शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

पोस्टाच्या कारभाराने खातेदार त्रस्त

By admin | Updated: October 18, 2014 23:46 IST

स्थानिक पोस्ट कार्यालयात ढिसाळ कारभार सुरू आहे. यामुळे अनेक गावांतील खातेदार त्रस्त झाले आहेत. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचीही फरफट होत असल्याने असंतोष पसरला आहे.

सुधीर खडसे - समुद्रपूरस्थानिक पोस्ट कार्यालयात ढिसाळ कारभार सुरू आहे. यामुळे अनेक गावांतील खातेदार त्रस्त झाले आहेत. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचीही फरफट होत असल्याने असंतोष पसरला आहे. येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, शाळा, महाविद्यालये असून १० हजारांच्या वर लोकसंख्या आहे. लवकरच या ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतरही होणार आहे. यामुळे येथील शासकीय कार्यालयांच्या कारभारात सुसूत्रता येणे गरजेचे आहे. पोस्टाच्या कारभाराकडे संबंधितांनी लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. मोठी लोकवस्ती असल्याने तसेच तालुक्याचे ठिकाण असल्याने येथील पोस्टाचे खातेदार अधिक आहेत; पण या खातेदारांना कार्यालयातील गलथान कारभारामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पोस्ट कार्यालयांतर्गत जिल्हा कार्यालयात प्रत्येक खातेदाराचे बचत खाते असून ठेवीचा व व्याजाचा हिशेब जिल्हास्तरावरून निघतो. बचत खात्यात जमा असलेल्या रकमेवर दरवर्षी व्याज जमा होणे गरजेचे आहे; पण तीन ते चार वर्षांपर्यंत जमा रकमेवर व्याज जमा होत नसल्याची ओरड होत आहे. व्याजाकरिता ग्रामीण भागातील पोस्ट कार्यालय जिल्हा पोस्ट कार्यालयाकडे खाते पुस्तक व्याज नोंदीसाठी पाठविते; पण यावर्षी त्या पुस्तकात जमा करण्यात आलेले व्याज कोणत्या वर्षाचे आहे, याचे निदान लागत नाही. वास्तविक, दरवर्षी जमा रकमेवर व्याज जमा होणे गरजेचे आहे. दोन ते तीन महिन्यांनंतर खातेपुस्तक खातेदारांच्या हातात पडते, तेव्हा त्या पुस्तकात विविध प्रकारच्या घोडचुका आढळून येत असल्याचा आरोप खातेदार करीत आहेत. पोस्ट कार्यालयानेही आता संगणकीकृत कारभार सुरू केला आहे. यामुळे बचत खात्यावर संगणकाच्या माध्यमातून व्याजासह रक्कम जमा होते. यावर्षी बचत खातेदारांच्या रकमेवर काही वर्षांचे व्याज जमाच करण्यात आले नाही. सदर पुस्तक तपासले असता पुस्ताकातील नोंदी व संगणकातील नोंदी यात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचेही आढळून आले. ही तफावत पोस्टाने गत काही वर्षांचे व्याज जमा न केल्यामुळे झाल्याचे बोलले जात आहे. संगणकातील जमा रकमेची खातेदारांच्या पुस्तकात यापूर्वी नोंद केली आहे; पण यात चुका आहेत. याकडे जिल्हा पोस्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्याचे मत नागरिक व्यक्त करतात. शहरी भागातील लोकांचा कल पोस्टाकडे नाही; पण ग्रामीण भागात पोस्टाचे मोठे खातेदार आहेत. यात बचत खातेदार व निराधारांचाही मोठा समावेश आहे. या सर्व खातेदारांना चुकांचा त्रास सहन करावा लागत आहे. निराधार लाभार्थ्यांनाही वेळेवर मानधन दिले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे टपाल सेवा सध्या डोकेदुखी ठरू पाहत आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील पोस्ट कार्यालयाच्या कारभारात सुधारणा करावी, अशी मागणी नागरिकांद्वारे कररण्यात येत आहे.