शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

आता नियोजन खरिपाचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:18 IST

बांधावरच सूर्योदय अन् सूर्यास्त पाहणाऱ्या शेतकऱ्यांपुढे अनेक समस्या असल्याने येणाऱ्या खरीप हंगामात कोणते पीक घेतल्याने आर्थिक सुबत्ता येईल, याकडे लक्ष देऊनच खरिपाचे नियोजन करताना शेतकरी दिसत आहे.

ठळक मुद्देया हंगामात तरी सुबत्तेची शेतकऱ्याला आशा : आर्थिक जुळवाजुळव सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : बांधावरच सूर्योदय अन् सूर्यास्त पाहणाऱ्या शेतकऱ्यांपुढे अनेक समस्या असल्याने येणाऱ्या खरीप हंगामात कोणते पीक घेतल्याने आर्थिक सुबत्ता येईल, याकडे लक्ष देऊनच खरिपाचे नियोजन करताना शेतकरी दिसत आहे.पाच वर्षांच्या काळात शेतकऱ्याला चांगले दिवस येईल, ही आशा फोल ठरल्याने नशिबाला दोष देऊन आपली शेती करून आपले जीवन जगावे, अशी भावना आहे. अवघ्या एक महिन्यावर असलेल्या मृग नक्षत्राकडे लक्ष लागले असल्याने बियाण्यांची निवड, मिळणारे भाव, याचा अंदाज लावला जात आहे कपाशी, सोयाबीन हीे दोन मुख्य पिके खरीप हंगामात घेतली जातात. मागील हंगामाचा विचार पूर्वपेरणी अगोदर केला जात आहे. या हंगामात दोन्ही पिके समसमान राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कापसाला उलंगवाडीनंतर मिळालेला सहा हजारांहून अधिक भाव पुढीलवर्षी असाच राहील का, याचे अनुमान काढून भावाची आशा पाहता कपाशीचा पेरा अधिक होण्याची शक्यता आहे. खरीप अवघ्या एक महिन्यावर असताना जाणवत असलेली भीषण पाणीटंचाई व वेळेवर पाऊस आला नाही तर नियोजन बिघडेल का, अशी शंकाही शेतकरी व्यक्त करीत आहे. बियाणे रासायनिक खते, याची जुळवाजुळव करण्यासाठी आर्थिक तरतूद केली जात असल्याचे दिसून येत आहे. शेताची उन्हाळवाही झाल्याचे चित्र असून वाढत्या तापमानामुळे शेतीचे कामे थांबले आहे. जनावरांचा पाणी, वैरणाचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. कपाशीचा बियाणे, खत, फवारणी व वेचणी हा खर्च पाहता पीक सद्यस्थितीत परवडणारे नसल्याचे शेतकरी सांगतात. सोयाबीनचे अलीकडे घटत असलेले उत्पादन चिंतेचा विषय आहे . वाढत्या खर्चात विजेचे बिल, घरखर्च, मुलांचे शिक्षण व इतर खर्च शेतीतील उत्पन्नातून करावा लागतो. यामुळे शेतकरी सातत्याने कर्जात राहत असल्याची वास्तविकता आहे. या कर्जाच्या विळख्यातून बाहेर निघण्यासाठी शेतकरी विविध प्रयोग करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत असताना संकटाचा सामना करीत हातात आलेले उत्पन्न हेच वर्षभराची जीवन जगण्याची पुंजी असते. रब्बी हंगामावर अवलंबून राहणे आता कठीण झाले आहे. खरिपाचे नियोजन हे पक्के असण्यासाठी शेतकरी आता कामाला लागले असले तरी पेरा कोणत्या पिकाचा जास्त असेल, हे पावसावर अवलंबून राहणार आहे.खरिपावर वर्षभराचा डोलारासेलू तालुक्यात केळी पिकाकडे पाठ फिरविल्यानंतर शेतकऱ्यांचा कापूस पीक घेण्याकडे कल आहे. चांगले उत्पादन घेण्यासाठी महागडा खर्च केला जातो; पण वर्षभराचा खर्च खरिपाच्या पिकावर चालावा, ही अपेक्षा असते.अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना वाढलेले बी-बियाण्यांचे भाव, रासायनिक खतांचा भाव पाहता कपाशी व सोयाबीन मालाचे भाव पेरणीपूर्व जाहीर झाल्यास नियोजन करणे सोपे जाईल, असे शेतकरी बोलत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती