शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

१,९९५ मतदान केंद्रांवर होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 21:45 IST

वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या ११ एप्रिलला होऊ घातली आहे. एकूण १,९९५ मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यात ग्रामीण भागात १,५५९ तर शहरी भागासाठी ४३६ मतदान केंद्र राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती, लोकसभेची निवडणूक : ग्रामीण भागात १,५५९ तर शहरात ४३६ मतदान केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या ११ एप्रिलला होऊ घातली आहे. एकूण १,९९५ मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यात ग्रामीण भागात १,५५९ तर शहरी भागासाठी ४३६ मतदान केंद्र राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.१ जानेवारी २०१९ पर्यंत वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण १७ लाख २४ हजार ५८१ मतदार असल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यात ८ लाख ८४ हजार ८५७ पुरुष तर ८ लाख ३८ हजार ४१३ महिला आणि २५ इतर मतदार आहेत. इतकेच नव्हे तर एकूण १ हजार २८६ सैनिक मतदार असून त्यात १ हजार २५२ पुरूष तर ३४ महिला मतदार आहेत. निवडणुकीची अधिसूचना १८ मार्चला प्रसिद्ध होताच नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार असून त्याची अंतिम तारीख २५ मार्चला आहे. २६ मार्चला अर्जाची छानणी झाल्यावर २८ मार्चला उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार आहे. तर प्रचार तोफा ९ थंडावणार आहेत. ११ एप्रिलला प्रत्यक्ष मतदान होऊन २३ मे रोजी सेवाग्राम मार्गालगतच्या एफसीआय गोदाम परिसरात मतमोजणी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा प्रशासनातील प्रवीण महिरे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे व अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.४,३९१ दिव्यांग मतदारलोकसभा निवडणुकीचे हे वर्ष दिव्यांगांसाठी सुलभ निवडणुका असे घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांग मतदारांची नावे मतदार यादीमध्ये फलॅगींग करण्यात आले आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत एकूण ४ हजार ३९१ दिव्यांग मतदारांची ओळख पटविण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांना व्हिलचेअर व मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी आवश्यक सोई-सुविधा पुरविण्यात येणार आहेत. सध्या मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू असल्याने या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.नामनिर्देशनापर्यंत चालणार नवीन मतदार नोंदणीसध्या नवीन मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू असून उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेच्या एक दिवस पूर्वीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. लोकसभा निवडणुकीची पूर्व तयारी जिल्हा प्रशासन व निवडणूक विभागाकडून पूर्ण झाली असून एकही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये तसेच ही प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शी होण्यासाठी प्रयत्न होत आहेत, असेही जिल्हाधिकारी भिमनवार यांनी सांगितले.सुविधा, समाधान अन् सुगम ठरणार फायद्याचेलोकसभेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना मिरवणूक, प्रचार सभा आदी विषयाची परवानगी घ्यावी लागते. विविध प्रकारच्या परवानगी एकाच ठिकाणाहून प्राप्त करता याव्या यासाठी सुविधा ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. नागरिकांसह मतदारांच्या विविध शंकाचे व समस्यांचे समाधान करण्यासाठी समाधान हे अ‍ॅप कार्यान्वित करण्यात आले आहे. तर विविध शासकीय विभागांची वाहने अधिग्रहित करण्यासाठी सुगम नामक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या तिन्ही सुविधा फायद्याच्याच ठरणार आहेत.पायाभूत सुविधावर्धा लोकसभा मतदारसंघातील १ हजार ९९५ मतदार केंद्रांवर पिण्याचे पाणी, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, प्रसाधनगृह, दिशादर्शक फलक आदी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.२८ सहाय्यकारी मतदार केंदनिवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे एकूण १ हजार ४०० मतदारांपेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी सहाय्यकारी मतदार केंद्राची निर्मिती होणार आहे. त्यानुसार वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात एकूण २८ सहाय्यकारी मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे.तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांकलोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. याच दरम्यान कुणाकडून आचार संहितेचा भंग केल्यास त्याची तक्रार नागरिकांना सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत सुरू राहणाºया १९५० या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी करता येणार आहेत. सोमवारी, ११ मार्चला दुपारी १ वाजेपर्यंत एकूण ३४५ नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून आपल्या शंकांचे समाधान करून घेत अधिकची माहिती जाणून घेतली. शिवाय सी-व्हिजिलन्स या मोबाईल अ‍ॅपद्वारेही आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रारी करता येणार आहेत.