शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

फलाट रिकामा, तरी लालपरी होई दुसरीकडे उभी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 22:13 IST

नियोजित फलाट रिकामा असताना चालकाने एसटी बस भलत्याच ठिकाणी उभी केल्याने प्रवाशांची एकच धावपळ झाली. शनिवारी वर्धा बसस्थानकावर हा प्रकार घडला. यामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.

ठळक मुद्देवर्धा बसस्थानकावर चालकाचा प्रताप। प्रवाशांचे भागंभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नियोजित फलाट रिकामा असताना चालकाने एसटी बस भलत्याच ठिकाणी उभी केल्याने प्रवाशांची एकच धावपळ झाली. शनिवारी वर्धा बसस्थानकावर हा प्रकार घडला. यामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद अंगीकारलेले परिवहन महामंडळ सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी भंगार बसेस तर कधी चालक-वाहकाचा मनमर्जी कारभार, बसफेऱ्या रद्द करणे. परिवहनच्या वाहकाकडून प्रवाशांना कधीच सौजन्याची वागणूक दिली जात नाही. अनेक ठिकाणी बसचा थांबा असताना चालक वाहकाकडून मनमर्जीने बसला थांबा दिला जात नाही. यामुळे प्रवाशांना दुसºया बसच्या प्रतीक्षेत तासन्तास ताटकळत राहावे लागते.याविषयी नियंत्रकांकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. बसफेºया रद्द होणे, वेळेवर न येणे यामुळे विद्यार्थ्यांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येते.वर्धा बसस्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. ज्या मार्गावरील बसगाड्या जेथे लागतात, तेथे फलकही लावण्यात आले आहे. असे असताना शनिवारी वाहकाकडून बसस्थानकातील यवतमाळचा फलाट रिकामा असताना चालकाने या फलाटावर बस उभी न करता दुसºया मार्गाने जाणाºया गावाच्या फलाटावर उभी केली. यवतमाळकडे जाणारे प्रवासी यवतमाळच्या फलाटावर उभे होते, तर बस नागपूरकडे जाणाºया फलाटावर थांबली. यामुळे अनेक प्रवाशांची धावपळ झाली. यात वयोवृद्ध प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. ग्रामीण प्रवाशांच्या दिमतीला भंगार बसेसच आहेत. असे असले तरी परिवहनची लालपरी अर्थात एसटी बसचा शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आधार आहे. महामंडळ कुठल्याही सुविधा पुरवत नसले तरी ग्रामीणांचा विश्वास आहे. मात्र, चालक-वाहकांकडून या विश्वासाला वेळोवेळी तडा दिला जातो. शनिवारी घडलेल्या प्रकारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मनमर्जीने वागणाºया वाहक-चालकावर कारवाई करण्याची मागणी यावेळी प्रवासीवर्गातून होत आहे.ब्रिदाला हरताळचालक-वाहकांच्या उद्धट कृतीमुळे परिवहन महामंडळाच्या ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रिदाला नेहमीच हरताळ फासला जातो. कॉलन बॉक्सनंतर प्रवाशांना करमणुकीकरिता बसगाड्यांमध्ये मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. अल्पावधीतच या व्यवस्थेचे वाभाडे निघाले. अनेक बसगाडयांमधून वायफाय बॉक्स बेपत्ता झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज प्रवाशांतून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ