शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दु:खीतांचे अश्रू पुसण्यासाठी राजकारण करणार

By admin | Updated: May 15, 2017 00:35 IST

राजकारण हा माझा व्यवसाय नाही. मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या भावनेने रंजल्या गाजल्या,

समीर कुणावार : उड्डाणपुलाचे काम सुरू लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : राजकारण हा माझा व्यवसाय नाही. मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या भावनेने रंजल्या गाजल्या, पीडित व दु:खितांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविणे या एकमेव ध्येयाने मी हे समाजसेवेचे व्रत स्वीकारले आहे. हा घेतलेला वसा मी कधीही टाकून देणार नाही. विकासाच्या माध्यमातून जनतेच्या सेवेत सदैव अग्रेसर राहील, असे मत आ. समीर कुणावार यांनी व्यक्त केले. शुक्रवारी वणा नदीवरील पंडित दीनदयाल उपाध्याय उड्डाणपुलाचे काम त्यांच्या हस्ते सुरू करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. वणा नदीच्या पात्रात आकाशाच्या खुल्या मंडपात सायंकाळी ६.३० वाजता पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस तर अतिथी म्हणून जि. प. अध्यक्ष नितीन मडावी, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, प.स. सभापती गंगाधर कोल्हे, उपसभापती धनराज रिठे, ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्ष उषा थुटे, भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दिघे, न.प. उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे, जि.प. सदस्य शरद सहारे, आकाश पोहणे, अंकुश ठाकुर उपस्थित होते. आ. कुणावार यांनी वणा नदीवर पूल व्हावा ही जनतेची मागणी होती. निवडणुकीत मी ग्वाही दिली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने आज या पुलाची निर्मिती होत आहे. खासदार, आमदार, जि.प., पं.स., नगरसेवक हे जनतेचे विश्वस्त आहे. जनता सर्वतोपरी आहे, या भावनेतून जनविश्वासाने विकासाचे शिवधनुष्य उचलले आहे. हा उड्डाण पूल केवळ पूल नसून समृद्धी मार्ग आहे. पुलामुळे ग्रामीण समृद्धी शहरात येईल व शहरातील लक्ष्मी शेतकऱ्यांच्या घरात जाणार आहे. उद्योग व शेतीच्या विकासाला या पुलामुळे चांगले दिवस येतील, असे त्यांनी सांगितले. बसतांनी, दिघे, सहारे यांनी मार्गदर्शन केले. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय चौधरी, उपविभागीय अधिकारी दिलीप कुटे, कंत्राटदार शेख यांचा खा. तडस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. किरण वैद्य यांनी, प्रास्ताविक दिघे यांनी केले तर आभार रिठे यांनी मानले.