शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

पिपरीत तीन दिवस राहणार ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 05:00 IST

विवाहानंतर परिसराला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, ५ जुलैला त्याला त्रास व्हायला लागल्याने प्रथम कारला चौकातील एका खासगी रुग्णालयात दाखविण्यात आले. त्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करुन त्याचे स्वॅब तपासणीकरिता पाठविले. आज बुधवारी त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रशासनाने पिपरी परिसरात धाव घेऊन विवाह काळापासूनचा इतिहास जाणून घेतला.

ठळक मुद्देउपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश : नवरदेवाने वाढविल्या नातेवाईकांसह मित्रमंडळींच्या अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या पिपरी (मेघे) परिसरात विवाहानंतर गृह विलगीकरणात असलेला नवरदेव बुधवारी सकाळी कोरोनाबाधित आढळून आला आहे. प्रवासाचा कोणताही इतिहास नसणारा व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने ‘अ‍ॅक्शन मोड’ वर उपायायोजना राबवायला सुरुवात केली. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला असता हायरिक्समध्ये असणाऱ्यांची संख्या बरीच असल्यामुळे पिपरी (मेघे) ग्रामपंचायतचा परिसरात बुधवारपासून शुक्रवारपर्यंत तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हा प्रशासनाकडून विवाहाकरिता शर्ती व अटींच्या अधीन राहून परवानगी दिली जाते. पण, परवानगीधारक नियमांचे उल्लघन करित असल्याने पिपरीतील प्रकारावरुन प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. पिपरीच्या वॉर्ड क्रमांक ४ मधील युवकाचा ३० जूनला वर्ध्यातच विवाह झाला.विवाहानंतर परिसराला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, ५ जुलैला त्याला त्रास व्हायला लागल्याने प्रथम कारला चौकातील एका खासगी रुग्णालयात दाखविण्यात आले. त्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करुन त्याचे स्वॅब तपासणीकरिता पाठविले. आज बुधवारी त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रशासनाने पिपरी परिसरात धाव घेऊन विवाह काळापासूनचा इतिहास जाणून घेतला. त्यांच्या या विवाहाकरिता अमरावती या कोरोनाबाधित जिल्ह्यातून २९ जूनला नातेवाईक आले होते. विवाह सोहळ्याची फोटोग्राफी व व्हिडिओ शुटींग करणारे व्यक्तीही अमरावतीचे होते.विशेषत: कोणतीही परवानगी न घेता वरमंडपी तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हळदीच्या व सत्यनारायणाच्या कार्यक्रमालाही २५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आले होते. इतकेच नाही तर विवाहाच्या तीन दिवसापूर्वी केलेल्या कंदुरीच्या कार्यक्रमाला वर्धा, पिपरी परिसरातील मित्र मंडळी, नातेवाईक असे दोनशेच्या आसपास व्यक्ती उपस्थित होते, अशी माहिती आरोग्य विभाग व पोलिसांच्या चौकशीत पुढे आली आहे. त्यामुळे प्रशासनाने त्या सर्व व्यक्तींचा शोध सुरु केला आहे. हाय रिक्समध्ये ३० ते ३५ तर लो रिक्समध्ये ७० ते ८० व्यक्ती येण्याची शक्यता असून त्यांचा आरोग्य विभाग शोध घेत आहे. हायरिक्समधील २५ व्यक्तींना आयसोलशनमध्ये दाखल करण्यात आले असून त्या सर्वाचे स्वॅब तपासणीकरिता पाठविले जाणार आहेत.शुक्रवारपर्यंत पिपरी ग्रामपंचायतीचा संपूर्ण परिसर बंद राहणार असून अत्यावश्यक सेवा आणि औषधींची दुकानेच सुरु राहणार असल्याचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्वाती ईसाये व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिघिकर उपस्थित होत्या.पहिल्यांदाच एका रुग्णांसाठी दोन कंटेन्मेंट झोनवॉर्ड क्रमांक ४ मधील शिवरामवाडीत राहणाºया ३३ वर्षीय युवकाचा लगतच्याच वॉर्ड क्रमांक ५ मधील नंदनवननगरातील मुलीशी विवाह झाला. त्यांचा विवाहसोहळा पिपरीतील सभागृहामध्ये झाला. तसेच तो परिसरातीलच खासगी रुग्णालयात गेला होता. त्यामुळे सर्व प्रकार हा एकाच परिसरात घडल्याने प्रशासनाने शिवरामवाडी आणि नंदनवन नगरातील परिसर कंटेन्मेट झोनमध्ये टाकला आहे.मंगल कार्यालयाच्या संचालकावरही कारवाईमंगलकार्यालयाच्या संचालकांना नियम व अटींच्या अधीन राहून ५० व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह सोहळे आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. तसेच सोशल डिस्टंन्सिंग, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही मंगल कार्यालय संचालकांवर निश्चित केली आहे. पण, वैदिक विवाह मंडळाच्या सभागृहात या विवाह सोहळ्याला ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्याने दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.आप्तस्वकीयांवरही कारवाईची टांगती तलवारवर-वधूकडे हळदीचा, सत्यनारायणाचा तसेच कंदुरी सारखे कार्यक्रम विनापरवानगी करुन मोठ्या प्रमाणात व्यक्ती एकत्र जमत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. याही विवाह सोहळ्याला कोरोनाबाधित जिल्ह्यातील नातेवाईकांसह वर्धा शहर आणि आजुबाजूच्या परिसरातील मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले होते. त्यामुळे त्यांचाही शोध सुरु केला असून त्या सर्वांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.आता विवाह करणे सोपे नाही...पूर्वी विवाहाच्या परवानगीकरिता परिवारातील पाच ते सहा सदस्यांचे आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र जोडले की परवानगी मिळायची. मात्र, आता पन्नास व्यक्तींची नावे, त्यांचे आधार कार्ड तसेच त्या सर्वांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडल्यानंतरच परवानगी मिळणार आहे. त्यामुळे आता पिपरीतील नवरदेवामुळे अनेक विवाहोत्सुकांच्या आता अडचणी वाढणार आहे.विवाहाला जाल तर क्वारंटाईन व्हालजिल्ह्यातील व्यक्तीचा विवाह बाहेर जिल्ह्यातील व्यक्तीसोबत झाला. आणि वधू-वरासह वºहाडी आपल्या जिल्ह्यात परत आले तर त्यांना १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. सोबतच आपल्या जिल्ह्यात आल्यानंतर आयोजित कार्यक्रमालाही सहभागी होणाºया व्यक्तींना क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यामुळे आता विवाहासह इतर कार्यक्रमांनाही सहभागी होत असतांना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.विवाहस्थळी राहणार पथकप्रशासनाकडून परवानगी घेत प्रत्यक्ष विवाहस्थळी उपस्थिती मोठ्या प्रमाणात राहतात. हे प्रशासनाच्या लक्षात आल्याने अशांवर वचक निर्माण करुन कोरोनाचा प्रकोप टाळण्यासाठी आता विवाह मंडपी प्रशासनाकडून तीन व्यक्तीचे पथक तैनात केले जाणार आहे. यामध्ये नगरपालिका, ग्रामपंचायत, महसूल विभाग, पोलीस विभाग व आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांचा समावेश असणार आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या