शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पुलगाव बॅरेज पूर्ण झाल्यास सुटेल पाणीप्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 21:19 IST

निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने पुलगाव जवळ वर्धा नदीचे पाणी साठवून ठेवण्यासाठी वर्धा नदीवर बॅरेज बांधून या भागातील पाणी समस्या कायमची सोडविण्याच्या दृष्टीने मे २०१० पासून पुलगाव बॅरेजचे काम सुरू आहे. आज जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले असून केवळ १० टक्के बांधकाम शिल्लक असून येत्या काही महिन्यात तेही पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनदीकाठच्या १३ गावांना मिळणार दिलासा : ३ हजार २३६ हेक्टर क्षेत्र येईल ओलिताखाली

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने पुलगाव जवळ वर्धा नदीचे पाणी साठवून ठेवण्यासाठी वर्धा नदीवर बॅरेज बांधून या भागातील पाणी समस्या कायमची सोडविण्याच्या दृष्टीने मे २०१० पासून पुलगाव बॅरेजचे काम सुरू आहे. आज जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले असून केवळ १० टक्के बांधकाम शिल्लक असून येत्या काही महिन्यात तेही पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या बॅरेजचे काम पूर्ण झाल्यास नदीकाठच्या १३ गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार असल्याचे चित्र दिसत आहे.तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आॅक्टोबर २००९ मध्ये या ९६ कोटींच्या पुलगाव बॅरेजचे प्रतीकात्मक भूमिपूजन केले होते. मात्र प्रत्यक्ष बांधकाम मे २०१० मध्ये सुरू होऊन तीन-चार वर्षांत या बॅरेजचे बांधकाम पूर्ण होईल, असे अपेक्षीत होते. परंतु शासनाच्या लालफीतशाहीत व संबंधित कंत्राटदार कंपनीला केलेल्या कामाचे बिल न मिळाल्यामुळे काही काळ हे काम रखडले. ९६ कोटींचा पुलगाव बॅरेज तीनशे कोटीवर पोहोचला. पुढे सत्ता परिवर्तन झाल्यामुळे कामाची गती मंदावली. अखेर केंद्रशासनाने निम्न वर्धा प्रकल्पाचे काम हाती घेतले. आज हे काम जवळपास पूर्णत्वास गेले असून केवळ १० टक्के बांधकाम होणे आहे.या पुलगाव बॅरेजची एकूण क्षमता १०.८० द.ल.घ.मी असून उपयुक्त साठा ९.८४ द.ल.घ.मी. एवढा आहे. या बॅरेजची लांबी २२५ मीटर असून १४.१७ मीटर उंची, ६.५० मीटर रूंदी आहे. यात ६५० मीटर पाणी राहणार आहे. तर १०.८० द.ल.घ.मी. पाणी साठविण्याची क्षमता राहणार आहे. अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी १० बाय ६ फुटांचे १५ दरवाजे आहेत.बॅरेजचे काम पूर्ण झाल्यावर पुलगाव शहरासह केंद्रीय दारूगोळा भांडार व परिसरातील पिंपरी, पारगोठाण, धनोडी, रोहणा, विरूळ, सोरटा, रसुलाबाद, मार्डा, गुंजखेडा, नाचणगाव, कवठा, मलकापूर इत्यादी गावांची पाणी समस्या कायमची सुटणार आहे. याशिवाय या बॅरेजमधून अतिरिक्त ३२३६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असल्याचे शेतीही ओलिताखाली येणार आहे.वाळूअभावी काम रेंगाळलेकेवळ १० टक्के बांधकाम बाकी असून तेही काम रेती अभावी रेंगाळल्याची चर्चा आहे. या नदीच्या रेती घाटावरून शेकडो ट्रक रेतीचा अवैध उपसा होत असून कित्येक ट्रक रेती जप्त करण्यात आली आहे. शासनाने या बॅरेजच्या कामासाठी रेती उपलब्ध करून दिल्यास बॅरेजचे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदीwater shortageपाणीटंचाई