शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टाच्या कारभाराने खातेदार त्रस्त

By admin | Updated: October 18, 2014 23:46 IST

स्थानिक पोस्ट कार्यालयात ढिसाळ कारभार सुरू आहे. यामुळे अनेक गावांतील खातेदार त्रस्त झाले आहेत. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचीही फरफट होत असल्याने असंतोष पसरला आहे.

सुधीर खडसे - समुद्रपूरस्थानिक पोस्ट कार्यालयात ढिसाळ कारभार सुरू आहे. यामुळे अनेक गावांतील खातेदार त्रस्त झाले आहेत. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचीही फरफट होत असल्याने असंतोष पसरला आहे. येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, शाळा, महाविद्यालये असून १० हजारांच्या वर लोकसंख्या आहे. लवकरच या ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतरही होणार आहे. यामुळे येथील शासकीय कार्यालयांच्या कारभारात सुसूत्रता येणे गरजेचे आहे. पोस्टाच्या कारभाराकडे संबंधितांनी लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. मोठी लोकवस्ती असल्याने तसेच तालुक्याचे ठिकाण असल्याने येथील पोस्टाचे खातेदार अधिक आहेत; पण या खातेदारांना कार्यालयातील गलथान कारभारामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पोस्ट कार्यालयांतर्गत जिल्हा कार्यालयात प्रत्येक खातेदाराचे बचत खाते असून ठेवीचा व व्याजाचा हिशेब जिल्हास्तरावरून निघतो. बचत खात्यात जमा असलेल्या रकमेवर दरवर्षी व्याज जमा होणे गरजेचे आहे; पण तीन ते चार वर्षांपर्यंत जमा रकमेवर व्याज जमा होत नसल्याची ओरड होत आहे. व्याजाकरिता ग्रामीण भागातील पोस्ट कार्यालय जिल्हा पोस्ट कार्यालयाकडे खाते पुस्तक व्याज नोंदीसाठी पाठविते; पण यावर्षी त्या पुस्तकात जमा करण्यात आलेले व्याज कोणत्या वर्षाचे आहे, याचे निदान लागत नाही. वास्तविक, दरवर्षी जमा रकमेवर व्याज जमा होणे गरजेचे आहे. दोन ते तीन महिन्यांनंतर खातेपुस्तक खातेदारांच्या हातात पडते, तेव्हा त्या पुस्तकात विविध प्रकारच्या घोडचुका आढळून येत असल्याचा आरोप खातेदार करीत आहेत. पोस्ट कार्यालयानेही आता संगणकीकृत कारभार सुरू केला आहे. यामुळे बचत खात्यावर संगणकाच्या माध्यमातून व्याजासह रक्कम जमा होते. यावर्षी बचत खातेदारांच्या रकमेवर काही वर्षांचे व्याज जमाच करण्यात आले नाही. सदर पुस्तक तपासले असता पुस्ताकातील नोंदी व संगणकातील नोंदी यात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचेही आढळून आले. ही तफावत पोस्टाने गत काही वर्षांचे व्याज जमा न केल्यामुळे झाल्याचे बोलले जात आहे. संगणकातील जमा रकमेची खातेदारांच्या पुस्तकात यापूर्वी नोंद केली आहे; पण यात चुका आहेत. याकडे जिल्हा पोस्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्याचे मत नागरिक व्यक्त करतात. शहरी भागातील लोकांचा कल पोस्टाकडे नाही; पण ग्रामीण भागात पोस्टाचे मोठे खातेदार आहेत. यात बचत खातेदार व निराधारांचाही मोठा समावेश आहे. या सर्व खातेदारांना चुकांचा त्रास सहन करावा लागत आहे. निराधार लाभार्थ्यांनाही वेळेवर मानधन दिले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे टपाल सेवा सध्या डोकेदुखी ठरू पाहत आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील पोस्ट कार्यालयाच्या कारभारात सुधारणा करावी, अशी मागणी नागरिकांद्वारे कररण्यात येत आहे.