शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी समर्थ नगरीतील नागरिकांची रस्त्यासाठी तगमग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:55 IST

येथील धुनिवाले मठ ते आर्वी नाका रस्त्याचे रूंदीकरण आणि सिमेंटीकरण सुरू आहे. यात बहुतांश जोड रस्ते बंद पडले होते. आता रस्त्याचे काम पूर्णत्त्वास येत असल्याने हे रस्ते जोडण्यात येत आहे. मात्र श्री स्वामी समर्थ नगरीकडे जाणारा रस्ता अद्याप अपूर्ण आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही बगल : एका घराकरिता इतरांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील धुनिवाले मठ ते आर्वी नाका रस्त्याचे रूंदीकरण आणि सिमेंटीकरण सुरू आहे. यात बहुतांश जोड रस्ते बंद पडले होते. आता रस्त्याचे काम पूर्णत्त्वास येत असल्याने हे रस्ते जोडण्यात येत आहे. मात्र श्री स्वामी समर्थ नगरीकडे जाणारा रस्ता अद्याप अपूर्ण आहे. या रस्त्यावर मुरारका नामक व्यक्ती रस्ता होवू देत नसल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. हा रस्ता नसल्याने नागरिकांना सुमारे अर्धा किलोमिटरचा फेरा पडतो आहे.ही समस्या लक्षात घेवून येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांचीही भेट घेतली. त्यांनी रस्त्याचे काम नियमानुसार करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला केल्या आहेत. त्यांच्या सूचनांना बांधकाम विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आल्याचा आरोपही निवेदन देणाऱ्यांनी केला आहे. रस्त्याचे काम करणाºया कंत्राटदाराला तशा सूचना केल्या असून त्यांच्याकडूनही हा रस्ता झाला नाही. यामुळे या भागातील नागरिकांच्या समस्येत वाढ होत असून याकडे लक्ष देण्याची मागणी येथील महेंद्र खडसे, रमेश गोळे, संजय जानोतकर, शेखर जानोतकर, आकाश बल्लमवार, महेश शिरभाते, संजयसिंह मोरे, यशवंत देशपांडे यांनी केली आहे. ही समस्या मार्गी काढण्याकरिता यापूर्वीही या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकाºयांना साकडे घातले होते. यावेळी अधिकाºयांकडून पाहणी करण्यात आली; मात्र काहीच मार्ग काढण्यात आला नसल्याने नागरिकांची समस्या आजही कायम आहे.