शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

वीज मंडळ कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड बेकायदेशीर ट्रस्टमध्ये पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:58 IST

२००५ मध्ये महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाचे विभाजन करण्यात आले. मात्र मागील १३ वर्षांपासून बंद आस्थापनेच्या नावावर प्रॉव्हीडंट फंड पडून आहे, अशी माहिती अधिकारातून घेतलेल्या दस्ताऐवजातून पुढे आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : २००५ मध्ये महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाचे विभाजन करण्यात आले. त्यानंतर हे महामंडळ चार कंपन्यांमध्ये विभाजीत करण्यात आले. त्यामुळे २००५ पासून नवी कंपनी अस्तित्वात आली. या चार कंपन्यांचा ट्रस्ट तयार करून कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हीडंट फंड शासन मान्यतेनंतर जमा करणे आवश्यक होते. मात्र बेकायदेशीरपणे मागील १३ वर्षांपासून बंद आस्थापनेच्या नावावर प्रॉव्हीडंट फंड पडून आहे, अशी माहिती अधिकारातून घेतलेल्या दस्ताऐवजातून पुढे आली आहे.केंद्रसरकारने १८६ उद्योगातील कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देण्याच्या दृष्टीकोणातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतूदी कायदा १९५१ अमलात आणून त्याअंतर्गत कर्मचारी भविष्य निधी संघटना तयार केली. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत देखरेख आणि योग्य अंमलबजावणीची जबाबदारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे दिली. परंतु ज्या उद्देशाने संघटनेची स्थापना झाली आणि जे कर्तव्य पार पाडावयास हवे होते, ते पाडण्यात आले नाही. सवलत प्राप्त आस्थापणा कायद्याच्या चौकटीत काम करतात किंवा नाही. कामगारांच्या पगारातून जमा होणारा प्रॉव्हीडंट फंड सुरक्षीत आहे किंवा नाही, हे पाहण्याचे काम भविष्य निर्वाह निधी संघटनेचे आहे. तसेच सुटप्राप्त आस्थापनांचे ट्रस्ट जर कायद्याप्रमाणे काम करीत नसेल तर त्यांना मिळालेले सवलत रद्द करण्याची व ते आपल्या ताब्यात घेण्याचे अधिकार केंद्रीय प्रॉव्हीडंट फंड तसेच विभागीय प्रॉव्हीडंट फंड आयुक्त यांना आहे, अशी माहिती लोकमतशी बोलताना निवृत्त वेतन योजना १९९५ राष्ट्रीय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे यांनी दिली. महाराष्ट्रातील वीज महामंडळ २००५ मध्ये बंद झाले. त्यामुळे बंद झालेल्या महामंडळाला सवलत मान्यता लागू होत नाही. त्यानंतर चार कंपन्या निर्मिती पारेशन वितरण व सूत्रधार कंपनी यांना स्वत:चा ट्रस्ट करून सवलत मिळविण्यासाठी सरकारची मान्यता घेणे आवश्यक होते. मात्र असा कोणताही प्रस्ताव सादर करण्यात आला नाही. जुन्याच वीज मंडळाच्या ट्रस्टच्या देखरेखीखाली मागील तेरा वर्षांपासून बेकायदेशीरपणे काम सुरू आहे. बंद झालेल्या आस्थापनेच्या नावावर ट्रस्ट सुरू आहे. याबाबत प्रॉव्हीडंट फंड आयुक्तांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची बेकायदेशीर ट्रस्ट ईपीएफओ ने ताब्यात घेवून संबंधीताविरूध्द फौजदारी गुन्हा नोंदविणे आवश्यक आहे. या चारही कंपन्यांचे ट्रस्ट नसल्याने सर्व कामावर असलेल्या व निवृत्त झालेल्या कामगारांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाभ मिळणार आहे.- प्रकाश येंडे, राष्ट्रीय अध्यक्ष, निवृत्त वेतन योजना, राष्ट्रीय समन्वयक समिती.

टॅग्स :electricityवीज