शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

नियोजन करणारेच जीवनात यशस्वी होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:31 IST

जी माणसे जीवनात नियोजन करून जगतात, तीच यशस्वी होतात. नियोजनाशिवाय यश नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या संबंध जीवनात नियोजनाला महत्त्व दिले. महाराजांचा मृत्यू वगळता साऱ्याच गोष्टींचे नियोजन त्यांनी केले.

ठळक मुद्देनितीन बानगुडे पाटील : मेधावी युवा महोत्सवात मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जी माणसे जीवनात नियोजन करून जगतात, तीच यशस्वी होतात. नियोजनाशिवाय यश नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या संबंध जीवनात नियोजनाला महत्त्व दिले. महाराजांचा मृत्यू वगळता साऱ्याच गोष्टींचे नियोजन त्यांनी केले. आज तरूणाईत नियोजनाचा अभाव आहे. या तरूणांना आकाशात झेप घेण्याची भरारी आईवडिलांनी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन लेखक व विचारवंत नितीन बानगुडे पाटील यांनी केले.सारथी बहउद्देशीय संस्था, स्वामी विवेकानंद विचार केंद्र व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने दोन दिवसीय मेधावी भारत युवा महोत्सवाचे आयोजन शहरात करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पहिल्या सत्रात ‘सोड नाराजी घे भरारी‘ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.महोत्सवाचे उद्घाटन शहीद अधिकारी प्रफुल्ल मोहोरकर यांच्या मातोश्री सुधा मोहोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला नगराध्यक्ष अतुल तराळे, महोत्सवाचे आयोजक अविनाश देव, सचिन अग्निहोत्री, सिंदी ड्रायपोर्टचे संचालक प्रशांत बुर्ले, विवेकानंद केंद्राचे वर्धा प्रमुख प्रा. शेषराव बावणकर आदी उपस्थित होते. स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मोहोरकर म्हणाले, भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे. आपण या पावनभूमीत जन्माला आलो, ही भाग्याची गोष्ट आहे.आज देशात अध:पतन मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे रोखण्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे सांगितले. मागील आठ वर्षांपासून शहरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयोजक अविनाश देव यांनी सांगितले. या संस्थेच्या माध्यमातून २ लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली. मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ही कार्यशाळा व्यक्तीच्या दृष्टी बदलण्यासाठी लाभदायक ठरणारी आहे, असे सांगितले.नितीन बानगुडे पाटील म्हणाले , चिंतन विचारातून होते. विचार हे मनातून येतात. माणसाचा पराभव पहिले मनात होतो. त्यानंतर तो रणांगणात होतो. तुमचा पराभव कुणीच रोखू शकत नाही. तुमचे मन ठाम असायला हवे, कुणीही प्रगती प्रगती रोखू शकणार नाही. माणूसच माणसाला घडवितो आणि बिघडवितो. आपला निश्चय पक्का असायला हवा. कष्ट करण्याची तयारी हवी, संधी निर्माण करावी लागते, ती चालून येत नाही. संधी आली, पण ती हुकली असे म्हणण्याची वेळ येऊच देऊ नका. तुमचा दृष्टिकोन कसा आहे, यावर साºया गोष्टी अवलंबून आहे. आत्मविश्वास हा संसर्गजन्य आहे. स्वत:ला मर्यादा घालून जगू नका, बंधन घालून जगू नका, अनुभवातून नवनिर्माण होते. त्यामुळे गरूडझेप घेण्याची तयारी ठेवा, संघर्ष तुमची उंची वाढवितो. कष्टाचे फळ प्रत्येकालाच मिळते. त्यामुळे कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. सातत्य, चिकाटी हे सामर्र्थ्यशाली शस्त्र आहेत. अशा परिस्थितीत अनुभव हा सर्वोत्तम गुरू आहे. यश आणि अपयश यामध्ये भिती उभी असते. तुम्ही कृती केल्यावर विश्वास निर्माण होतो. त्यामुळे कृती करा व स्वत: विषयीचा आत्मविश्वास वाढवा, या साºया बाबी त्यांनी विविध दाखले व उदाहरण देऊन समजावून सांगितल्या. बानगुडे यांचा परिचय सुमित उरकुडकर यांनी करून दिला.कार्यक्रमाचे संचालन प्रेम महिले व मेघा मेश्राम यांनी केले. त्यानंतर दुसºया सत्रात पालकत्व एक कला या विषयावर प्रभू अमोघ लीला यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शहरातील शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.