शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

फलाट रिकामा, तरी लालपरी होई दुसरीकडे उभी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 22:13 IST

नियोजित फलाट रिकामा असताना चालकाने एसटी बस भलत्याच ठिकाणी उभी केल्याने प्रवाशांची एकच धावपळ झाली. शनिवारी वर्धा बसस्थानकावर हा प्रकार घडला. यामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.

ठळक मुद्देवर्धा बसस्थानकावर चालकाचा प्रताप। प्रवाशांचे भागंभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नियोजित फलाट रिकामा असताना चालकाने एसटी बस भलत्याच ठिकाणी उभी केल्याने प्रवाशांची एकच धावपळ झाली. शनिवारी वर्धा बसस्थानकावर हा प्रकार घडला. यामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद अंगीकारलेले परिवहन महामंडळ सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी भंगार बसेस तर कधी चालक-वाहकाचा मनमर्जी कारभार, बसफेऱ्या रद्द करणे. परिवहनच्या वाहकाकडून प्रवाशांना कधीच सौजन्याची वागणूक दिली जात नाही. अनेक ठिकाणी बसचा थांबा असताना चालक वाहकाकडून मनमर्जीने बसला थांबा दिला जात नाही. यामुळे प्रवाशांना दुसºया बसच्या प्रतीक्षेत तासन्तास ताटकळत राहावे लागते.याविषयी नियंत्रकांकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. बसफेºया रद्द होणे, वेळेवर न येणे यामुळे विद्यार्थ्यांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येते.वर्धा बसस्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. ज्या मार्गावरील बसगाड्या जेथे लागतात, तेथे फलकही लावण्यात आले आहे. असे असताना शनिवारी वाहकाकडून बसस्थानकातील यवतमाळचा फलाट रिकामा असताना चालकाने या फलाटावर बस उभी न करता दुसºया मार्गाने जाणाºया गावाच्या फलाटावर उभी केली. यवतमाळकडे जाणारे प्रवासी यवतमाळच्या फलाटावर उभे होते, तर बस नागपूरकडे जाणाºया फलाटावर थांबली. यामुळे अनेक प्रवाशांची धावपळ झाली. यात वयोवृद्ध प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. ग्रामीण प्रवाशांच्या दिमतीला भंगार बसेसच आहेत. असे असले तरी परिवहनची लालपरी अर्थात एसटी बसचा शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आधार आहे. महामंडळ कुठल्याही सुविधा पुरवत नसले तरी ग्रामीणांचा विश्वास आहे. मात्र, चालक-वाहकांकडून या विश्वासाला वेळोवेळी तडा दिला जातो. शनिवारी घडलेल्या प्रकारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मनमर्जीने वागणाºया वाहक-चालकावर कारवाई करण्याची मागणी यावेळी प्रवासीवर्गातून होत आहे.ब्रिदाला हरताळचालक-वाहकांच्या उद्धट कृतीमुळे परिवहन महामंडळाच्या ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रिदाला नेहमीच हरताळ फासला जातो. कॉलन बॉक्सनंतर प्रवाशांना करमणुकीकरिता बसगाड्यांमध्ये मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. अल्पावधीतच या व्यवस्थेचे वाभाडे निघाले. अनेक बसगाडयांमधून वायफाय बॉक्स बेपत्ता झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज प्रवाशांतून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ