शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक मानसिकता हीच काळाची गरज

By admin | Updated: February 2, 2016 01:53 IST

समाजातील मानसिक समस्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता सकारात्मक मानसिकता काळाची गरज ठरत आहे.

सी.जी. पांडे : मानसशास्त्र विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळावर्धा : समाजातील मानसिक समस्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता सकारात्मक मानसिकता काळाची गरज ठरत आहे. सामान्य माणसांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आत्मविश्वासाने वावरता यावे म्हणून प्रत्येक व्यक्तीने सकारात्मक विचार आपल्या मनात रुजवावे. म्हणजे त्यातून उद्भवणाऱ्या सकारात्मक भावनांमुळे जीवनातील अस्वस्थता कमी करता येईल, असे विचार मुंबई विद्यापीठाचे मानसशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. सी.जी. पांडे यांनी व्यक्त केले. ‘सकारात्मक मानसशास्त्रीय भांडवल आणि स्वस्थ जीवन’ या विषयावरील यशवंत महाविद्यालयात राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास देशमुख होते तर प्रमुख अतिथी म्हणून अमेटी विद्यापीठ राजस्थान, जयपूर येथील डॉ.एस.एस. नथावत, मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. कें. पी. निंबाळकर उपस्थित होते. सकारात्मक मानसशास्त्रावर कार्य करणाऱ्या संशोधकांच्या संशोधनाचा फायदा मानसशास्त्र अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना व्हावा. त्यावरील आवश्यक मानसशास्त्रीय परिक्षणे नव्याने होणाऱ्या संशोधनाकरिता उपलब्ध व्हावीत याकरिता कार्यशाळा उपयुक्त ठरेल असे मत डॉ. निंबाळकर यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले. कार्यशाळेत राज्यातील विविध महाविद्यालयातील मानसशास्त्र विषयात आचार्य पदवी प्राप्त प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यानंतर बोलताना प्रा. डॉ. नथावत यांनी जीवन जगताना कोणतेही दडपण ठेऊ नये. आशावादी दृष्टीने जगावे. डॉ. नथावत यांनी कार्यशाळेतील दोन सत्रात सकारात्मक मानसशास्त्रावरील विविध परीक्षणे सोडवायला देऊन त्याआधारे प्रत्येकांच्या सकारात्मक क्षमतांचे मापन व विश्लेषण केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात ‘ताण व हृदयविकार’ या विषयावर बोलताना डॉ. देशपांडे म्हणाले, जीवनात ताण हा राहणारच. ताण पूर्वीही होता आजही आहे आणि ताण हा आवश्यक आहे. ताणाला सहजतेने सामोरे जा, म्हणजे ताणाचा प्रभाव जाणवणार नाही. सकारात्मक मानसिकतेचे समाजाचे स्वास्थ राखण्यात मोठे योगदान आहे. त्याआधारे समाजाचे मानसिक स्वास्थ्य जपले जाते. म्हणून नकारात्मक विचारांना सकारात्मक बाजूने बदलविण्याचे कसब अंगी बाळगले तर ते समाजाच्या मानसिक स्वास्थ्यास पोषक असेल, असे मत प्राचार्य देशमुख यांनी व्यक्त केले. डॉ. पुरुषोत्तम बोरकर व रुपाली सरोदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेला नागपूर, औरंगाबाद, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आदी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अतुल सिदूरकर यांनी तर आभार प्रा. अरुणा हरले यांनी मानले. डॉ. ढोणे, डॉ. धोटे, प्रा. खान, प्रा. बेले, प्रा. खोब्रागडे, प्रा. कवाडे, प्रा. पाटील, नांदुरकर आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)