शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
3
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
4
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
5
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
6
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
7
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
8
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
9
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
10
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
11
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
12
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
13
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
14
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
15
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
16
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
17
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
18
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
19
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
20
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत

बाजारातील वाहतूक व्यवस्थेला पोलिसांकडूनच छेद

By admin | Updated: August 23, 2015 02:10 IST

शहरातील बाजारात गेल्यावर अव्यवस्थेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाड्या, पार्किंगच्या सुविधेअभावी कुठेही अस्ताव्यस्त उभी असलेली दुचाकी वाहने,

रूपेश खैरी / प्रशांत हेलोंडे वर्धाशहरातील बाजारात गेल्यावर अव्यवस्थेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाड्या, पार्किंगच्या सुविधेअभावी कुठेही अस्ताव्यस्त उभी असलेली दुचाकी वाहने, दुकान मालकांची चारकाही वाहने यामुळे येथून पायी चालनेही कठीण होत असल्याचे वास्तव आहे. या सर्व स्थितीवर आळा घालण्याकरिता पोलीस विभागाच्यावतीने काही रस्ते ‘वन वे’ केले होते; मात्र त्यांच्या या व्यवस्थेला त्यांच्याच विभागाकडूनच छेद दिल्याचे शनिवारी समोर आले. बाजारात येणाऱ्या नागरिकांना त्रास होवू नये याकरिता पोलीस विभाग व नगर परिषदेत झालेल्या चर्चेतून मार्ग काढण्यात आला होता. यात दिवसाआड रस्त्याच्या एका कडेला पार्किंग करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले होते. यामुळे रस्त्याची एक बाजू मोकळी राहत होती; मात्र आता त्या पार्किंगलाही ग्रहण लागले आहे. बाजारात रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी आहेत. ‘वन वे’ चा फलक असताना व्यवस्था निर्माण करणारे पोलिसच त्या फलकांना जुमानत नसल्याचे समोर आले आहे. पोलिसच या फलकांना नुमानत नसेल तर नागरिकांचे काय, असा प्रश्न समोर येत आहे. येथील अनाज लाईन परिसरातील ‘नो एन्ट्री’ असलेल्या फलकातून आत जात पोलीस विभागानेच नियमांना बगल दिल्याचे दिसून आले आहे. वर्धेकरांकरिता रोज गररजेच्या साहित्य खरेदीकरिता असलेल्या बाजार अतिक्रमणात हरविला आहे. दुकान मालकांनी त्यांच्या दुकानातील रस्त्यावर आणलेले साहित्य, चौरस्ता वा एखादा चौक पाहून फेरीवाल्याने लावलेल्या दुकानामुळे येथे नागरिकांना पायदळ चालनेही कठीण. नागरिकांना भाजीपाला मिळण्याकरिता पालिकेच्यावतीने सुरू केलेल्या टिळक भाजी बाजाराची दैना झाली आहे. बाजारात जाण्याचा रस्ता सोडून बाहेर हातगाड्यांसह दुकाने सजली आहेत. ही दुकाने रस्त्याच्या कडेला नाही तर रस्त्यावरच आली आहेत. सराफा लाईन, अंबिका चौक व पानाचंद चौकातही हिच अवस्था आहे. येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या फेरीवाल्यांमुळे बाजाराहाटाकरिता आलेल्या नागरिकांना त्रासाला समोरे जावे लागत आहे.