शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
2
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
3
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
4
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
5
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
8
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
9
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
10
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
11
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
12
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
13
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
14
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
15
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
16
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
17
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
18
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
19
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
20
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप

पोलीस चौकी ठरते शोभेची वास्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:02 IST

येथील पोलीस चौकीचे काही वर्षापूवी लोक सहभागातून सौंदर्यीकरण करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी नामांकन देऊन चौकाला गौरविले होते. परंतु, सध्या या चौकीत अपुरे मनुष्यबळ असून अनेकदा कर्मचारीच गैरहजर राहत असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देअपुरे मनुष्यबळ : पाच कर्मचाºयांच्या खांद्यावर कामाचा बोजा

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : येथील पोलीस चौकीचे काही वर्षापूवी लोक सहभागातून सौंदर्यीकरण करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी नामांकन देऊन चौकाला गौरविले होते. परंतु, सध्या या चौकीत अपुरे मनुष्यबळ असून अनेकदा कर्मचारीच गैरहजर राहत असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.वायगाव (नि.) पोलीस चौकीच्या हद्दीत १२ गावांचा समावेश असून त्या गावांची एकूण लोकसंख्या ३५ ते ४० हजाराच्या घरात आहे. परंतु, ज्या पोलीस कचेरीच्या खांद्यावर परिसरातील शांतता व सुव्यवस्थेची जबाबदारी आहे त्याच पोलीस कचेरीत कर्मचाºयांचा वानवा आहे. या पोलीस चौकीत केवळ चार कर्मचारी व एक अधिकारी असे एकूण पाच पोलीस नेमण्यात आले आहे. मात्र, तेही या पोलीस चौकीत नेहमी गैरहजर राहत असल्याने नागरिकांना वेळीच पोलिसी मदत मिळविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथे नेमण्यात आलेल्या कर्मचाºयांना वेळोवेळी विविध कामानिमित्त देवळी येथे पाचारण करण्यात येत असल्याचे पोलीस कर्मचारी सांगतात.या गावातून चंद्रपूर, पाढंरकवडा, यवतमाळ कडे जाणारा महामार्ग गेला आहे. या गावातील भुतडा हत्याकांड प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. परंतु, सध्या दररोज पोलीस गस्तही घालत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर पोलीस चौकी नेहमी बंद राहत असल्याचा आरोप नागरिक करतात. त्यामुळे तक्रारकर्त्याला बहूदा देवळी पोलीस ठाणे गाठून पोलीस कचेरीत तक्रार नोंदवून घ्यावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय अपुऱ्या पोलिसांमुळे परिसरात दारूविक्री, सट्टापट्टी आदी व्यवसाय पायमुळ घट्ट करू पाहत असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे.चौकीच्या हद्दीत १२ गावांचा समावेशयेथील पोलीस चौकीच्या हद्दीत १२ गावांचा समावेश असून त्यांची एकूण लोकसंख्या सुमारे ४० हजारांच्या घरात आहे. येथे झालेल्या लोकसहभागाच्या कामाचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक करीत संबंधितांना गौरविले होते. त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी सदर पोलीस चौकी नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास सुरू राहण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अधिकारी बदलताच चौकी नेहमीच बंद राहत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणे