शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

पाणी समस्येमुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:58 IST

दिवसेंदिवस नियोजनाअभावी पाण्याची समस्या बिकट होत होत आहे. याकडे समस्त समाजव्यवस्थेकडून दुर्लक्ष होत आहे. पिण्याच्या पाण्यासहीत जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. ही समस्या निवारण्याकरिता तातडीने प्रयत्न न झाल्यास या जमिनीवर पाण्यासाठी तिसरे महायुध्द होते की काय अशी स्थिती निर्माण होवू पाहत आहे, असे विचार खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरामदास तडस : तळणी (भागवत) येथे श्रमदान

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : दिवसेंदिवस नियोजनाअभावी पाण्याची समस्या बिकट होत होत आहे. याकडे समस्त समाजव्यवस्थेकडून दुर्लक्ष होत आहे. पिण्याच्या पाण्यासहीत जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. ही समस्या निवारण्याकरिता तातडीने प्रयत्न न झाल्यास या जमिनीवर पाण्यासाठी तिसरे महायुध्द होते की काय अशी स्थिती निर्माण होवू पाहत आहे, असे विचार खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले. तळणी भागवत येथे वॉटर कप स्पर्धेसाठी आयोजित श्रमदानाप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी पं.स. सदस्य युवराज खडतकर, सरपंच अनका गणेश वरकडे, उपसरपंच सुचिता शेंदरे, मुख्यमंत्री ग्रामविकास फेलो सुदर्शन पवार तसेच ग्रा.पं. सदस्यांची उपस्थिती होती.खा. तडस पुढे म्हणाले, शासनाने वॉटर कप स्पर्धेसाठी या तालुक्यातील ६४ गावांची निवड केली आहे. गाव पाणीदार झाले पाहिजे यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्त्वपुर्ण ठरले आहे. तळणी भागवत येथील नागरिक, महिला व आबालवृध्द सतत ४५ दिवसपर्यंत श्रमदानासाठी राबणार आहे. यासाठी महिलांचा व बालकांचा उत्साह सर्वांना प्रेरीत करणारा ठरला आहे. त्यामुळे या कामासाठी जेसीबीच्या डिझेलसाठी लागणारा एक लाखाचा खर्च स्वत: उचलणार आहे, असे त्यांनी सांगितले.वॉटर कप स्पर्धेसाठी तळणी भागवत येथील गावकरी सहा दिवसापासून श्रमदान करीत आहे. या दिवसात पाचशे घनमीटर खोदकाम करण्यात आले आहे. श्रमदानातून सर्वांचा उत्साह ओसांडून वाहत आहे. जल है तो कल है, अन्न गुडगुडे, नाळ गुडगुडे, दुष्काळ, ढिशकॉन, ढिशकॉन अशा प्रकारचे नारे लावून परस्परांमध्ये उत्साह संचारित केला जात आहे. या कामात गावातील ८५ वर्षाच्या म्हताºयापासून तर बालकापर्यंत सहभाग दिला जात आहे. वॉटर कप स्पर्धेचे बक्षीस मिळविण्यासाठी या गावातील सर्वजन एकवटले आहे. गावातील नागरिकांचा उत्साह द्विगणीत करण्यासाठी खा. तडस यांनी श्रमदान करून सहभाग दिला.श्रमदानात गावातील सरपंच व उपसरपंचासहीत ग्रा.पं. सदस्य गजानन तिवरे, कोमल वरठी, ज्योत्स्ना घनकसा, पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षणार्थी गजानन कन्नाके, रेखा बेलखोडे, रवि चिंचे तसेच रमेश तिवरे, दुर्योधन थुल, श्याम बरडे, संजय गोडे, सुभाष शेंदरे, हरिभाऊ मानकर, गुलाब आतराम तसेच गावकरी योगदान देत आहे.अख्ख गावंच आलं श्रमदानालाजिल्ह्यात आलेल्या वॉटरकप स्पर्धेच्या तुफानात अख्ख गाव येत असल्याचे दिसत आहे. गावात कधी पाण्याची टंचाई जाणवणार नाही याकरिता नागरिकांकडून श्रमदान करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. गावातील चिमुकल्यांसह ८५ वर्षाच्या म्हाताºयानेही श्रमदानाला आपली उपस्थिती दर्शविली. तळणी येथे तर सकाळी अख्ख गावच माळरानात श्रमदानात सहभागी झाल्याचे दिसले.