शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीत मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
2
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
3
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
4
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
5
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
6
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
7
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
8
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
9
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
10
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
11
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
12
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
13
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
14
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
15
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
16
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
17
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
18
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
19
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
20
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

नदी पात्रातून होते ग्रामस्थांची ये-जा

By admin | Updated: June 13, 2015 02:14 IST

ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी विविध योजना आखल्या जातात; पण त्या कागदावरच राहतात.

नांद्रा-आष्टावासीयांची व्यथा : बोर नदीवर पुलाची प्रतीक्षा कधी संपणारसेवाग्राम : ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी विविध योजना आखल्या जातात; पण त्या कागदावरच राहतात. नदीच्या पात्रातून ग्रामस्थांना प्रवास करावा लागल्यावर या बाबीचा प्रत्यय येतो. गत कित्येक वर्षांपासून लगतच्या आष्टा, नांद्रा या गावांतील नागरिकांना बोर नदीच्या पात्रातून ये-जा करावी लागत आहे. पावसाळ्यात दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. बोर नदीवर पुलाचे बांधकाम करून ही समस्या सोडविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली; पण त्याकडेही दुर्लक्षच केले जात असल्याचे दिसते. हमदापूरपासून चार किमी अंतरावर आष्टा व नांद्रा ही दोन गावे आहे. या दोन गावाच्या मधून बोर नदी वाहते. नदीच्या काठावर गावे वसली असून जमीनही सुपिक आहे; पण लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे दोन्ही गावांना पावसाळ्यात मरणयातना सहन कराव्या लागतात. यात सर्वाधिक कष्ट नांद्रा येथील नागरिकांना सोसावे लागत आहे. नदीवर रपटा असून पावसाळ्यात त्यावरून पाणी वाहत असते. यामुळे त्या रपट्याचा उपयोग होत नाही. नदीवरील आष्टा गावाकडे असलेला रपटा पूर्णत: फुटला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर दुरूस्ती केली जात आहे; पण कायम तोडगा काढण्याकडे दुर्लक्षच केले जात असल्याचे दिसते. पूर्वी हिवाळा, उन्हाळ्यात आष्टा गावापर्यंत बस पोहोचत होत्या; पण रपटा फुटल्याने त्याही बंद झाल्या आहेत. दोन्ही गावांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हमदापूर येथे जावे लागते; पण बसेस व अन्य वाहने उपलब्ध होत नसल्याने त्रास सहन करावा लागतो. तास दोन तास पाऊस झाला तरी नदीचे पात्र वाहते होते. यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. अनेकदा नातलगांकडे राहण्याशिवाय पर्याय नसतो. अनेक वर्षांपासून ग्रामस्थ पुलाची मागणी करीत आहे; पण अद्यापही त्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. ग्रामीण भागात रस्त्यांनी शहरांशी जोडला जात असताना पुलांच्या बांधकामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नदीच्या पात्रातून केवळ रपटा बांधून ग्रामस्थांना नदी पात्रातून प्रवास करण्यास प्रशासन बाध्य करीत असल्याचे दिसते. या असुविधांमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. जिल्हा प्रशासनासह संबधित विभागाने याकडे लक्ष देत आष्टा, नांद्रा या गावाची पुलाची मागणी निकाली काढावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)ग्रामपंचायतींचे ठराव देऊनही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षबोर नदीवर पुलाचे बांधकाम करून ग्रामस्थांना रहदारीचा मार्ग मोकळा करून द्यावा, अशा मागणीचे ठराव आष्टा आणि नांद्रा ग्रामपंचयातींनी लोकप्रतिनिधींना सादर केले होते. शिवाय पूल बांधकामाचा प्रस्तावही ग्रामपंचायतीद्वारे सादर करण्यात आला होता; पण अद्यापही त्या मागणीकडे लक्ष देण्यात आले नाही. पुन्हा पावसाळा सुरू झाल्याने नदीच्या काठावर वसलेल्या दोन्ही गावांतील ग्रामस्थांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्याचा धोका तर आहेच; पण पावसाळ्यात रहदारीही धोक्यात येत असल्याने शेतीची तसेच अन्य कामे खोळंबतात. दरवर्षी घडणाऱ्या या प्रकारामुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.केवळ लोकप्रतिनिधीच नव्हे तर ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनालाही अनेकदा निवेदने दिली; पण अद्याप बोर नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आलेले नाही. सध्या रपट्याची दुरवस्था झाल्याने आष्टा गावापर्यंतच्या बसेसही बंद आहेत. याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.