शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

रबी हंगामावर वीज तुटीचे सावट

By admin | Updated: October 15, 2015 02:22 IST

खरीप हंगाम संपून रबी सुरू होत आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत.

सिंचन प्रभावित : दिवसाला केवळ आठ तास वीजपुरवठावर्धा : खरीप हंगाम संपून रबी सुरू होत आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा हंगाम महत्त्वाचा असतो; पण जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिवसाला केवळ आठ तास वीज मिळत असल्याचे वास्तव आहे. यामुळे रबीची पेरणी कशी करावी आणि खरीपातील कपाशी कशी जगवावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे. ओलिताशिवाय दुबार पीक शेतकरी घेऊ शकत नाही. शिवाय खरीपातील पिकेही हमखास हाती यावी, ही अपेक्षाही ओलिताशिवाय शक्य नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सिंचित शेतीकडे वळला आहे. अनेकांनी विहिरी व कुपनलिका खोदल्या आहेत तर अनेक शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या पाण्यातून ओलिताची सोय झाली आहे. या सिंचनाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आत्यंतिक आवश्यकता असते ती विजेची!जिल्ह्यात तीन झोननुसार वीज पुरवठ्याचे वेगवेगळे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. याचा आढावा घेतला असता दिवसाला शेतकऱ्यांना केवळ आठच तास वीज पुरवठा होत असल्याचे वास्तव आहे. यात आठवड्यातून चार दिवस सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ पर्यंतच वीज पुरवठा केला जातो तर उर्वरित तीन दिवस रात्री ११.४५ ते सकाळी ९.४५ या वेळेत वीज पुरवठा केला जातो. त्यातही हा पुरवठा सुरळीत न राहता तो वारंवार खंडित होत असतो. त्याची दुरूस्तीही लवकर होत नाही. बुधवार हा तर शेतकऱ्यांसाठी ‘काळा दिवस’, असाच असतो. या दिवशी बरेचदा ब्रेकडाऊन केले जाते. यामुळे बुधवारी दिवसा वीज पुरवठा होत असतानाही त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही. यामुळे पाणी असताना विजेअभावी कपाशी सध्या मान खाली टाकत आहे. खरीपाचीच ही गत तर रबी पिकांचे ओलित कसे करावे आणि पिके कशी जगवावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यामुळे किमान १६ तास वीज पुरवठा देणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)कपाशीला पाण्याची गरजकापूस निघणे आता सुरू झाले आहे. अनेक ठिकाणी शीतदही आटोपून कापूस वेचायलाही सुरुवात झाली आहे; पण उन्ह चांगलेच तापत असल्याने समाधानकारक उत्पादन हाती येण्यासाठी कपाशीलाही पाणी देणे गरजेचे झाले आहे. शिवाय पिकांना चांगले ओलित होण्यासाठी अखंडित वीज पुरवठा मिळणे गरजेचे आहे; पण दिवसाला आठच तास आणि त्यातही चारच दिवस दिवसा वीज मिळत असल्याने पिके कशी जगवावी आणि उत्पन्नात कशी वाढ करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे. रबी हंगाम कसा सावरायचा?रबी हंगाम हा पूर्णत: सिंचनावर अवलंबून असतो. त्यातही उसपिकांचे क्षेत्र जिल्ह्यात काही भागात वाढत आहे. लवकरच गहू, हरभरा, चना आदी पिकांची लागवड केली जाणार आहे. अनेकांनी सोयाबीन सवंगून रबीची तयारीही सुरू केली आहे. पण वीजपुरवठा आज सकाळी तर उद्या रात्री असाच राहिला तर पिके कशी जगवावी हा प्रश्न आहे. रबी पिकांना पाण्याची आत्यंतिक गरज असून आठ तासात पाणी कसे ओलवावे ही चिंता शेतकरी वर्गाला सतावत आहे. ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन हवेतचवर्धा जिल्ह्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. यात कोरडवाहूसोबतच बागायती शेतकरीही आहेत. त्यामुळे या आत्महत्या कमी व्हाव्या यासाठी महाराष्टाचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना १६ तास वीज मिळेल, असे जाहीर केले होते; पण नेत्यांची आश्वासने ही हवेत विरण्यासाठीच असतात, याचा प्रत्यय शेतकऱ्यांना येत आहे. १६ तर नाहीच; पण आठ तास मिळणारी वीजही अखंडित मिळत नाही. यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. आत्महत्या थांबविण्याचे त्यांचे प्रयत्नही फसवे असल्याचा आरोपही शेतकऱ्यांतून केला जात आहे.