शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पूल बांधकामाचे भिजत घोंगडे

By admin | Updated: July 2, 2015 02:32 IST

तांभा (येंडे), सावंगी, हिवरा या गावांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम अनेक दिवसांपासून रखडले आहे.

बसेस बंद होण्याच्या मार्गावर : बांधकाम विभागाचे दुर्लक्षविजयगोपाल : तांभा (येंडे), सावंगी, हिवरा या गावांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम अनेक दिवसांपासून रखडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे पाच वर्षांपासून पुलाचे काम प्रलंबित आहे. पूल न झाल्याने बस बंद होण्याच्या मार्गावर असल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे.या पुलाच्या बांधकामासाठी तयार केलेल्या वळण मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे हा वळणरस्ताच धोकादायक ठरत आहे. या पुलावरही खड्डे पडल्याने पावसाचे पाणी खड्ड्यात साचत असल्याने वाहन धारकांना रस्ता शोधताना तारेवरची कसरत करावी लागते. सध्या शाळा सुरू झाली असून पावसाळ्यात या पुलावर थोडा पाऊस आला तरी पुलावरून पाणी वाहायला सुरूवात होते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. या नुकसानाला सार्वजनिक बांधकाम विभागच दोषी राहील, असा आरोप विद्यार्थी करीत आहेत. या पुलावरून पाणी असल्यास तांभा, सावंगी, नांदगाव, कांदेगाव, हिवरा या गावांचा संपर्क तुटतो. यामुळे अनेक गावांतील शाळकरी मुले, शेतकरी व कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यास अडचण निर्माण होत आहे.पुलाच्या बांधकामाकरिता पाच महिन्यांपासून साहित्य येऊन पडले आहे; पण अद्यापही काम सुरू झाले नाही. यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अटळ असल्याचे दिसते. शिवाय बसफेरीही बंद होण्याचा धोका आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत पुलाचे बांधकाम करून रस्त्याची डागडुजी करावी, अशी सरपंच निलम बिन्नोड व ग्रामस्थांनी केली आहे.(वार्ताहर)