शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

जन औषधीपेक्षा जन कृषिसेवा केंद्र आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:58 IST

पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी हा व्यवहारक्रम होता; पण आज शेती हा कायम तोट्याचा व्यवसाय झाला आहे.

ठळक मुद्देशैलेश अग्रवाल : पवनार येथे शेतकरी मेळावा

आॅनलाईन लोकमतपवनार : पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी हा व्यवहारक्रम होता; पण आज शेती हा कायम तोट्याचा व्यवसाय झाला आहे. हा व्यवहारक्रम उलटून उत्तम नोकरी, मध्यम व्यापार व कनिष्ठ शेती झाला. रुग्णांसाठी स्वस्त औषधी केंद्रापेक्षाही गरजेचे स्वस्त दरात सेंद्रिय औषधी व विना जणुकांतरीत बियाणे मिळणारे जन कृषिसेवा केंद्र उभारून शेतकºयांना कृषि सेवा केंद्रांमार्फत होणाºया मोठ्या खर्चातून वाचविणे गरजेचे आहे, असे मत शेतकरी आरक्षणचे शैलेश अग्रवाल यांनी व्यक्त केले.पवनार येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी खासदार अनंत गुढे, उपजिल्हाप्रमुख राजेश सराफ, प्रा.डॉ. नारायण निकम व अन्य सेना पदाधिकारी उपस्थित होते. अग्रवाल पूढे म्हणाले की, जन कृषिसेवा केंद्रांतून शेतीतील रसायन हद्दपार करून स्वास्थ्यहानीला आळा घालणे शक्य आहे. शेती व दुग्ध व्यवसायात थेट उत्पादक ते ग्राहक हीच व्यवहार पद्धती टिकवून ठेवण्याची गरज होती. त्यात शेतकºयांना त्यांच्या मालाचे भाव ठरविण्याचा अधिकार अबाधित ठेवून स्वबळावर प्रगती करता आली असती. कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेद्वारे शासनाने व्यापाºयांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवून शेतकºयांचा तोटा वाढविला आहे. यावर मलमपट्टी म्हणून हमीभावाचे धोरण आखण्यात आले. हमीभावाची उपयोगीता व अमलबजावणी सर्वश्रूत आहे. यामुळे कधी गर्भश्रीमंत शेतकरी आज हवालदिल झाला, असे सांगितले. याप्रसंगी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. मेळाव्याला शेतकरी उपस्थित होते.