शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

वर्ध्यात पोलिसांकडून खबऱ्यांना धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 12:42 IST

वर्धेत गुन्ह्याचे श्रेय आपल्यालाच मिळावे म्हणून शहर ठाण्याच्या पोलिसांकडून चक्क खबऱ्यांनाच धमकाविण्याचा प्रकार झाल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देशहर पोलीस आणि एलसीबीत तपासावरून छुपा वादश्रेय लाटण्यासाठी सुरू आहे धडपड

आॅनलाईन लोकमतवर्धा : कोणताही गुन्हा शोधण्याकरिता पोलिसांचा महत्त्वाचा दुवा खबरी असतो. या खबऱ्यांच्या माध्यमातूनच पोलिसांना माहिती मिळून मोठमोठे आरोपी पकडल्याचा इतिहास आहे. वर्धेत मात्र गुन्ह्याचे श्रेय आपल्यालाच मिळावे म्हणून शहर ठाण्याच्या पोलिसांकडून चक्क खबऱ्यांनाच धमकाविण्याचा प्रकार झाल्याची चर्चा आहे. पोलिसांकडून खबऱ्यांना धमकाविण्याचा प्रकार होत असेल तर गुन्हेगारांची माहिती देण्यास कोण समोर येईल, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. केवळ खात्याचा रिवार्ड आणि अधिकाऱ्यांकडून पाठीवर थाप याकरिता हा प्रकार घडल्याची चर्चा पोलीस विभागात आहे.खबरे पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून ओळख मिळवून आहेत. त्यांच्याच आधारावर पोलिसांचे बरेचशे तपास लागतात. यामुळे गुन्हे अन्वेषणाच्या कामात त्यांना विशेष महत्त्व आहे. याच खबºयांच्या आधारावर वर्धेत गत आठवड्यात जिल्हा सामान्य रुग्णालयालगत घडलेल्या हत्या प्रकरणाचा शोध लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना शक्य झाले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेली ही कारवाई शहर ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना खटकली. शहर ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी पकडणे शहर पोलिसांना जमले नाही, असे ताशेरे वरिष्ठांनी त्यांच्यावर ओढल्याची माहिती आहे. यामुळे काही पोलीस कर्मचाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती पुरविणाऱ्या त्या खबऱ्यांचा शोध घेतला.हा शोध घेताना या पोलिसांकडून खबरी असलेल्या व काही नसलेल्यांनाही मनस्ताप सहन करावा लागला. कधी काही अवैध कामे करणाऱ्यांना पोलिसांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यांचा हा रोष कायमच असताना पोलिसांच्या हाती दुसरा आरोपी आला. पण शहर ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्या आरोपीला ओळखणे शक्य झाले नाही. यामुळे तो त्यांच्या हाती असतानाही त्यांना गवसला नाही. परिणामी काल रात्री या भागातील नागरिकांनी स्वत: त्या आरोपीला पोलीस ठाण्यात आणत ठाणेदाराच्या स्वाधीन केले.आरोपीच्या शोधाची जबाबदारी पार पाडणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि शहर ठाण्याच्या पोलिसात असा छुपा वाद असल्याचे या प्रकरणातून उघड झाले. हा वाद आजचा नाही तर यापूर्वीही होता. पण तो उघड झाला नव्हता. या प्रकरणात हा प्रकार उघड झाला. यावर पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत कारवाई गरजेची झाली आहे. पोलिसांकडून असेच प्रकार घडत असल्यास पुढे येवून कोणीच माहिती देणार नाही.लोकाभिमुख सेवेला छेदाची शक्यताच्पोलीस विभागाचे काम लोकाभिमुख करण्यावर शासनाच्यावतीने गृह खाते भर देत आहे. परंतु पोलिसांकडून सर्वसामान्यांना मिळणाऱ्या वागणुकीत काहीच बदल झाला नसल्याची अनेक प्रकरणे आहेत. आता तर केवळ अधिकाऱ्यांची मर्जी राखण्याकरिता पोलीस कर्मचाऱ्यांकडून खबऱ्यांनाच धमकाविण्याचा प्रकार होत आहे. या प्रकारातून प्रशासन लोकाभिमुख करण्याच्या प्रकाराला छेद देण्याची शक्यता नाकारता येत नाही.रोष टाळण्याकरिता नागरिकांनीच केला आरोपी स्वाधीनच्जिल्हा सामान्य रुग्णालयालगत घडलेल्या हत्याकांडातील एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केला. दुसरा आरोपी शहर पोलिसांच्या नजरेत असताना त्याला त्यांनी अटक केली नाही. केवळ चौकशी करून सोडले. मात्र दुसरा आरोपी तोच असल्याने या भागातील नागरिकांनी पोलिसांना प्रकरणाची माहिती देवून रोष ओढवून घेण्यापेक्षा त्या आरोपीला शहर ठाण्यात आणून ठाणेदाराच्या स्वाधीन केल्याचा प्रकार घडला.

टॅग्स :Crimeगुन्हा