शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वीज मंडळ कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड बेकायदेशीर ट्रस्टमध्ये पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:58 IST

२००५ मध्ये महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाचे विभाजन करण्यात आले. मात्र मागील १३ वर्षांपासून बंद आस्थापनेच्या नावावर प्रॉव्हीडंट फंड पडून आहे, अशी माहिती अधिकारातून घेतलेल्या दस्ताऐवजातून पुढे आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : २००५ मध्ये महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाचे विभाजन करण्यात आले. त्यानंतर हे महामंडळ चार कंपन्यांमध्ये विभाजीत करण्यात आले. त्यामुळे २००५ पासून नवी कंपनी अस्तित्वात आली. या चार कंपन्यांचा ट्रस्ट तयार करून कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हीडंट फंड शासन मान्यतेनंतर जमा करणे आवश्यक होते. मात्र बेकायदेशीरपणे मागील १३ वर्षांपासून बंद आस्थापनेच्या नावावर प्रॉव्हीडंट फंड पडून आहे, अशी माहिती अधिकारातून घेतलेल्या दस्ताऐवजातून पुढे आली आहे.केंद्रसरकारने १८६ उद्योगातील कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देण्याच्या दृष्टीकोणातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतूदी कायदा १९५१ अमलात आणून त्याअंतर्गत कर्मचारी भविष्य निधी संघटना तयार केली. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत देखरेख आणि योग्य अंमलबजावणीची जबाबदारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे दिली. परंतु ज्या उद्देशाने संघटनेची स्थापना झाली आणि जे कर्तव्य पार पाडावयास हवे होते, ते पाडण्यात आले नाही. सवलत प्राप्त आस्थापणा कायद्याच्या चौकटीत काम करतात किंवा नाही. कामगारांच्या पगारातून जमा होणारा प्रॉव्हीडंट फंड सुरक्षीत आहे किंवा नाही, हे पाहण्याचे काम भविष्य निर्वाह निधी संघटनेचे आहे. तसेच सुटप्राप्त आस्थापनांचे ट्रस्ट जर कायद्याप्रमाणे काम करीत नसेल तर त्यांना मिळालेले सवलत रद्द करण्याची व ते आपल्या ताब्यात घेण्याचे अधिकार केंद्रीय प्रॉव्हीडंट फंड तसेच विभागीय प्रॉव्हीडंट फंड आयुक्त यांना आहे, अशी माहिती लोकमतशी बोलताना निवृत्त वेतन योजना १९९५ राष्ट्रीय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे यांनी दिली. महाराष्ट्रातील वीज महामंडळ २००५ मध्ये बंद झाले. त्यामुळे बंद झालेल्या महामंडळाला सवलत मान्यता लागू होत नाही. त्यानंतर चार कंपन्या निर्मिती पारेशन वितरण व सूत्रधार कंपनी यांना स्वत:चा ट्रस्ट करून सवलत मिळविण्यासाठी सरकारची मान्यता घेणे आवश्यक होते. मात्र असा कोणताही प्रस्ताव सादर करण्यात आला नाही. जुन्याच वीज मंडळाच्या ट्रस्टच्या देखरेखीखाली मागील तेरा वर्षांपासून बेकायदेशीरपणे काम सुरू आहे. बंद झालेल्या आस्थापनेच्या नावावर ट्रस्ट सुरू आहे. याबाबत प्रॉव्हीडंट फंड आयुक्तांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची बेकायदेशीर ट्रस्ट ईपीएफओ ने ताब्यात घेवून संबंधीताविरूध्द फौजदारी गुन्हा नोंदविणे आवश्यक आहे. या चारही कंपन्यांचे ट्रस्ट नसल्याने सर्व कामावर असलेल्या व निवृत्त झालेल्या कामगारांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाभ मिळणार आहे.- प्रकाश येंडे, राष्ट्रीय अध्यक्ष, निवृत्त वेतन योजना, राष्ट्रीय समन्वयक समिती.

टॅग्स :electricityवीज