शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

पोलीस चौकी ठरते शोभेची वास्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:02 IST

येथील पोलीस चौकीचे काही वर्षापूवी लोक सहभागातून सौंदर्यीकरण करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी नामांकन देऊन चौकाला गौरविले होते. परंतु, सध्या या चौकीत अपुरे मनुष्यबळ असून अनेकदा कर्मचारीच गैरहजर राहत असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देअपुरे मनुष्यबळ : पाच कर्मचाºयांच्या खांद्यावर कामाचा बोजा

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : येथील पोलीस चौकीचे काही वर्षापूवी लोक सहभागातून सौंदर्यीकरण करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी नामांकन देऊन चौकाला गौरविले होते. परंतु, सध्या या चौकीत अपुरे मनुष्यबळ असून अनेकदा कर्मचारीच गैरहजर राहत असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.वायगाव (नि.) पोलीस चौकीच्या हद्दीत १२ गावांचा समावेश असून त्या गावांची एकूण लोकसंख्या ३५ ते ४० हजाराच्या घरात आहे. परंतु, ज्या पोलीस कचेरीच्या खांद्यावर परिसरातील शांतता व सुव्यवस्थेची जबाबदारी आहे त्याच पोलीस कचेरीत कर्मचाºयांचा वानवा आहे. या पोलीस चौकीत केवळ चार कर्मचारी व एक अधिकारी असे एकूण पाच पोलीस नेमण्यात आले आहे. मात्र, तेही या पोलीस चौकीत नेहमी गैरहजर राहत असल्याने नागरिकांना वेळीच पोलिसी मदत मिळविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथे नेमण्यात आलेल्या कर्मचाºयांना वेळोवेळी विविध कामानिमित्त देवळी येथे पाचारण करण्यात येत असल्याचे पोलीस कर्मचारी सांगतात.या गावातून चंद्रपूर, पाढंरकवडा, यवतमाळ कडे जाणारा महामार्ग गेला आहे. या गावातील भुतडा हत्याकांड प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. परंतु, सध्या दररोज पोलीस गस्तही घालत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर पोलीस चौकी नेहमी बंद राहत असल्याचा आरोप नागरिक करतात. त्यामुळे तक्रारकर्त्याला बहूदा देवळी पोलीस ठाणे गाठून पोलीस कचेरीत तक्रार नोंदवून घ्यावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय अपुऱ्या पोलिसांमुळे परिसरात दारूविक्री, सट्टापट्टी आदी व्यवसाय पायमुळ घट्ट करू पाहत असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे.चौकीच्या हद्दीत १२ गावांचा समावेशयेथील पोलीस चौकीच्या हद्दीत १२ गावांचा समावेश असून त्यांची एकूण लोकसंख्या सुमारे ४० हजारांच्या घरात आहे. येथे झालेल्या लोकसहभागाच्या कामाचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक करीत संबंधितांना गौरविले होते. त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी सदर पोलीस चौकी नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास सुरू राहण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अधिकारी बदलताच चौकी नेहमीच बंद राहत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणे