शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

रबी हंगामावर वीज तुटीचे सावट

By admin | Updated: October 15, 2015 02:22 IST

खरीप हंगाम संपून रबी सुरू होत आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत.

सिंचन प्रभावित : दिवसाला केवळ आठ तास वीजपुरवठावर्धा : खरीप हंगाम संपून रबी सुरू होत आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा हंगाम महत्त्वाचा असतो; पण जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिवसाला केवळ आठ तास वीज मिळत असल्याचे वास्तव आहे. यामुळे रबीची पेरणी कशी करावी आणि खरीपातील कपाशी कशी जगवावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे. ओलिताशिवाय दुबार पीक शेतकरी घेऊ शकत नाही. शिवाय खरीपातील पिकेही हमखास हाती यावी, ही अपेक्षाही ओलिताशिवाय शक्य नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सिंचित शेतीकडे वळला आहे. अनेकांनी विहिरी व कुपनलिका खोदल्या आहेत तर अनेक शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या पाण्यातून ओलिताची सोय झाली आहे. या सिंचनाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आत्यंतिक आवश्यकता असते ती विजेची!जिल्ह्यात तीन झोननुसार वीज पुरवठ्याचे वेगवेगळे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. याचा आढावा घेतला असता दिवसाला शेतकऱ्यांना केवळ आठच तास वीज पुरवठा होत असल्याचे वास्तव आहे. यात आठवड्यातून चार दिवस सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ पर्यंतच वीज पुरवठा केला जातो तर उर्वरित तीन दिवस रात्री ११.४५ ते सकाळी ९.४५ या वेळेत वीज पुरवठा केला जातो. त्यातही हा पुरवठा सुरळीत न राहता तो वारंवार खंडित होत असतो. त्याची दुरूस्तीही लवकर होत नाही. बुधवार हा तर शेतकऱ्यांसाठी ‘काळा दिवस’, असाच असतो. या दिवशी बरेचदा ब्रेकडाऊन केले जाते. यामुळे बुधवारी दिवसा वीज पुरवठा होत असतानाही त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही. यामुळे पाणी असताना विजेअभावी कपाशी सध्या मान खाली टाकत आहे. खरीपाचीच ही गत तर रबी पिकांचे ओलित कसे करावे आणि पिके कशी जगवावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यामुळे किमान १६ तास वीज पुरवठा देणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)कपाशीला पाण्याची गरजकापूस निघणे आता सुरू झाले आहे. अनेक ठिकाणी शीतदही आटोपून कापूस वेचायलाही सुरुवात झाली आहे; पण उन्ह चांगलेच तापत असल्याने समाधानकारक उत्पादन हाती येण्यासाठी कपाशीलाही पाणी देणे गरजेचे झाले आहे. शिवाय पिकांना चांगले ओलित होण्यासाठी अखंडित वीज पुरवठा मिळणे गरजेचे आहे; पण दिवसाला आठच तास आणि त्यातही चारच दिवस दिवसा वीज मिळत असल्याने पिके कशी जगवावी आणि उत्पन्नात कशी वाढ करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे. रबी हंगाम कसा सावरायचा?रबी हंगाम हा पूर्णत: सिंचनावर अवलंबून असतो. त्यातही उसपिकांचे क्षेत्र जिल्ह्यात काही भागात वाढत आहे. लवकरच गहू, हरभरा, चना आदी पिकांची लागवड केली जाणार आहे. अनेकांनी सोयाबीन सवंगून रबीची तयारीही सुरू केली आहे. पण वीजपुरवठा आज सकाळी तर उद्या रात्री असाच राहिला तर पिके कशी जगवावी हा प्रश्न आहे. रबी पिकांना पाण्याची आत्यंतिक गरज असून आठ तासात पाणी कसे ओलवावे ही चिंता शेतकरी वर्गाला सतावत आहे. ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन हवेतचवर्धा जिल्ह्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. यात कोरडवाहूसोबतच बागायती शेतकरीही आहेत. त्यामुळे या आत्महत्या कमी व्हाव्या यासाठी महाराष्टाचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना १६ तास वीज मिळेल, असे जाहीर केले होते; पण नेत्यांची आश्वासने ही हवेत विरण्यासाठीच असतात, याचा प्रत्यय शेतकऱ्यांना येत आहे. १६ तर नाहीच; पण आठ तास मिळणारी वीजही अखंडित मिळत नाही. यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. आत्महत्या थांबविण्याचे त्यांचे प्रयत्नही फसवे असल्याचा आरोपही शेतकऱ्यांतून केला जात आहे.