शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

बाजारातील वाहतूक व्यवस्थेला पोलिसांकडूनच छेद

By admin | Updated: August 23, 2015 02:10 IST

शहरातील बाजारात गेल्यावर अव्यवस्थेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाड्या, पार्किंगच्या सुविधेअभावी कुठेही अस्ताव्यस्त उभी असलेली दुचाकी वाहने,

रूपेश खैरी / प्रशांत हेलोंडे वर्धाशहरातील बाजारात गेल्यावर अव्यवस्थेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाड्या, पार्किंगच्या सुविधेअभावी कुठेही अस्ताव्यस्त उभी असलेली दुचाकी वाहने, दुकान मालकांची चारकाही वाहने यामुळे येथून पायी चालनेही कठीण होत असल्याचे वास्तव आहे. या सर्व स्थितीवर आळा घालण्याकरिता पोलीस विभागाच्यावतीने काही रस्ते ‘वन वे’ केले होते; मात्र त्यांच्या या व्यवस्थेला त्यांच्याच विभागाकडूनच छेद दिल्याचे शनिवारी समोर आले. बाजारात येणाऱ्या नागरिकांना त्रास होवू नये याकरिता पोलीस विभाग व नगर परिषदेत झालेल्या चर्चेतून मार्ग काढण्यात आला होता. यात दिवसाआड रस्त्याच्या एका कडेला पार्किंग करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले होते. यामुळे रस्त्याची एक बाजू मोकळी राहत होती; मात्र आता त्या पार्किंगलाही ग्रहण लागले आहे. बाजारात रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी आहेत. ‘वन वे’ चा फलक असताना व्यवस्था निर्माण करणारे पोलिसच त्या फलकांना जुमानत नसल्याचे समोर आले आहे. पोलिसच या फलकांना नुमानत नसेल तर नागरिकांचे काय, असा प्रश्न समोर येत आहे. येथील अनाज लाईन परिसरातील ‘नो एन्ट्री’ असलेल्या फलकातून आत जात पोलीस विभागानेच नियमांना बगल दिल्याचे दिसून आले आहे. वर्धेकरांकरिता रोज गररजेच्या साहित्य खरेदीकरिता असलेल्या बाजार अतिक्रमणात हरविला आहे. दुकान मालकांनी त्यांच्या दुकानातील रस्त्यावर आणलेले साहित्य, चौरस्ता वा एखादा चौक पाहून फेरीवाल्याने लावलेल्या दुकानामुळे येथे नागरिकांना पायदळ चालनेही कठीण. नागरिकांना भाजीपाला मिळण्याकरिता पालिकेच्यावतीने सुरू केलेल्या टिळक भाजी बाजाराची दैना झाली आहे. बाजारात जाण्याचा रस्ता सोडून बाहेर हातगाड्यांसह दुकाने सजली आहेत. ही दुकाने रस्त्याच्या कडेला नाही तर रस्त्यावरच आली आहेत. सराफा लाईन, अंबिका चौक व पानाचंद चौकातही हिच अवस्था आहे. येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या फेरीवाल्यांमुळे बाजाराहाटाकरिता आलेल्या नागरिकांना त्रासाला समोरे जावे लागत आहे.