शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

पुलगाव बॅरेज पूर्ण झाल्यास सुटेल पाणीप्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 21:19 IST

निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने पुलगाव जवळ वर्धा नदीचे पाणी साठवून ठेवण्यासाठी वर्धा नदीवर बॅरेज बांधून या भागातील पाणी समस्या कायमची सोडविण्याच्या दृष्टीने मे २०१० पासून पुलगाव बॅरेजचे काम सुरू आहे. आज जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले असून केवळ १० टक्के बांधकाम शिल्लक असून येत्या काही महिन्यात तेही पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनदीकाठच्या १३ गावांना मिळणार दिलासा : ३ हजार २३६ हेक्टर क्षेत्र येईल ओलिताखाली

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने पुलगाव जवळ वर्धा नदीचे पाणी साठवून ठेवण्यासाठी वर्धा नदीवर बॅरेज बांधून या भागातील पाणी समस्या कायमची सोडविण्याच्या दृष्टीने मे २०१० पासून पुलगाव बॅरेजचे काम सुरू आहे. आज जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले असून केवळ १० टक्के बांधकाम शिल्लक असून येत्या काही महिन्यात तेही पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या बॅरेजचे काम पूर्ण झाल्यास नदीकाठच्या १३ गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार असल्याचे चित्र दिसत आहे.तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आॅक्टोबर २००९ मध्ये या ९६ कोटींच्या पुलगाव बॅरेजचे प्रतीकात्मक भूमिपूजन केले होते. मात्र प्रत्यक्ष बांधकाम मे २०१० मध्ये सुरू होऊन तीन-चार वर्षांत या बॅरेजचे बांधकाम पूर्ण होईल, असे अपेक्षीत होते. परंतु शासनाच्या लालफीतशाहीत व संबंधित कंत्राटदार कंपनीला केलेल्या कामाचे बिल न मिळाल्यामुळे काही काळ हे काम रखडले. ९६ कोटींचा पुलगाव बॅरेज तीनशे कोटीवर पोहोचला. पुढे सत्ता परिवर्तन झाल्यामुळे कामाची गती मंदावली. अखेर केंद्रशासनाने निम्न वर्धा प्रकल्पाचे काम हाती घेतले. आज हे काम जवळपास पूर्णत्वास गेले असून केवळ १० टक्के बांधकाम होणे आहे.या पुलगाव बॅरेजची एकूण क्षमता १०.८० द.ल.घ.मी असून उपयुक्त साठा ९.८४ द.ल.घ.मी. एवढा आहे. या बॅरेजची लांबी २२५ मीटर असून १४.१७ मीटर उंची, ६.५० मीटर रूंदी आहे. यात ६५० मीटर पाणी राहणार आहे. तर १०.८० द.ल.घ.मी. पाणी साठविण्याची क्षमता राहणार आहे. अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी १० बाय ६ फुटांचे १५ दरवाजे आहेत.बॅरेजचे काम पूर्ण झाल्यावर पुलगाव शहरासह केंद्रीय दारूगोळा भांडार व परिसरातील पिंपरी, पारगोठाण, धनोडी, रोहणा, विरूळ, सोरटा, रसुलाबाद, मार्डा, गुंजखेडा, नाचणगाव, कवठा, मलकापूर इत्यादी गावांची पाणी समस्या कायमची सुटणार आहे. याशिवाय या बॅरेजमधून अतिरिक्त ३२३६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असल्याचे शेतीही ओलिताखाली येणार आहे.वाळूअभावी काम रेंगाळलेकेवळ १० टक्के बांधकाम बाकी असून तेही काम रेती अभावी रेंगाळल्याची चर्चा आहे. या नदीच्या रेती घाटावरून शेकडो ट्रक रेतीचा अवैध उपसा होत असून कित्येक ट्रक रेती जप्त करण्यात आली आहे. शासनाने या बॅरेजच्या कामासाठी रेती उपलब्ध करून दिल्यास बॅरेजचे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदीwater shortageपाणीटंचाई