शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

पोलीस ठाण्याचे काम अधांतरीच

By admin | Updated: September 16, 2015 02:49 IST

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असलेल्या तळेगाव (श्या.) परिसरात गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्यामुळे येथील पोलीस चौकीला पोलीस ठाण्याचा दर्जा प्राप्त झाला.

लोकप्रतिनिधींची उदासीनता : बांधकामाची फाईल धूळ खात पडूनअनिल रिठे  तळेगाव(श्या.पंत)राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असलेल्या तळेगाव (श्या.) परिसरात गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्यामुळे येथील पोलीस चौकीला पोलीस ठाण्याचा दर्जा प्राप्त झाला. जागा कमी पडत असल्याने तत्कालीन आमदार दादाराव केचे यांनी अमरावती रोडवरील शासनाची जागा पोलीस स्टेशनसाठी मंजूर करून आणली. जमीन असल्यामुळे पोलीस ठाण्यासाठी दीड कोटी रूपयांचा निधीही मंजूर झाला. बांधकामाची फाईल पुढे पाठविण्यात आली. मात्र यात असंख्य चुका असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. परिणामी ती धुळखात पडली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचे काम अधांतरीच असल्याचे वास्तव आहे. दोन वर्षापूर्वी तळेगाव पोलीस चौकीचे रूपांतर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आले. सुरूवातीला काही दिवस व्यवस्थित कारभार सुरू राहिला. काही दिवसांनी मात्र कर्मचारी वाढल्याने कुणाला कोठे बसवावे, असा प्रश्न उभा ठाकला. यात महिला कर्मचारी वर्गाची जास्त कुचंबना होत आहे. अपघातग्रस्त वाहनांची संख्या मोठी असल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात ही वाहने कोठे ठेवावी, हा प्रश्न आहे. १५ आॅगस्ट, २६ जानेवारी व १ मे रोजी ध्वजारोहणानंतर परेड कोठे घ्यावी, असाही प्रश्न पडतो.वरिष्ठ अधिकारी ठाण्याची पाहणी करण्याकरिता आल्यावर नियमानुसार त्यांना मानवंदना द्यावी लागते. ती देण्याकरिता येथे जागा नाही. ठाण्याचा आवारात महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतत्र कक्ष नाही. स्वच्छतागृहही नाही. एवढेच काय या ठाण्याच्या इमारतीला कुंपणही घालण्यात आलेले नाही. त्यामुळे मोकाट प्राणी बिनधास्तपणे ठाण्याच्या आवारात संचार करीत असतात. मोठ्या कारवाईचे दस्तावेज तयार करावयाचे झाल्यास ते कोठे बसून तयार करावे, हा प्रश्न पडतो. एखाद्या गुन्ह्यातील ४ ते ५ साक्षीदार एकाचवेळी साक्ष नोंदवायला आले तर त्यांना कोठे बसवायचे व कर्मचाऱ्यांनी कोठे बसायचे हे देखील कळत नाही. पोलीस ठाण्याकरिता आर्वी मार्गावर जामनेर शिवारात १९९० मध्ये जागा दिल्या गेली होती. तेव्हा पोलीस स्टेशन मंजूर व्हायचे होते.पोलीस स्टेशन मंजूर झाल्यावर अमरावती मार्गावर जागेची पाहणी करण्यात आली. जागेच्या दस्तऐवजाच्या फाईलमध्ये जुनी फाईलही होती. पण आती ती कोठे धुळखात पडली आहे हे सांगण्यास अधिकारी तयार नाही. केवळ निधी देवून जबाबदारी पूर्ण झाल्याचे सांगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी जागेच्या फाईलकडेही लक्ष देणे तितकेच आवश्यक आहे. येथील पोलीस चौकीला ठाण्याचा दर्जा प्राप्त झाला. मात्र समस्यांना पाढा आ वासून उभा आहे. जागा कमी आणि कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असा प्रकार झाला आहे. कारवाई मध्ये व अपघातात जप्त केलेली वाहने कोणाच्याही दुकानासमोर लावली जातात. यात ती पुन्हा चोरीस जाण्याचा धोका वाढला आहे.