शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पुलगाव बॅरेज पूर्ण झाल्यास सुटेल पाणीप्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 21:19 IST

निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने पुलगाव जवळ वर्धा नदीचे पाणी साठवून ठेवण्यासाठी वर्धा नदीवर बॅरेज बांधून या भागातील पाणी समस्या कायमची सोडविण्याच्या दृष्टीने मे २०१० पासून पुलगाव बॅरेजचे काम सुरू आहे. आज जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले असून केवळ १० टक्के बांधकाम शिल्लक असून येत्या काही महिन्यात तेही पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनदीकाठच्या १३ गावांना मिळणार दिलासा : ३ हजार २३६ हेक्टर क्षेत्र येईल ओलिताखाली

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने पुलगाव जवळ वर्धा नदीचे पाणी साठवून ठेवण्यासाठी वर्धा नदीवर बॅरेज बांधून या भागातील पाणी समस्या कायमची सोडविण्याच्या दृष्टीने मे २०१० पासून पुलगाव बॅरेजचे काम सुरू आहे. आज जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले असून केवळ १० टक्के बांधकाम शिल्लक असून येत्या काही महिन्यात तेही पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या बॅरेजचे काम पूर्ण झाल्यास नदीकाठच्या १३ गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार असल्याचे चित्र दिसत आहे.तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आॅक्टोबर २००९ मध्ये या ९६ कोटींच्या पुलगाव बॅरेजचे प्रतीकात्मक भूमिपूजन केले होते. मात्र प्रत्यक्ष बांधकाम मे २०१० मध्ये सुरू होऊन तीन-चार वर्षांत या बॅरेजचे बांधकाम पूर्ण होईल, असे अपेक्षीत होते. परंतु शासनाच्या लालफीतशाहीत व संबंधित कंत्राटदार कंपनीला केलेल्या कामाचे बिल न मिळाल्यामुळे काही काळ हे काम रखडले. ९६ कोटींचा पुलगाव बॅरेज तीनशे कोटीवर पोहोचला. पुढे सत्ता परिवर्तन झाल्यामुळे कामाची गती मंदावली. अखेर केंद्रशासनाने निम्न वर्धा प्रकल्पाचे काम हाती घेतले. आज हे काम जवळपास पूर्णत्वास गेले असून केवळ १० टक्के बांधकाम होणे आहे.या पुलगाव बॅरेजची एकूण क्षमता १०.८० द.ल.घ.मी असून उपयुक्त साठा ९.८४ द.ल.घ.मी. एवढा आहे. या बॅरेजची लांबी २२५ मीटर असून १४.१७ मीटर उंची, ६.५० मीटर रूंदी आहे. यात ६५० मीटर पाणी राहणार आहे. तर १०.८० द.ल.घ.मी. पाणी साठविण्याची क्षमता राहणार आहे. अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी १० बाय ६ फुटांचे १५ दरवाजे आहेत.बॅरेजचे काम पूर्ण झाल्यावर पुलगाव शहरासह केंद्रीय दारूगोळा भांडार व परिसरातील पिंपरी, पारगोठाण, धनोडी, रोहणा, विरूळ, सोरटा, रसुलाबाद, मार्डा, गुंजखेडा, नाचणगाव, कवठा, मलकापूर इत्यादी गावांची पाणी समस्या कायमची सुटणार आहे. याशिवाय या बॅरेजमधून अतिरिक्त ३२३६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असल्याचे शेतीही ओलिताखाली येणार आहे.वाळूअभावी काम रेंगाळलेकेवळ १० टक्के बांधकाम बाकी असून तेही काम रेती अभावी रेंगाळल्याची चर्चा आहे. या नदीच्या रेती घाटावरून शेकडो ट्रक रेतीचा अवैध उपसा होत असून कित्येक ट्रक रेती जप्त करण्यात आली आहे. शासनाने या बॅरेजच्या कामासाठी रेती उपलब्ध करून दिल्यास बॅरेजचे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदीwater shortageपाणीटंचाई