शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

देशभरातील यात्रेकरू येणार गांधी आश्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

यात्रेत वेगवेगळ्या २०० ठिकाणावरून निघालेले ६०० कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यात्रेकरूंची व्यवस्था यात्री निवास आणि नयी तालिम समिती परिसरात करण्यात आली आहे. यात्रेतील पदयात्री आश्रमात पोहचल्यावर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, जिल्हा सर्वोदय मंडळ, राष्ट्र सेवादल यांच्यावतीने सूतमाळेने स्वागत करण्यात येईल. सर्व यात्रेकरू सायंकाळी प्रार्थनेत सहभागी होतील. यात्री निवास परिसरात यात्रेकरूंचे अनुभव कथन होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देविनोबांची जयंती : गुरूवारी पाहुणे पवनारला जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : यंदा आचार्य विनोबा भावे यांचे १२५ जयंती वर्ष साजरे होणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी त्यांच्या जन्मदिनी मित्र मिलनचे पवनार येथे आयोजन करण्यात आले आहे. देशभरात या निमित्ताने विचार, कार्याचा प्रचार व प्रसार व्हावा या साठी सर्वोदयींनी यात्रा काढली आहे. यात्रा बुधवारी १३ रोजी सायंकाळी सेवाग्राम आश्रमात पोहचणार आहे.या यात्रेत वेगवेगळ्या २०० ठिकाणावरून निघालेले ६०० कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यात्रेकरूंची व्यवस्था यात्री निवास आणि नयी तालिम समिती परिसरात करण्यात आली आहे. यात्रेतील पदयात्री आश्रमात पोहचल्यावर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, जिल्हा सर्वोदय मंडळ, राष्ट्र सेवादल यांच्यावतीने सूतमाळेने स्वागत करण्यात येईल. सर्व यात्रेकरू सायंकाळी प्रार्थनेत सहभागी होतील. यात्री निवास परिसरात यात्रेकरूंचे अनुभव कथन होणार असल्याची माहिती मिळाली आहे. गुरूवारी सकाळी आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू यात्रेला हिरवी झेंडी दाखवून यात्रा पवनार दिशेने रवाना होईल.सिंधूदुर्ग येथून येणार यात्रासिंधूदुर्ग जिल्ह्यातील गोपूरी आश्रमातून संवाद यात्रा निघाली आहे. हे वर्ष महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण जयंती, आचार्य विनोबा भावे,कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन शतकोत्तर रजत जयंती आणि प्रकाश मोहाडीकर जन्मशताब्दी संयुक्त अभियान अंतर्गत संवाद यात्रा काढलेली आहे. सदर यात्रा १४ रोजी वर्धेत पोहचणार असून १५ रोजी पवनार येथील ब्रम्ह विद्या मंदिरात या यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून लोकसंवाद घालण्यात येणार आहे.देशभरातून यात्रेकरू सेवाग्राम आश्रमात येणार आहे. त्यांचे स्वागत आणि मनोगताचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. १५ ते १७ पर्यंत पवनार येथे विनोबाजींच्या जन्मदिनानिमित्य विनोबा मित्र मिलन कार्यक्रम होणार आहे.सर्व यात्रेकरू त्यात सहभागी होतील. सेवाग्राम येथूनच ते पवनार येथे जातील.- टी.आर.एन.प्रभू,अध्यक्ष सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सर्वोदयी येत आहे. बा,बापू आणि बाबांना मानणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याने जिल्ह्यात त्यांचे स्वागत आहे.- मोहन खैरकार, अध्यक्ष जिल्हा सर्वोदय मंडळ.