शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

वर्ध्यात पोलिसांकडून खबऱ्यांना धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 12:42 IST

वर्धेत गुन्ह्याचे श्रेय आपल्यालाच मिळावे म्हणून शहर ठाण्याच्या पोलिसांकडून चक्क खबऱ्यांनाच धमकाविण्याचा प्रकार झाल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देशहर पोलीस आणि एलसीबीत तपासावरून छुपा वादश्रेय लाटण्यासाठी सुरू आहे धडपड

आॅनलाईन लोकमतवर्धा : कोणताही गुन्हा शोधण्याकरिता पोलिसांचा महत्त्वाचा दुवा खबरी असतो. या खबऱ्यांच्या माध्यमातूनच पोलिसांना माहिती मिळून मोठमोठे आरोपी पकडल्याचा इतिहास आहे. वर्धेत मात्र गुन्ह्याचे श्रेय आपल्यालाच मिळावे म्हणून शहर ठाण्याच्या पोलिसांकडून चक्क खबऱ्यांनाच धमकाविण्याचा प्रकार झाल्याची चर्चा आहे. पोलिसांकडून खबऱ्यांना धमकाविण्याचा प्रकार होत असेल तर गुन्हेगारांची माहिती देण्यास कोण समोर येईल, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. केवळ खात्याचा रिवार्ड आणि अधिकाऱ्यांकडून पाठीवर थाप याकरिता हा प्रकार घडल्याची चर्चा पोलीस विभागात आहे.खबरे पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून ओळख मिळवून आहेत. त्यांच्याच आधारावर पोलिसांचे बरेचशे तपास लागतात. यामुळे गुन्हे अन्वेषणाच्या कामात त्यांना विशेष महत्त्व आहे. याच खबºयांच्या आधारावर वर्धेत गत आठवड्यात जिल्हा सामान्य रुग्णालयालगत घडलेल्या हत्या प्रकरणाचा शोध लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना शक्य झाले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेली ही कारवाई शहर ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना खटकली. शहर ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी पकडणे शहर पोलिसांना जमले नाही, असे ताशेरे वरिष्ठांनी त्यांच्यावर ओढल्याची माहिती आहे. यामुळे काही पोलीस कर्मचाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती पुरविणाऱ्या त्या खबऱ्यांचा शोध घेतला.हा शोध घेताना या पोलिसांकडून खबरी असलेल्या व काही नसलेल्यांनाही मनस्ताप सहन करावा लागला. कधी काही अवैध कामे करणाऱ्यांना पोलिसांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यांचा हा रोष कायमच असताना पोलिसांच्या हाती दुसरा आरोपी आला. पण शहर ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्या आरोपीला ओळखणे शक्य झाले नाही. यामुळे तो त्यांच्या हाती असतानाही त्यांना गवसला नाही. परिणामी काल रात्री या भागातील नागरिकांनी स्वत: त्या आरोपीला पोलीस ठाण्यात आणत ठाणेदाराच्या स्वाधीन केले.आरोपीच्या शोधाची जबाबदारी पार पाडणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि शहर ठाण्याच्या पोलिसात असा छुपा वाद असल्याचे या प्रकरणातून उघड झाले. हा वाद आजचा नाही तर यापूर्वीही होता. पण तो उघड झाला नव्हता. या प्रकरणात हा प्रकार उघड झाला. यावर पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत कारवाई गरजेची झाली आहे. पोलिसांकडून असेच प्रकार घडत असल्यास पुढे येवून कोणीच माहिती देणार नाही.लोकाभिमुख सेवेला छेदाची शक्यताच्पोलीस विभागाचे काम लोकाभिमुख करण्यावर शासनाच्यावतीने गृह खाते भर देत आहे. परंतु पोलिसांकडून सर्वसामान्यांना मिळणाऱ्या वागणुकीत काहीच बदल झाला नसल्याची अनेक प्रकरणे आहेत. आता तर केवळ अधिकाऱ्यांची मर्जी राखण्याकरिता पोलीस कर्मचाऱ्यांकडून खबऱ्यांनाच धमकाविण्याचा प्रकार होत आहे. या प्रकारातून प्रशासन लोकाभिमुख करण्याच्या प्रकाराला छेद देण्याची शक्यता नाकारता येत नाही.रोष टाळण्याकरिता नागरिकांनीच केला आरोपी स्वाधीनच्जिल्हा सामान्य रुग्णालयालगत घडलेल्या हत्याकांडातील एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केला. दुसरा आरोपी शहर पोलिसांच्या नजरेत असताना त्याला त्यांनी अटक केली नाही. केवळ चौकशी करून सोडले. मात्र दुसरा आरोपी तोच असल्याने या भागातील नागरिकांनी पोलिसांना प्रकरणाची माहिती देवून रोष ओढवून घेण्यापेक्षा त्या आरोपीला शहर ठाण्यात आणून ठाणेदाराच्या स्वाधीन केल्याचा प्रकार घडला.

टॅग्स :Crimeगुन्हा