शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

प्लॉस्टिक कचऱ्याचे जलस्त्रोतांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:35 IST

ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेऊन जगभरात वृक्षांचे रोपण करण्याची होडच लागली आहे; पण प्लास्टिक कचऱ्याचा धोका दुर्लक्षित होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक झरे धोक्यात : जिल्हा प्रशासनासह सामाजिक संघटनाही उदासीन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेऊन जगभरात वृक्षांचे रोपण करण्याची होडच लागली आहे; पण प्लास्टिक कचऱ्याचा धोका दुर्लक्षित होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. नदी, नाले, तलाव आदी जलस्त्रोतांवरच आता प्लास्टिक कचऱ्याचे संकट घोंगावू लागले आहे. परिणामी, जलस्त्रोत धोक्यात आले आहेत. जिल्हा प्रशासन, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत हे जलस्त्रोत वाचविणे तथा नागरिकांनी प्लास्टिक कचऱ्यावर आवर घालणे गरजेचे झाले आहे.अनादी कालापासून शहरे, गावांचे मुख्य जलस्त्रोत ठरलेल्या नद्या सध्या संकटात सापडल्या आहेत. सर्व नद्यांना सध्या प्लास्टिकच्या कचºयापासून मोठा धोका निर्माण झाला आहे. देवळी तालुक्यातील कोटेश्वर हे देवस्थान सर्वपरिचित आहे. कोटेश्वर येथे वर्धा नदीचे मोठे पात्र आहे. या ठिकाणी ही नदी उत्तरवाहिणी होते. यामुळे कोटेश्वरचे महत्त्व मोठे आहे. यामुळे पितरांचे पूजन करण्याकरिता असंख्य नागरिक येथील नदी पात्राजवळ येत असतात. नागरिकांच्या सुविधेसाठी येथे घाटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. पुरातन असलेल्या या घाटाचा आता विकासही होऊ घातला आहे; पण कोटेश्वर येथील पूजाच धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अंतिम संस्कारानंतर राखड शिरविणे, दसवा तथा अन्य विधी उरकण्यासाठी नागरिक कोटेश्वर घाटावर येतात. येताना अनेक साहित्य, प्लास्टिक पिशवी तथा अन्य प्लास्टिकच्या वस्तू घेऊन येत असतात. स्रान, पूजा विधी उरकल्यानंतर नागरिक प्लास्टिक पिशवी, प्लास्टिकच्या पत्रावळी, द्रोण व अन्य वस्तू मात्र नदी पात्रातच टाकून देतात. परिणामी, नदीतील पाणी प्रदूषित होत असून पात्रामध्ये सर्वत्र प्लास्टिकचा कचरा पाहावयास मिळतो. कोटेश्वर येथील वर्धा नदी उत्तरवाहिनी असल्याने तेथील पात्रात पाणी थांबून राहते. यामुळे हा कचरा कुठेही वाहून न जाता तेथेच पात्रातील पाण्यावर तरंगताना दिसतो. शिवाय या कचºयामुळे पाणी दूषित होऊन दुर्गंधी पसरते. याच पाण्यात भाविकांना स्रान करावे लागते. त्यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.प्लास्टिकच्या कचऱ्याचे निर्मूलन करण्याकरिता अनेकदा माजी पं.स. सभापती मनोज वसू यांच्या नेतृत्वात रोहणी, कोटेश्वर तथा परिसरातील युवकांनी स्वच्छता अभियान राबविले. शिवाय कोटेश्वर येथे येणाऱ्या नागरिकांत जनजागृती करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, परंपरांच्या नावाखाली नदी पात्र प्रदूषित करण्याचे काम थांबतच नसल्याचे दिसून येत आहे. सध्या कोटेश्वर येथील वर्धा नदीच्या पात्रामधील पाण्यावर शेवाळ तथा कचरा तरंगताना दिसून येतो. हा कचरा बाजूला सारून भाविकांना आंघोळ करावी लागते. कचऱ्यामुळे पात्र उथळ झाले आहे. शिवाय पोहण्याचा आनंदही हिरावला गेल्याचे दिसून येत आहे. भविष्यात पौराणिक महत्त्व असलेले कोटेश्वर येथील वर्धा नदीचे उत्तरवाहिनी पात्र नष्ट होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. जिल्हा प्रशासन तथा सामाजिक संघटनांनी आणि नागरिरकांनी यासाठी पुढाकार घेत जलस्त्रोतांजवळील प्लास्टिक कचऱ्यावर आवर घालणे गरजेचे झाले आहे. शिवाय कोटेश्वर येथील उत्तरवाहिनीचे जतन करण्यासाठी स्वच्छता अभियान तथा जनजागृती कार्यक्रम राबविणे गरजेचे झाले आहे. सदर उपक्रम लोकचळवळच होणे काळाची गरज आहे.तेथेच जाळला जातो कचराराखड शिरविण्यासह दसवा व अन्य विधीसाठी येणारे नागरिक सोबत आणलेला कचरा पात्रालगतच पायऱ्यांजवळ जाळला जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे परिसराला घाणीचा विळखा पडल्याचे दिसून येत आहे. पात्रालगतच्या कचऱ्यामुळे घाटावर दुर्गंधी पसरलेली आहे. नागरिकांनी हा कचरा बाहेर जाळल्यास नदी पात्र व परिसर स्वच्छ राहण्यास मदत होऊ शकेल.