शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

आता नियोजन खरिपाचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:18 IST

बांधावरच सूर्योदय अन् सूर्यास्त पाहणाऱ्या शेतकऱ्यांपुढे अनेक समस्या असल्याने येणाऱ्या खरीप हंगामात कोणते पीक घेतल्याने आर्थिक सुबत्ता येईल, याकडे लक्ष देऊनच खरिपाचे नियोजन करताना शेतकरी दिसत आहे.

ठळक मुद्देया हंगामात तरी सुबत्तेची शेतकऱ्याला आशा : आर्थिक जुळवाजुळव सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : बांधावरच सूर्योदय अन् सूर्यास्त पाहणाऱ्या शेतकऱ्यांपुढे अनेक समस्या असल्याने येणाऱ्या खरीप हंगामात कोणते पीक घेतल्याने आर्थिक सुबत्ता येईल, याकडे लक्ष देऊनच खरिपाचे नियोजन करताना शेतकरी दिसत आहे.पाच वर्षांच्या काळात शेतकऱ्याला चांगले दिवस येईल, ही आशा फोल ठरल्याने नशिबाला दोष देऊन आपली शेती करून आपले जीवन जगावे, अशी भावना आहे. अवघ्या एक महिन्यावर असलेल्या मृग नक्षत्राकडे लक्ष लागले असल्याने बियाण्यांची निवड, मिळणारे भाव, याचा अंदाज लावला जात आहे कपाशी, सोयाबीन हीे दोन मुख्य पिके खरीप हंगामात घेतली जातात. मागील हंगामाचा विचार पूर्वपेरणी अगोदर केला जात आहे. या हंगामात दोन्ही पिके समसमान राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कापसाला उलंगवाडीनंतर मिळालेला सहा हजारांहून अधिक भाव पुढीलवर्षी असाच राहील का, याचे अनुमान काढून भावाची आशा पाहता कपाशीचा पेरा अधिक होण्याची शक्यता आहे. खरीप अवघ्या एक महिन्यावर असताना जाणवत असलेली भीषण पाणीटंचाई व वेळेवर पाऊस आला नाही तर नियोजन बिघडेल का, अशी शंकाही शेतकरी व्यक्त करीत आहे. बियाणे रासायनिक खते, याची जुळवाजुळव करण्यासाठी आर्थिक तरतूद केली जात असल्याचे दिसून येत आहे. शेताची उन्हाळवाही झाल्याचे चित्र असून वाढत्या तापमानामुळे शेतीचे कामे थांबले आहे. जनावरांचा पाणी, वैरणाचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. कपाशीचा बियाणे, खत, फवारणी व वेचणी हा खर्च पाहता पीक सद्यस्थितीत परवडणारे नसल्याचे शेतकरी सांगतात. सोयाबीनचे अलीकडे घटत असलेले उत्पादन चिंतेचा विषय आहे . वाढत्या खर्चात विजेचे बिल, घरखर्च, मुलांचे शिक्षण व इतर खर्च शेतीतील उत्पन्नातून करावा लागतो. यामुळे शेतकरी सातत्याने कर्जात राहत असल्याची वास्तविकता आहे. या कर्जाच्या विळख्यातून बाहेर निघण्यासाठी शेतकरी विविध प्रयोग करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत असताना संकटाचा सामना करीत हातात आलेले उत्पन्न हेच वर्षभराची जीवन जगण्याची पुंजी असते. रब्बी हंगामावर अवलंबून राहणे आता कठीण झाले आहे. खरिपाचे नियोजन हे पक्के असण्यासाठी शेतकरी आता कामाला लागले असले तरी पेरा कोणत्या पिकाचा जास्त असेल, हे पावसावर अवलंबून राहणार आहे.खरिपावर वर्षभराचा डोलारासेलू तालुक्यात केळी पिकाकडे पाठ फिरविल्यानंतर शेतकऱ्यांचा कापूस पीक घेण्याकडे कल आहे. चांगले उत्पादन घेण्यासाठी महागडा खर्च केला जातो; पण वर्षभराचा खर्च खरिपाच्या पिकावर चालावा, ही अपेक्षा असते.अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना वाढलेले बी-बियाण्यांचे भाव, रासायनिक खतांचा भाव पाहता कपाशी व सोयाबीन मालाचे भाव पेरणीपूर्व जाहीर झाल्यास नियोजन करणे सोपे जाईल, असे शेतकरी बोलत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती