शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

प्लॉस्टिक कचऱ्याचे जलस्त्रोतांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:35 IST

ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेऊन जगभरात वृक्षांचे रोपण करण्याची होडच लागली आहे; पण प्लास्टिक कचऱ्याचा धोका दुर्लक्षित होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक झरे धोक्यात : जिल्हा प्रशासनासह सामाजिक संघटनाही उदासीन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेऊन जगभरात वृक्षांचे रोपण करण्याची होडच लागली आहे; पण प्लास्टिक कचऱ्याचा धोका दुर्लक्षित होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. नदी, नाले, तलाव आदी जलस्त्रोतांवरच आता प्लास्टिक कचऱ्याचे संकट घोंगावू लागले आहे. परिणामी, जलस्त्रोत धोक्यात आले आहेत. जिल्हा प्रशासन, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत हे जलस्त्रोत वाचविणे तथा नागरिकांनी प्लास्टिक कचऱ्यावर आवर घालणे गरजेचे झाले आहे.अनादी कालापासून शहरे, गावांचे मुख्य जलस्त्रोत ठरलेल्या नद्या सध्या संकटात सापडल्या आहेत. सर्व नद्यांना सध्या प्लास्टिकच्या कचºयापासून मोठा धोका निर्माण झाला आहे. देवळी तालुक्यातील कोटेश्वर हे देवस्थान सर्वपरिचित आहे. कोटेश्वर येथे वर्धा नदीचे मोठे पात्र आहे. या ठिकाणी ही नदी उत्तरवाहिणी होते. यामुळे कोटेश्वरचे महत्त्व मोठे आहे. यामुळे पितरांचे पूजन करण्याकरिता असंख्य नागरिक येथील नदी पात्राजवळ येत असतात. नागरिकांच्या सुविधेसाठी येथे घाटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. पुरातन असलेल्या या घाटाचा आता विकासही होऊ घातला आहे; पण कोटेश्वर येथील पूजाच धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अंतिम संस्कारानंतर राखड शिरविणे, दसवा तथा अन्य विधी उरकण्यासाठी नागरिक कोटेश्वर घाटावर येतात. येताना अनेक साहित्य, प्लास्टिक पिशवी तथा अन्य प्लास्टिकच्या वस्तू घेऊन येत असतात. स्रान, पूजा विधी उरकल्यानंतर नागरिक प्लास्टिक पिशवी, प्लास्टिकच्या पत्रावळी, द्रोण व अन्य वस्तू मात्र नदी पात्रातच टाकून देतात. परिणामी, नदीतील पाणी प्रदूषित होत असून पात्रामध्ये सर्वत्र प्लास्टिकचा कचरा पाहावयास मिळतो. कोटेश्वर येथील वर्धा नदी उत्तरवाहिनी असल्याने तेथील पात्रात पाणी थांबून राहते. यामुळे हा कचरा कुठेही वाहून न जाता तेथेच पात्रातील पाण्यावर तरंगताना दिसतो. शिवाय या कचºयामुळे पाणी दूषित होऊन दुर्गंधी पसरते. याच पाण्यात भाविकांना स्रान करावे लागते. त्यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.प्लास्टिकच्या कचऱ्याचे निर्मूलन करण्याकरिता अनेकदा माजी पं.स. सभापती मनोज वसू यांच्या नेतृत्वात रोहणी, कोटेश्वर तथा परिसरातील युवकांनी स्वच्छता अभियान राबविले. शिवाय कोटेश्वर येथे येणाऱ्या नागरिकांत जनजागृती करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, परंपरांच्या नावाखाली नदी पात्र प्रदूषित करण्याचे काम थांबतच नसल्याचे दिसून येत आहे. सध्या कोटेश्वर येथील वर्धा नदीच्या पात्रामधील पाण्यावर शेवाळ तथा कचरा तरंगताना दिसून येतो. हा कचरा बाजूला सारून भाविकांना आंघोळ करावी लागते. कचऱ्यामुळे पात्र उथळ झाले आहे. शिवाय पोहण्याचा आनंदही हिरावला गेल्याचे दिसून येत आहे. भविष्यात पौराणिक महत्त्व असलेले कोटेश्वर येथील वर्धा नदीचे उत्तरवाहिनी पात्र नष्ट होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. जिल्हा प्रशासन तथा सामाजिक संघटनांनी आणि नागरिरकांनी यासाठी पुढाकार घेत जलस्त्रोतांजवळील प्लास्टिक कचऱ्यावर आवर घालणे गरजेचे झाले आहे. शिवाय कोटेश्वर येथील उत्तरवाहिनीचे जतन करण्यासाठी स्वच्छता अभियान तथा जनजागृती कार्यक्रम राबविणे गरजेचे झाले आहे. सदर उपक्रम लोकचळवळच होणे काळाची गरज आहे.तेथेच जाळला जातो कचराराखड शिरविण्यासह दसवा व अन्य विधीसाठी येणारे नागरिक सोबत आणलेला कचरा पात्रालगतच पायऱ्यांजवळ जाळला जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे परिसराला घाणीचा विळखा पडल्याचे दिसून येत आहे. पात्रालगतच्या कचऱ्यामुळे घाटावर दुर्गंधी पसरलेली आहे. नागरिकांनी हा कचरा बाहेर जाळल्यास नदी पात्र व परिसर स्वच्छ राहण्यास मदत होऊ शकेल.