शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

वीज खांब झुकले, तारा तुटलेल्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:06 IST

शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांचा नेहमीच सामना करावा लागतो. याचाच प्रत्यय सध्या तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील शेतकऱ्यांना येत आहे. पावसाने दहा दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी सिंचन करून पिके वाचवू शकले असते; पण वादळी पावसात वाकलेले खांब व तुटलेल्या तारांची अद्याप दुरूस्ती करण्यात आली नाही.

ठळक मुद्देसोनेगाव (बाई) येथील प्रकार : महावितरणचे दुर्लक्ष, बीजांकूर कोमेजले

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांचा नेहमीच सामना करावा लागतो. याचाच प्रत्यय सध्या तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील शेतकऱ्यांना येत आहे. पावसाने दहा दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी सिंचन करून पिके वाचवू शकले असते; पण वादळी पावसात वाकलेले खांब व तुटलेल्या तारांची अद्याप दुरूस्ती करण्यात आली नाही. यामुळे आठ दिवसांपासून सिंचन ठप्प आहे. परिणामी, जमिनीतील बिजांकूरही कोमेजले आहे.यंदा मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सतत पाच-सहा दिवस दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. विशेषत: ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, त्याच शेतकऱ्यांनी पेरणी केली. सोनेगाव (बाई) येथील सिंचनाची सोय असलेल्या असंख्य शेतकºयांनी कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. दहा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी सिंचनाच्या तयारीत आहे; पण पहिल्या पावसात वादळाने वाकलेले वीज खांब व तुटलेल्या तारा महावितरणने अद्याप दुरूस्त केल्या नाहीत. यामुळे सिंचन व्यवस्था कोलमडली आहे. वारंवार महावितरण कार्यालयात सूचना व तक्रार करूनही दुरूस्ती करण्यात आली नाही. महावितरणच्यास या कोटगेपणामुळे सिंचन व्यवस्था असताना शेतकऱ्यांना लाखमोलाची पिके वाचविता येत नाही. डोळ्यादेखत बिजांकूर कोमेजताना पाहून शेतकऱ्यांचे काळीज धडधडत आहे.आठ दिवसांपासून महावितरणने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने शेत शिवारात विद्युत खांब झुकलेले तथा ठिकठिकाणी तारा तुटल्याचे दिसून येत आहे. या तारा व वाकलेल्या खांबांमुळे शेतीची कामेही खोळंबली आहेत. कृषी पंप बंद असल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. महावितरणने याकडे लक्ष देत त्वरित लवकरात लवकर दुरूस्ती करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.दुरूस्तीचा दिवस उजाडेच नाजिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचे दमदार हजेरी लावली. यातच वादळी वाऱ्यामुळे देवळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विद्युत खांब झुकले. शिवाय तारा तुटल्याने शेतशिवारांतील विद्युत प्रवाह खंडित झाला. सोनेगाव बाई येथील शेतांतील कृषी पंपांचा विद्युत पुरवठा आठ दिवसांपासून बंद आहे. अनेक ठिकाणी वीज खांब झुकले असून तारा तुटलेल्या आहेत. शेतांमध्ये खांब व तारा असल्याने शेतीची कामे करणेही कठीण झाले आहे. याबाबत तक्रारी करूनही दुरूस्ती होत नसल्याने असंतोष पसरला आहे. वायगांव येथील विद्युत कार्यालयात तक्रार करायला गेल्यावर उद्या दुरूस्ती करून देतो, असे सांगितले जाते; पण सहा दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा दुरूस्तीचा दिवसच उजाडला नाही. यामुळे शेतकरी मात्र त्रस्त आहे.

टॅग्स :electricityवीजDeoliदेवळी