शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्याचे काम अधांतरीच

By admin | Updated: September 16, 2015 02:49 IST

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असलेल्या तळेगाव (श्या.) परिसरात गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्यामुळे येथील पोलीस चौकीला पोलीस ठाण्याचा दर्जा प्राप्त झाला.

लोकप्रतिनिधींची उदासीनता : बांधकामाची फाईल धूळ खात पडूनअनिल रिठे  तळेगाव(श्या.पंत)राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असलेल्या तळेगाव (श्या.) परिसरात गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्यामुळे येथील पोलीस चौकीला पोलीस ठाण्याचा दर्जा प्राप्त झाला. जागा कमी पडत असल्याने तत्कालीन आमदार दादाराव केचे यांनी अमरावती रोडवरील शासनाची जागा पोलीस स्टेशनसाठी मंजूर करून आणली. जमीन असल्यामुळे पोलीस ठाण्यासाठी दीड कोटी रूपयांचा निधीही मंजूर झाला. बांधकामाची फाईल पुढे पाठविण्यात आली. मात्र यात असंख्य चुका असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. परिणामी ती धुळखात पडली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचे काम अधांतरीच असल्याचे वास्तव आहे. दोन वर्षापूर्वी तळेगाव पोलीस चौकीचे रूपांतर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आले. सुरूवातीला काही दिवस व्यवस्थित कारभार सुरू राहिला. काही दिवसांनी मात्र कर्मचारी वाढल्याने कुणाला कोठे बसवावे, असा प्रश्न उभा ठाकला. यात महिला कर्मचारी वर्गाची जास्त कुचंबना होत आहे. अपघातग्रस्त वाहनांची संख्या मोठी असल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात ही वाहने कोठे ठेवावी, हा प्रश्न आहे. १५ आॅगस्ट, २६ जानेवारी व १ मे रोजी ध्वजारोहणानंतर परेड कोठे घ्यावी, असाही प्रश्न पडतो.वरिष्ठ अधिकारी ठाण्याची पाहणी करण्याकरिता आल्यावर नियमानुसार त्यांना मानवंदना द्यावी लागते. ती देण्याकरिता येथे जागा नाही. ठाण्याचा आवारात महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतत्र कक्ष नाही. स्वच्छतागृहही नाही. एवढेच काय या ठाण्याच्या इमारतीला कुंपणही घालण्यात आलेले नाही. त्यामुळे मोकाट प्राणी बिनधास्तपणे ठाण्याच्या आवारात संचार करीत असतात. मोठ्या कारवाईचे दस्तावेज तयार करावयाचे झाल्यास ते कोठे बसून तयार करावे, हा प्रश्न पडतो. एखाद्या गुन्ह्यातील ४ ते ५ साक्षीदार एकाचवेळी साक्ष नोंदवायला आले तर त्यांना कोठे बसवायचे व कर्मचाऱ्यांनी कोठे बसायचे हे देखील कळत नाही. पोलीस ठाण्याकरिता आर्वी मार्गावर जामनेर शिवारात १९९० मध्ये जागा दिल्या गेली होती. तेव्हा पोलीस स्टेशन मंजूर व्हायचे होते.पोलीस स्टेशन मंजूर झाल्यावर अमरावती मार्गावर जागेची पाहणी करण्यात आली. जागेच्या दस्तऐवजाच्या फाईलमध्ये जुनी फाईलही होती. पण आती ती कोठे धुळखात पडली आहे हे सांगण्यास अधिकारी तयार नाही. केवळ निधी देवून जबाबदारी पूर्ण झाल्याचे सांगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी जागेच्या फाईलकडेही लक्ष देणे तितकेच आवश्यक आहे. येथील पोलीस चौकीला ठाण्याचा दर्जा प्राप्त झाला. मात्र समस्यांना पाढा आ वासून उभा आहे. जागा कमी आणि कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असा प्रकार झाला आहे. कारवाई मध्ये व अपघातात जप्त केलेली वाहने कोणाच्याही दुकानासमोर लावली जातात. यात ती पुन्हा चोरीस जाण्याचा धोका वाढला आहे.