शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रस्त्यावर वाढदिवस साजरा कराल तर केक लॉकअपमध्ये खावा लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 16:28 IST

रात्री १२ वाजल्यानंतर सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करताना आढळल्यास ‘बर्थ डे बॉय’ला त्यांचा केक तुरुंगात खावा लागणार आहे. रस्त्यावर वाढदिवस साजरा करुन शस्त्राने केक कापणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकारवाईला सामोरे जावे लागणार : शस्त्राने केक कापणाऱ्याला दणका

वर्धा : आजकाल रस्त्यावर वाढदिवस साजरा करणं मोठ्या प्रमाणात वाढलंय. मध्यरात्री रस्त्यावर आरडाओरड करून, मोठं मोठाल्या आवाजात गाणी लावून अनेकजण वाढदिवस साजरा करतात. मात्र त्यांच्या आनंदाचा त्रास इतरांना सहन करावा लागतो. या प्रकारावर आळा घालण्याकरता पोलिसांनी कंबर कसली आले. रात्री १२ वाजल्यानंतर सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करताना आढळल्यास ‘बर्थ डे बॉय’ला त्यांचा केक तुरुंगात खावा लागणार आहे. 

गेल्या महिनाभरात हिंगणघाट आणि रामनगर पोलिसांनी अशांवर कारवाई करत त्यांना कारागृहाची हवा दाखवली आहे. त्यामुळे आता रस्त्यावर वाढदिवस साजरा करुन शस्त्राने केक कापणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. गल्लीबोळात तसेच सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या सुमारास मुलाचा, नेत्याचा किंवा विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सध्या सुरू आहे. ‘भाईगिरी’ची क्रेझ असलेले युवक धारदार शस्त्र जसे की, तलवार, चाकू, कोयता आदीने केक कट करुन डीजेच्या आवाजावर थिरकून वाढदिवस साजरा करत आहेत. यामुळे नियमांचे उल्लंघन होत असून, नागरिकांना त्रास होत असल्याने अशांवर आता कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी सांगितले आहे.

तर गुन्हा होणार दाखल- रस्त्यावर वाहन उभे करुन केक कापणे.- केक कापताना तलवार, चाकूसारखे शस्त्र वापरणे.- रस्त्यावर गोंधळ घालणे.- ‘भाईगिरी’चे भूत असल्याने हा प्रकार सोशल मीडियावर अपलोड करणे.- शांतता भंग करुन नागरिकांमध्ये दहशत पसरवणे.

जिल्ह्यात तिघांवर झाली कारवाई

मध्यरात्रीच्या सुमारास सार्वजनिक रस्त्यावर हातात धारदार शस्त्र घेऊन वाढदिवस साजरा करणाऱ्या तिघांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना कारागृहाची हवा खाऊ घातली आहे. हिंगणघाट पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या व्हिडीओवरुन दोघांना अटक करत त्यांच्याकडून शस्त्र जप्त केले. तर रामनगर पोलिसांनी शांतीनगर परिसरात केक कापण्यापूर्वीच शस्त्रासह युवकाला अटक करुन कारागृहात डांबले.

विकृत पद्धतीत होतेय वाढ

सोशल मीडिया येण्यापूर्वी काही मोजक्याच क्षेत्रातील व्यक्तींचा, लहान मुलांचा अथवा ज्यांच्याकडे संपत्ती, प्रतिष्ठा आहे, अशा व्यक्तींचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात असे. त्याची चर्चा सर्वत्र व्हायची. मात्र, सोशल मीडियामुळे मात्र आता कुणीच मागे राहिले नाहीत. वाढदिवस हा जीवनातील अविस्मरणीय दिवस समजला जातो. त्यासाठी मित्रांसह आई-वडील, नातेवाईकांचा आशीर्वाद व शुभेच्छांची जोड महत्त्वाची ठरते. मात्र, आता त्याला फाटा देत वाढदिवस म्हणजे मौजमजा, सेलिब्रेशन, धांगडधिंगा अशा प्रवृत्तीत वाढ होत आहे. विकृत पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे फॅड सध्या जोमात आहे.

टॅग्स :Socialसामाजिक