शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

पोलीस चौकी ठरते शोभेची वास्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:02 IST

येथील पोलीस चौकीचे काही वर्षापूवी लोक सहभागातून सौंदर्यीकरण करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी नामांकन देऊन चौकाला गौरविले होते. परंतु, सध्या या चौकीत अपुरे मनुष्यबळ असून अनेकदा कर्मचारीच गैरहजर राहत असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देअपुरे मनुष्यबळ : पाच कर्मचाºयांच्या खांद्यावर कामाचा बोजा

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : येथील पोलीस चौकीचे काही वर्षापूवी लोक सहभागातून सौंदर्यीकरण करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी नामांकन देऊन चौकाला गौरविले होते. परंतु, सध्या या चौकीत अपुरे मनुष्यबळ असून अनेकदा कर्मचारीच गैरहजर राहत असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.वायगाव (नि.) पोलीस चौकीच्या हद्दीत १२ गावांचा समावेश असून त्या गावांची एकूण लोकसंख्या ३५ ते ४० हजाराच्या घरात आहे. परंतु, ज्या पोलीस कचेरीच्या खांद्यावर परिसरातील शांतता व सुव्यवस्थेची जबाबदारी आहे त्याच पोलीस कचेरीत कर्मचाºयांचा वानवा आहे. या पोलीस चौकीत केवळ चार कर्मचारी व एक अधिकारी असे एकूण पाच पोलीस नेमण्यात आले आहे. मात्र, तेही या पोलीस चौकीत नेहमी गैरहजर राहत असल्याने नागरिकांना वेळीच पोलिसी मदत मिळविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथे नेमण्यात आलेल्या कर्मचाºयांना वेळोवेळी विविध कामानिमित्त देवळी येथे पाचारण करण्यात येत असल्याचे पोलीस कर्मचारी सांगतात.या गावातून चंद्रपूर, पाढंरकवडा, यवतमाळ कडे जाणारा महामार्ग गेला आहे. या गावातील भुतडा हत्याकांड प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. परंतु, सध्या दररोज पोलीस गस्तही घालत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर पोलीस चौकी नेहमी बंद राहत असल्याचा आरोप नागरिक करतात. त्यामुळे तक्रारकर्त्याला बहूदा देवळी पोलीस ठाणे गाठून पोलीस कचेरीत तक्रार नोंदवून घ्यावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय अपुऱ्या पोलिसांमुळे परिसरात दारूविक्री, सट्टापट्टी आदी व्यवसाय पायमुळ घट्ट करू पाहत असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे.चौकीच्या हद्दीत १२ गावांचा समावेशयेथील पोलीस चौकीच्या हद्दीत १२ गावांचा समावेश असून त्यांची एकूण लोकसंख्या सुमारे ४० हजारांच्या घरात आहे. येथे झालेल्या लोकसहभागाच्या कामाचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक करीत संबंधितांना गौरविले होते. त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी सदर पोलीस चौकी नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास सुरू राहण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अधिकारी बदलताच चौकी नेहमीच बंद राहत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणे