शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन करणारेच जीवनात यशस्वी होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:31 IST

जी माणसे जीवनात नियोजन करून जगतात, तीच यशस्वी होतात. नियोजनाशिवाय यश नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या संबंध जीवनात नियोजनाला महत्त्व दिले. महाराजांचा मृत्यू वगळता साऱ्याच गोष्टींचे नियोजन त्यांनी केले.

ठळक मुद्देनितीन बानगुडे पाटील : मेधावी युवा महोत्सवात मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जी माणसे जीवनात नियोजन करून जगतात, तीच यशस्वी होतात. नियोजनाशिवाय यश नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या संबंध जीवनात नियोजनाला महत्त्व दिले. महाराजांचा मृत्यू वगळता साऱ्याच गोष्टींचे नियोजन त्यांनी केले. आज तरूणाईत नियोजनाचा अभाव आहे. या तरूणांना आकाशात झेप घेण्याची भरारी आईवडिलांनी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन लेखक व विचारवंत नितीन बानगुडे पाटील यांनी केले.सारथी बहउद्देशीय संस्था, स्वामी विवेकानंद विचार केंद्र व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने दोन दिवसीय मेधावी भारत युवा महोत्सवाचे आयोजन शहरात करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पहिल्या सत्रात ‘सोड नाराजी घे भरारी‘ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.महोत्सवाचे उद्घाटन शहीद अधिकारी प्रफुल्ल मोहोरकर यांच्या मातोश्री सुधा मोहोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला नगराध्यक्ष अतुल तराळे, महोत्सवाचे आयोजक अविनाश देव, सचिन अग्निहोत्री, सिंदी ड्रायपोर्टचे संचालक प्रशांत बुर्ले, विवेकानंद केंद्राचे वर्धा प्रमुख प्रा. शेषराव बावणकर आदी उपस्थित होते. स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मोहोरकर म्हणाले, भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे. आपण या पावनभूमीत जन्माला आलो, ही भाग्याची गोष्ट आहे.आज देशात अध:पतन मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे रोखण्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे सांगितले. मागील आठ वर्षांपासून शहरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयोजक अविनाश देव यांनी सांगितले. या संस्थेच्या माध्यमातून २ लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली. मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ही कार्यशाळा व्यक्तीच्या दृष्टी बदलण्यासाठी लाभदायक ठरणारी आहे, असे सांगितले.नितीन बानगुडे पाटील म्हणाले , चिंतन विचारातून होते. विचार हे मनातून येतात. माणसाचा पराभव पहिले मनात होतो. त्यानंतर तो रणांगणात होतो. तुमचा पराभव कुणीच रोखू शकत नाही. तुमचे मन ठाम असायला हवे, कुणीही प्रगती प्रगती रोखू शकणार नाही. माणूसच माणसाला घडवितो आणि बिघडवितो. आपला निश्चय पक्का असायला हवा. कष्ट करण्याची तयारी हवी, संधी निर्माण करावी लागते, ती चालून येत नाही. संधी आली, पण ती हुकली असे म्हणण्याची वेळ येऊच देऊ नका. तुमचा दृष्टिकोन कसा आहे, यावर साºया गोष्टी अवलंबून आहे. आत्मविश्वास हा संसर्गजन्य आहे. स्वत:ला मर्यादा घालून जगू नका, बंधन घालून जगू नका, अनुभवातून नवनिर्माण होते. त्यामुळे गरूडझेप घेण्याची तयारी ठेवा, संघर्ष तुमची उंची वाढवितो. कष्टाचे फळ प्रत्येकालाच मिळते. त्यामुळे कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. सातत्य, चिकाटी हे सामर्र्थ्यशाली शस्त्र आहेत. अशा परिस्थितीत अनुभव हा सर्वोत्तम गुरू आहे. यश आणि अपयश यामध्ये भिती उभी असते. तुम्ही कृती केल्यावर विश्वास निर्माण होतो. त्यामुळे कृती करा व स्वत: विषयीचा आत्मविश्वास वाढवा, या साºया बाबी त्यांनी विविध दाखले व उदाहरण देऊन समजावून सांगितल्या. बानगुडे यांचा परिचय सुमित उरकुडकर यांनी करून दिला.कार्यक्रमाचे संचालन प्रेम महिले व मेघा मेश्राम यांनी केले. त्यानंतर दुसºया सत्रात पालकत्व एक कला या विषयावर प्रभू अमोघ लीला यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शहरातील शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.