस्त आहे.

टॅग्स :electricityवीजDeoliदेवळी