शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय मतभेदामुळे सिमेंट रस्ता रखडला

By admin | Updated: November 12, 2014 22:49 IST

वर्धा-अल्लीपूर रस्त्याचे काम गेल्या काही वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहे. राजकीय मतभेदामुळे हा रस्ता अपूर्णावस्थेत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे.

तळेगाव (टा़) : वर्धा-अल्लीपूर रस्त्याचे काम गेल्या काही वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहे. राजकीय मतभेदामुळे हा रस्ता अपूर्णावस्थेत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे. दोन वर्षांपूर्वी एकुर्लीपासून वर्धा-हिंगणघाट मार्गाला जोडणाऱ्या तळेगाव फाट्यापर्यंत याच रस्त्याचे पक्के बांधकाम झाले. यामुळे गावातील अंतर्गत रस्तावरुन काही घरामध्ये पावसाळ्याचे पाणी शिरते. मुख्य रस्ता असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते झेंडा चौकापर्यंत हा मार्ग सीमेंटचा होणार असल्याने काही वर्षांपूर्वी उद्घाटन झाले होते. बांधकाम साहित्य रस्त्यावर पडून राहिले. कालांतराने सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले, पण तेही अर्थवटच राहिले. राजकीय मतभेद आणि गावात अतिक्रमणाचा बडगा आल्याने या रस्त्याचे काम थांबले. मुख्य रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केल्याने सध्या एका वाहनाशिवाय दुसरे वाहन या रस्त्यावरून निघत नव्हते. त्यामुळे प्रशासनाने अतिक्रमण हटविले. अतिक्रमणात भिंतीच्या विटा व साहित्य जमा झाले. आम्ही कचरा उचलतो असे नागरिकांनी सांगितल्यानंतरही प्रशासनाने मलबा उचलला नाही. त्यामुळे दगडमाती नालीमध्ये जवळपास दोन महिने पडून राहिले. अखेर पावसाळ्याचे पाणी नालीने जावे, यासाठी ग्रामपंचायतने युध्दपातवळीवर नाली उपसण्याचे काम केले. आता सहा महिन्यांचा कालावधी लोटला. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होवून आचार संहिताही संपल्या आहे. अतिक्रमणही हटले आहे. मग राहिलेल्या सिमेंट रस्त्याचे काम केव्हा होईल, या प्रतीक्षेत गावकरी आहे. सिमेंट रस्ता बांधकामात अनेक वेळा राजकीय मतभेद आडवे आल्याने या काम थांबले असावे, असा सूर गावकऱ्यांमध्ये आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)