शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

फलाट रिकामा, तरी लालपरी होई दुसरीकडे उभी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 22:13 IST

नियोजित फलाट रिकामा असताना चालकाने एसटी बस भलत्याच ठिकाणी उभी केल्याने प्रवाशांची एकच धावपळ झाली. शनिवारी वर्धा बसस्थानकावर हा प्रकार घडला. यामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.

ठळक मुद्देवर्धा बसस्थानकावर चालकाचा प्रताप। प्रवाशांचे भागंभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नियोजित फलाट रिकामा असताना चालकाने एसटी बस भलत्याच ठिकाणी उभी केल्याने प्रवाशांची एकच धावपळ झाली. शनिवारी वर्धा बसस्थानकावर हा प्रकार घडला. यामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद अंगीकारलेले परिवहन महामंडळ सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी भंगार बसेस तर कधी चालक-वाहकाचा मनमर्जी कारभार, बसफेऱ्या रद्द करणे. परिवहनच्या वाहकाकडून प्रवाशांना कधीच सौजन्याची वागणूक दिली जात नाही. अनेक ठिकाणी बसचा थांबा असताना चालक वाहकाकडून मनमर्जीने बसला थांबा दिला जात नाही. यामुळे प्रवाशांना दुसºया बसच्या प्रतीक्षेत तासन्तास ताटकळत राहावे लागते.याविषयी नियंत्रकांकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. बसफेºया रद्द होणे, वेळेवर न येणे यामुळे विद्यार्थ्यांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येते.वर्धा बसस्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. ज्या मार्गावरील बसगाड्या जेथे लागतात, तेथे फलकही लावण्यात आले आहे. असे असताना शनिवारी वाहकाकडून बसस्थानकातील यवतमाळचा फलाट रिकामा असताना चालकाने या फलाटावर बस उभी न करता दुसºया मार्गाने जाणाºया गावाच्या फलाटावर उभी केली. यवतमाळकडे जाणारे प्रवासी यवतमाळच्या फलाटावर उभे होते, तर बस नागपूरकडे जाणाºया फलाटावर थांबली. यामुळे अनेक प्रवाशांची धावपळ झाली. यात वयोवृद्ध प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. ग्रामीण प्रवाशांच्या दिमतीला भंगार बसेसच आहेत. असे असले तरी परिवहनची लालपरी अर्थात एसटी बसचा शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आधार आहे. महामंडळ कुठल्याही सुविधा पुरवत नसले तरी ग्रामीणांचा विश्वास आहे. मात्र, चालक-वाहकांकडून या विश्वासाला वेळोवेळी तडा दिला जातो. शनिवारी घडलेल्या प्रकारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मनमर्जीने वागणाºया वाहक-चालकावर कारवाई करण्याची मागणी यावेळी प्रवासीवर्गातून होत आहे.ब्रिदाला हरताळचालक-वाहकांच्या उद्धट कृतीमुळे परिवहन महामंडळाच्या ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रिदाला नेहमीच हरताळ फासला जातो. कॉलन बॉक्सनंतर प्रवाशांना करमणुकीकरिता बसगाड्यांमध्ये मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. अल्पावधीतच या व्यवस्थेचे वाभाडे निघाले. अनेक बसगाडयांमधून वायफाय बॉक्स बेपत्ता झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज प्रवाशांतून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ