शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

शेती व्यवसायपूरक औषधी वनस्पतीची लागवड करा

By admin | Updated: December 11, 2015 02:51 IST

औषधी वनस्पतींची शास्त्रीय पद्धतीने लागवड करून आधुनिक शेतीला या व्यवसायाची जोड आता शेतकऱ्यांनी दिली पाहिजे.

शरद निंबाळकर : महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदवर्धा : औषधी वनस्पतींची शास्त्रीय पद्धतीने लागवड करून आधुनिक शेतीला या व्यवसायाची जोड आता शेतकऱ्यांनी दिली पाहिजे. सोबतच संशोधक, विद्यार्थ्यांनी विविध औषधी वनस्पतींचा गुणात्मक दर्जा तपासून त्याचा वापर व्याधींवर कसा करता येईल, या दृष्टीने संशेधन करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी केले. दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ संचालित म.गांधी आयुर्वेद महाविद्यालय, अनुसंधान केंद्राद्वारे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित आहे. औषधी वनस्पतींची लागवड, संरक्षण व संवर्धन विषयावरील परिषदेत ते बोलत होते. यावेळी अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप गोडे, प्रकुलगुरू डॉ. व्ही.के. देशपांडे, विशेष कार्य अधिकारी अभ्यूदय मेघे, अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा, डॉ. प्रीती देसाई, डॉ. प्रसाद, डॉ. खोब्रागडे उपस्थित होते. औषधी वनस्पतींची रोपे देत मान्यवरांचे स्वागत केले गेले. प्रास्ताविक डॉ. खोब्रागडे यांनी केले. डॉ. भुतडा यांनी पारंपरिक वैद्यांची राष्ट्रीय परिषद घेतली जाईल, असे सांगितले. संचालन डॉ. सुप्रिया कल्लीनपूर यांनी केले तर आभार डॉ. शंभरकर यांनी मानले. डेहराडूनच्या वनसंशोधन संस्थेचे डॉ. बिसेन यांनी मार्गदर्शन केले. राज्याच्या विविध विभागांसह गुजरात, पंजाब, कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगढचे संशोधक, अभ्यासक व शेतकरी सहभागी झाले असून परिषदेचा समारोप शुक्रवारी होणार आहे.(कार्यालय प्रतिनिधी)