शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

सात दिवसांत तालुक्यात १ लाख १७ हजार ७७७ झाडांचे रोपण

By admin | Updated: July 9, 2017 00:41 IST

शासनाची योजना न समजता एक राष्ट्रीय जबाबदारी म्हणून एखादा शासकीय अधिकारी सर्वांना सोबत घेऊन काम करतो,

 २० शाळांचा सहभाग : मागील वर्षीची ८५ टक्के झाडे जिवंत, सामाजिक संस्था, संघटनांचाही सहभाग लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा (घा.) : शासनाची योजना न समजता एक राष्ट्रीय जबाबदारी म्हणून एखादा शासकीय अधिकारी सर्वांना सोबत घेऊन काम करतो, तेव्हा निश्चित योजनेची फलश्रुती होते. याचा प्रत्यय वनविभागाच्या यंदाच्या वृक्षारोपण अभियानातून आला. येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विजय तळणीकर यांची कल्पकता व श्रमाने तालुक्यात सात दिवसांत १ लाख १७ हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी तळणीकर यांनी वन विभागाचे सर्व कर्मचारी, तालुक्यातील २० शाळा, महाविद्यालय व शिक्षक तथा सामाजिक संस्था यांना सोबत घेत १ ते ७ जुलैपर्यंत १ लाख १७ हजार ७७७ झाडे लावून आपले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ४ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत तालुक्याच्या वाट्याला १ लाख ९७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी १ लाख १७ हजार ७७७ रोपे एकट्या वनविभागाला लावावयाची होती. उर्वरित ८० हजार रोपे विविध शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थेने लावायची होती. वन विभागाच्या वाट्याला आलेल्या १ लाख १७ हजार ७७७ रोपांपैकी चिंचोली वन परिसरात ३३ हजार, धावसा क्षेत्रात २७ हजार, नांदोरा वन परिसरात २२ हजार, सिंदीविहिरी परिसरात २७ हजार ५०० व मरकसूर परिसरात ७ हजार ७७७ झाडे तळणीकर यांच्या कल्पकतापूर्ण नियोजनातून १ ते ७ जुलै या कालावधीत लावण्यात आली. सर्वप्रथम वनमजूर व इतर मजुरांकडून योग्य मापाचे खड्डे तयार करून घेण्यात आले. यानंतर प्रत्येक शाळेला विनंती पत्र देत प्रत्येकी ५० ते १०० मुले व शिक्षक मागविण्यात आले. झाडे लावणाऱ्या मुलांची ने -आण करण्याची व्यवस्था करण्यात आली. मॉडेल हायस्कूल, कस्तुरबा शाळा, राजीव गांधी, गुरूकुल कॉन्व्हेंट, सनशाईन स्कूल, इंदिरा कन्या शाळा, या शाळांच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार वन परिसरात जाऊन झाडे लावलीत. आयटीआय व वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही हजेरी लावली. वृक्षारोपणाचा प्रारंभ १ जुलै रोजी सभापती मंगेश खवशी तसेच जि.प. सदस्य सुरेश खवशी, सरिता गाखरे, रोषणा ढोबाळे, शिवसेना तालुका प्रमुख संदीप टिपले यांच्या हस्ते करण्यात आला. मधल्या काळात माजी आमदार दादाराव केचे, विद्यमान आ. अमर काळे यांनाही वृक्षारोपणात सहभागी करून घेण्यात आले. २००० विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेतला. समारोप ७ जुलै रोजी खरसखांडा वनपरिक्षेत्रात झाला. सर्व अधिकाऱ्यांनी या पद्धतीने काम केल्यास राज्य प्रदूषणरहित होण्यास मदत होऊ शकणार आहे. मागील वर्षीची ८५ टक्के झाडे जगली मागील वर्षीही याच अभियानांतर्गत पळसकुंड वन क्षेत्रात ६० हेक्टरमध्ये १ लाख १२ हजार झाडे तळणीकर यांच्या मार्गदर्शनात लावण्यात आली होती. सदर झाडांची देखभाल करण्यासाठी सतत तीन मजूर वर्षभर काम करीत होते. नियमितपणे खते टाकून, निंदण करून, प्राण्यांपासून झाडांचे संरक्षण करण्यात आले. एवढेच नव्हे तर प्रत्येक झाडाखाली सलाईनची रिमाकी बॉटल ठेवून त्याद्वारे पाणी देण्यात आले. परिणामी, मागील वर्षी लावलेल्या झाडांपैकी ८५ टक्के झाडे आजही जिवंत असून सन्मानाने डोलत आहेत. हा वृक्षारोपण मोहिमेतील आदर्श ठरू शकेल.