शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

रॉकेलवर धावणाऱ्या वाहनांमुळे प्रदूषण

By admin | Updated: October 15, 2014 23:22 IST

शहरासह ग्रामीण भागातही सध्या रॉकेलवर धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. एकीकडे गोरगरिबांना स्वयंपाकासाठी व दिव्यांसाठी रॉकेल मिळत नसताना वाहनांमध्ये मात्र रॉकेलचा सर्रास वापर सुरू आहे.

वर्धा : शहरासह ग्रामीण भागातही सध्या रॉकेलवर धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. एकीकडे गोरगरिबांना स्वयंपाकासाठी व दिव्यांसाठी रॉकेल मिळत नसताना वाहनांमध्ये मात्र रॉकेलचा सर्रास वापर सुरू आहे. यामुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.सर्वसामान्य व गोरगरिबांसाठी परवानाधारक विक्रेते हे रॉकेल काळ्याबाजारात जास्त दराने विकत आहे. स्वत:चा आर्थिक फायदा करण्याच्या प्रयत्नात हजारो नागरिकांचे आरोग्य मात्र प्रदूषणामुळे बिघडत आहे. शहरासह ग्रामीण भागातही रॉकलवर मोठ्या प्रमाणात वाहने चालत आहे. विशेषत: प्रवासी वाहनांमध्ये अशा प्रकारचे रॉकेल वापरण्यात येत आहे. रॉकेलवर चालणाऱ्या वाहनातून निघणारा धूर हा आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. अशा धुरामुळे विविध प्रकारचे आजार जडतात. परंतु त्याचा विचार करायला कुणाकडेही सध्या वेळ असल्याचे दिसत नाही. अशा वाहनांवर कारवाई होणे गरजेचे आहे. परंतु वाहतूक विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. लाभार्थ्यांच्या हक्काचे रॉकेल काळ्या बाजारात विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाकडे पर्याप्त वेळ नाही. त्यामुळे हा भोंगळपणा दिवसेंदिवस वाढतच आहे. २० रूपये लिटरचे रॉकेल ४० ते ४५ रूपये लिटर दराने काळयाबाजारात विकण्यात येत आहे. याबाबत एखाद्याने अशा रॉकेल विक्रेत्याची तक्रार केल्यावरही अशा तक्रारींची दखलच घेण्यात येत नसल्याने अशा विक्रेत्यांचे मनोबल वाढले आहे.(शहर प्रतिनिधी)