शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

निम्न वर्धा प्रकल्पाच्या कामाची पोलखोल

By admin | Updated: May 16, 2017 01:12 IST

निम्न वर्धा प्रकल्पावर आतापर्यंत २०८३.६३ कोटी खर्च झाले. अधिकाधिक मुख्य कालव्याचे काम पूर्ण होवून ....

जनमंचची सिंचन शोधयात्रा : २०८३.६३ कोटी खर्चूनही शेतकऱ्यांना लाभ नाहीफनिन्द्र रघाटाटे। लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : निम्न वर्धा प्रकल्पावर आतापर्यंत २०८३.६३ कोटी खर्च झाले. अधिकाधिक मुख्य कालव्याचे काम पूर्ण होवून २०१७ अखेर २४६७४ हेक्टर शेतजमिनीत सिंचन क्षमता निर्माण झाल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. ही संपूर्ण माहिती खोटी असल्याचे जनमंचच्यावतीने रविवारी आयोजित सिंचन शोध मोहिमेत पुढे आले. या मोहीम राज्य जनमंचचे बाबुजी अणे, आर. के. समितीचे वेद व भारतीय किसान संस्थेने आयोजित केली होती. यामुळे प्रकल्पावरील अभियंत्यांनी कागदोपत्री सादर केलेल्या कामाची शेतकऱ्यांसमोर पोलखोल झाली. सिंचन शोधयात्रेच्या निमित्ताने प्रारंभी धनोडी विश्राम गृहावर अधिकारी, जनमंचचे पदाधिकारी परिसरातील शेतकऱ्यांची बैठक झाली. त्या सभेत कॅनलचे कार्यकारी अभियंता डी.जी. रब्बेवार, मायनरचे उपविभागीय अभियंता नरेंद्र निमजे, कार्यकारी अभियंता मंडवार यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती उपस्थितांना दिली. त्यानुसार सदर प्रकल्पाची प्रथम प्रशासकीय मानयता ९ जानेवारी १९८१ रोजी मिळाली असून त्यावेळी या प्रकल्पाचा खर्च फक्त ४८.०८५ कोटी एवढा होता. प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण न झाल्याने सदर प्रकल्पाच्या कामाला १० जानेवारी २००० रोजी ४४४.५२१ कोटीच्या खर्चाची सुधारित प्रथम प्रशासकीय मान्यता २९ आॅगस्ट २००६ रोजी ९५०.७ कोटी खर्चाला द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता असे करीत पाच वेळा सुधारित प्रशासकीय मान्यता मिळारली. यानंतर आता सन २०१६-१७ मध्ये प्रकल्पाची किंमत ३६१५.२९ कोटी झाली आहे. सदर प्रकल्पावर मार्च २०१७ अखेर २०८३.९३ कोटी खर्च झाल्याची माहिती दिली. या खर्चातून ४४.४२५ किलोमिटर लांबीचा मुरूम टाकण्याचे संपूर्ण काम झाले. ६१.३० कि़मी.चे शाखा कालवे (मायनर) झाल्याचेही सांगितले. या कामामुळे आर्वी तालुक्यातील १,२२१ हेक्टर, देवळी तालुक्यातील ३२,०३५ हेक्टर, वर्धा तालुक्यातील ११,२७७ हेक्टर व हिंगणघाट तालुक्यातील ८,००६ हेक्टर अशी एकूण ५२,५३९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पावर सन २०११-१२ च्या रबी हंगामापासून प्रत्यक्ष सिंचनास सुरुवात करण्यात आली असून आजमितीस २१,५५२ हेक्टर सिंचन करणे शक्य झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती किती खरी आहे, याचा प्रत्यक्ष पडताळा घेण्यासाठी जनमंचचे व इतर संस्थेचे पदाधिकारी, आदिवासी, शेतकरी यांनी प्रकल्पाचा मुख्य कालवा, मायनर, पाटचऱ्या झालेले सिंचन, धरणाच्या भिंतीमुळे त्या भागात निर्माण झालेल्या समस्या यांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी अंती मुख्य कालवाच्या ४७५ मीटर लांबीला लायनिंग केलेले नसल्याचे दिसून आले. परिणामी पाणी पाझरत आहे. मायनरची अवस्था अत्यंत दयनिय असून सर्व कामे १० वर्षापूर्वी झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी त्यांच्या किनारी (बँक) भूईसपाट झाल्या आहेत. मारयनरला उतार नसल्याने पाणी पुढे सरकण्याऐवजी जागोजागी फुटून परिसरातील अनेक शेतात साचत असल्याचे दिसून आले. वडगाव (पांडे) या गावपरिसरात तर उपकालव्यांनी आलेले पाणी रस्त्यावर साचत असल्याने गावातील शेतकऱ्यांना दळणवळणाचा प्रश्न निर्माण होत असल्याचे शेतकरी रमेश चिखले यांनी सांगितले. या पाण्यामुळे शेतीचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. या दौऱ्यात कॅनलची वस्तूस्थिती लक्षात आली तर शेतकऱ्यांनी सदर पाण्यामुळे फायदा कमी अन् नुकसान अधिक, अशी व्यथा व्यक्त केली. या कालव्यातून सोडलेले ६० टक्के पाणी वाया जात असून केवळ ४० टक्के पाणी सिंचनासाठी कामी येते. या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान निर्माण झालेल्या प्रश्नावर अधिकारी आता दोन वर्षात उपकालवे स्वच्छ करू, पाटचऱ्या काठ व उर्वरित सर्व कामे करू असे थातूरमातूर उत्तरे देत होते. या मोहिमेत परिसरातील शेतकऱ्यांसह जनमंचचे पदाधिकारी उपस्थित होते.