शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
3
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
4
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
5
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
6
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
7
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
8
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
9
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
10
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
11
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
12
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
13
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
14
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
15
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
16
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
17
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
18
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
19
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
20
Crime: विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसून दीराचं घाणेरडं कृत्य, गुन्हा दाखल!

राजकारण्यांनी संवेदनशील असणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 21:44 IST

सर्वच व्यक्तीत चांगला माणूस दडला असतो. त्याच्यातील चांगुलपणा समोर येऊन समाजात आदर्श निर्माण व्हावा यासाठी संवेदनशील असणे गरजेचे आहे. राजकारण हे निवडणुकीपुरते असावे.

ठळक मुद्देमकरंद अनासपुरे : आर्वीत कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : सर्वच व्यक्तीत चांगला माणूस दडला असतो. त्याच्यातील चांगुलपणा समोर येऊन समाजात आदर्श निर्माण व्हावा यासाठी संवेदनशील असणे गरजेचे आहे. राजकारण हे निवडणुकीपुरते असावे. त्यानंतर सर्वांनी विकासासाठी एकत्र येत आपला सहभाग द्यावा, त्यासाठी राजकारण्यांनी संवेदनशीलता बाळगणे गरजेचे आहे. संवेदनशीलता बाळगणारे राजकारणी आमचेही सहकारी मित्र राहणार, असे प्रतिपादन प्रसिद्ध मराठी सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी केले.स्थानिक जागृती क्रीडा मंडळाद्वारे आमदार डॉ. शरदराव काळे स्मृती कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महिला कॉँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारुलता टोकस, विदर्भ कबड्डी स्पर्धेचे सचिव जितेंद्र ठाकूर, जि.प. च्या माजी अध्यक्ष कलावती वाकोडकर, स्वप्ना शेंडे, हरीश इथापे, राजू साळवे, माजी जि.प. सदस्य गजानन गावंडेसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी आयोजक आमदार अमर काळे यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका विशद करीत मागील १८ वर्षांपासून आर्वीत स्पर्धा आयोजन करीत आहे, असे सांगत यातून खेळाडूंना प्रोत्साहन व नव्या पिढीत खेळ भावना रुजत असल्याचे सांगितले. मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनने आर्वी विधानसभा क्षेत्रातील धामनदीचे खोलीकरण करण्यास सहकार्य करावे, त्यासाठी आमची सहकार्याची भूमिका राहणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी अ‍ॅड. चारुलता टोकस, हरीश इथापे यांनीही विचार व्यक्त केले. आयोजकांच्या वतीने मकरंद अनासपुरे यांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.अनासपुरे म्हणाले, सोशल मीडिया दुधारी तलवार आहे. युवकांनी याचा वापर विधायक कार्यासाठी करावा व आपल्या जगण्याचे ध्येय काय आहे, आपण आपल्या घरासाठी, समाजासाठी, देशासाठी जगतो का, या वास्तवात युवकांनी जगणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी व्हावा, असे सांगत पुढील काळात राजकारण्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची गरज आहे. अन्यथा पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही, कोणतेही काम मोठे नाही, परंतु काम मोठं झालं की, श्रेयवाद सुरू होतो. नाम फाऊंडेशन ही माणुसकीची, शेतकऱ्यांसाठीची चळवळ आहे. आपली संस्कृती शेतीपूरक असतानाही शेतकरी व्यावसायिक का होत नाही? अशी खंतही त्यांनी व्यक्त करीत नाम फाऊंडेशन पुढील काळात आंजी- येळाकेळी या ९ कि.मी. नदीचे खोलीकरण करणार असल्याचे सांगितले. यावेळी जागृती क्रीडा मंडळाचे खेळाडू अमोल जाधव, हिमांशू पाटील, रितेश डवरे, शुभम पोकळे, श्वेता रत्नपारखी, प्राची प्रधान व इतर खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार हस्ते करण्यात आला. संचालन अविनाश गोहाड यांनी केले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी ६ ला रात्री ८ वाजता सिने अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेत राज्यातील नामवंत संघ सहभागी झाले आहेत.पीडित शेतकºयाला ‘नाम’चा मदतीचा हातघोराड- सेलू येथे १ महिन्यापूर्वी अनिल शिंदे नामक शेतकऱ्याचा १ बैल मरण पावला होता. याविषयीची माहिती आधार संघटनेचे सेलू तालुकाध्यक्ष शुभम झाडे यांना मिळाली असता त्यांनी ही माहिती नाम फाऊंडेशनचे विदर्भ-खानदेश प्रमुख हरीश इथापे यांना दिली. दरम्यान, इथापे यांनी नामच्या वतीने १५ हजार रुपयांची मदत अनिल शिंदे यांना जाहीर केली. नाम फाऊंडेशनच्या वतीने सिने अभिनेते मकरंद अनासपुरे, आधार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जतिन रणनवरे, जिल्हाध्यक्ष विक्रम खडसे, विदर्भ उपाध्यक्ष पंकज ओरके, पृथ्वीराज शिंदे, संघटक प्रशांत झाडे, तालुका उपाध्यक्ष फैजानअली सय्यद यांच्या उपस्थितीती पीडित शेतकºयाला मदतीचा धनादेश देण्यात आला.

टॅग्स :Makrand Anaspureमकरंद अनासपुरेKabaddiकबड्डी