शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

फलाट रिकामा, तरी लालपरी होई दुसरीकडे उभी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 22:13 IST

नियोजित फलाट रिकामा असताना चालकाने एसटी बस भलत्याच ठिकाणी उभी केल्याने प्रवाशांची एकच धावपळ झाली. शनिवारी वर्धा बसस्थानकावर हा प्रकार घडला. यामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.

ठळक मुद्देवर्धा बसस्थानकावर चालकाचा प्रताप। प्रवाशांचे भागंभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नियोजित फलाट रिकामा असताना चालकाने एसटी बस भलत्याच ठिकाणी उभी केल्याने प्रवाशांची एकच धावपळ झाली. शनिवारी वर्धा बसस्थानकावर हा प्रकार घडला. यामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद अंगीकारलेले परिवहन महामंडळ सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी भंगार बसेस तर कधी चालक-वाहकाचा मनमर्जी कारभार, बसफेऱ्या रद्द करणे. परिवहनच्या वाहकाकडून प्रवाशांना कधीच सौजन्याची वागणूक दिली जात नाही. अनेक ठिकाणी बसचा थांबा असताना चालक वाहकाकडून मनमर्जीने बसला थांबा दिला जात नाही. यामुळे प्रवाशांना दुसºया बसच्या प्रतीक्षेत तासन्तास ताटकळत राहावे लागते.याविषयी नियंत्रकांकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. बसफेºया रद्द होणे, वेळेवर न येणे यामुळे विद्यार्थ्यांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येते.वर्धा बसस्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. ज्या मार्गावरील बसगाड्या जेथे लागतात, तेथे फलकही लावण्यात आले आहे. असे असताना शनिवारी वाहकाकडून बसस्थानकातील यवतमाळचा फलाट रिकामा असताना चालकाने या फलाटावर बस उभी न करता दुसºया मार्गाने जाणाºया गावाच्या फलाटावर उभी केली. यवतमाळकडे जाणारे प्रवासी यवतमाळच्या फलाटावर उभे होते, तर बस नागपूरकडे जाणाºया फलाटावर थांबली. यामुळे अनेक प्रवाशांची धावपळ झाली. यात वयोवृद्ध प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. ग्रामीण प्रवाशांच्या दिमतीला भंगार बसेसच आहेत. असे असले तरी परिवहनची लालपरी अर्थात एसटी बसचा शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आधार आहे. महामंडळ कुठल्याही सुविधा पुरवत नसले तरी ग्रामीणांचा विश्वास आहे. मात्र, चालक-वाहकांकडून या विश्वासाला वेळोवेळी तडा दिला जातो. शनिवारी घडलेल्या प्रकारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मनमर्जीने वागणाºया वाहक-चालकावर कारवाई करण्याची मागणी यावेळी प्रवासीवर्गातून होत आहे.ब्रिदाला हरताळचालक-वाहकांच्या उद्धट कृतीमुळे परिवहन महामंडळाच्या ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रिदाला नेहमीच हरताळ फासला जातो. कॉलन बॉक्सनंतर प्रवाशांना करमणुकीकरिता बसगाड्यांमध्ये मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. अल्पावधीतच या व्यवस्थेचे वाभाडे निघाले. अनेक बसगाडयांमधून वायफाय बॉक्स बेपत्ता झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज प्रवाशांतून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ