शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

राजकीय मतभेदामुळे सिमेंट रस्ता रखडला

By admin | Updated: November 12, 2014 22:49 IST

वर्धा-अल्लीपूर रस्त्याचे काम गेल्या काही वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहे. राजकीय मतभेदामुळे हा रस्ता अपूर्णावस्थेत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे.

तळेगाव (टा़) : वर्धा-अल्लीपूर रस्त्याचे काम गेल्या काही वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहे. राजकीय मतभेदामुळे हा रस्ता अपूर्णावस्थेत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे. दोन वर्षांपूर्वी एकुर्लीपासून वर्धा-हिंगणघाट मार्गाला जोडणाऱ्या तळेगाव फाट्यापर्यंत याच रस्त्याचे पक्के बांधकाम झाले. यामुळे गावातील अंतर्गत रस्तावरुन काही घरामध्ये पावसाळ्याचे पाणी शिरते. मुख्य रस्ता असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते झेंडा चौकापर्यंत हा मार्ग सीमेंटचा होणार असल्याने काही वर्षांपूर्वी उद्घाटन झाले होते. बांधकाम साहित्य रस्त्यावर पडून राहिले. कालांतराने सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले, पण तेही अर्थवटच राहिले. राजकीय मतभेद आणि गावात अतिक्रमणाचा बडगा आल्याने या रस्त्याचे काम थांबले. मुख्य रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केल्याने सध्या एका वाहनाशिवाय दुसरे वाहन या रस्त्यावरून निघत नव्हते. त्यामुळे प्रशासनाने अतिक्रमण हटविले. अतिक्रमणात भिंतीच्या विटा व साहित्य जमा झाले. आम्ही कचरा उचलतो असे नागरिकांनी सांगितल्यानंतरही प्रशासनाने मलबा उचलला नाही. त्यामुळे दगडमाती नालीमध्ये जवळपास दोन महिने पडून राहिले. अखेर पावसाळ्याचे पाणी नालीने जावे, यासाठी ग्रामपंचायतने युध्दपातवळीवर नाली उपसण्याचे काम केले. आता सहा महिन्यांचा कालावधी लोटला. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होवून आचार संहिताही संपल्या आहे. अतिक्रमणही हटले आहे. मग राहिलेल्या सिमेंट रस्त्याचे काम केव्हा होईल, या प्रतीक्षेत गावकरी आहे. सिमेंट रस्ता बांधकामात अनेक वेळा राजकीय मतभेद आडवे आल्याने या काम थांबले असावे, असा सूर गावकऱ्यांमध्ये आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)