शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

नदी पात्रातून होते ग्रामस्थांची ये-जा

By admin | Updated: June 13, 2015 02:14 IST

ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी विविध योजना आखल्या जातात; पण त्या कागदावरच राहतात.

नांद्रा-आष्टावासीयांची व्यथा : बोर नदीवर पुलाची प्रतीक्षा कधी संपणारसेवाग्राम : ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी विविध योजना आखल्या जातात; पण त्या कागदावरच राहतात. नदीच्या पात्रातून ग्रामस्थांना प्रवास करावा लागल्यावर या बाबीचा प्रत्यय येतो. गत कित्येक वर्षांपासून लगतच्या आष्टा, नांद्रा या गावांतील नागरिकांना बोर नदीच्या पात्रातून ये-जा करावी लागत आहे. पावसाळ्यात दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. बोर नदीवर पुलाचे बांधकाम करून ही समस्या सोडविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली; पण त्याकडेही दुर्लक्षच केले जात असल्याचे दिसते. हमदापूरपासून चार किमी अंतरावर आष्टा व नांद्रा ही दोन गावे आहे. या दोन गावाच्या मधून बोर नदी वाहते. नदीच्या काठावर गावे वसली असून जमीनही सुपिक आहे; पण लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे दोन्ही गावांना पावसाळ्यात मरणयातना सहन कराव्या लागतात. यात सर्वाधिक कष्ट नांद्रा येथील नागरिकांना सोसावे लागत आहे. नदीवर रपटा असून पावसाळ्यात त्यावरून पाणी वाहत असते. यामुळे त्या रपट्याचा उपयोग होत नाही. नदीवरील आष्टा गावाकडे असलेला रपटा पूर्णत: फुटला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर दुरूस्ती केली जात आहे; पण कायम तोडगा काढण्याकडे दुर्लक्षच केले जात असल्याचे दिसते. पूर्वी हिवाळा, उन्हाळ्यात आष्टा गावापर्यंत बस पोहोचत होत्या; पण रपटा फुटल्याने त्याही बंद झाल्या आहेत. दोन्ही गावांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हमदापूर येथे जावे लागते; पण बसेस व अन्य वाहने उपलब्ध होत नसल्याने त्रास सहन करावा लागतो. तास दोन तास पाऊस झाला तरी नदीचे पात्र वाहते होते. यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. अनेकदा नातलगांकडे राहण्याशिवाय पर्याय नसतो. अनेक वर्षांपासून ग्रामस्थ पुलाची मागणी करीत आहे; पण अद्यापही त्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. ग्रामीण भागात रस्त्यांनी शहरांशी जोडला जात असताना पुलांच्या बांधकामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नदीच्या पात्रातून केवळ रपटा बांधून ग्रामस्थांना नदी पात्रातून प्रवास करण्यास प्रशासन बाध्य करीत असल्याचे दिसते. या असुविधांमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. जिल्हा प्रशासनासह संबधित विभागाने याकडे लक्ष देत आष्टा, नांद्रा या गावाची पुलाची मागणी निकाली काढावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)ग्रामपंचायतींचे ठराव देऊनही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षबोर नदीवर पुलाचे बांधकाम करून ग्रामस्थांना रहदारीचा मार्ग मोकळा करून द्यावा, अशा मागणीचे ठराव आष्टा आणि नांद्रा ग्रामपंचयातींनी लोकप्रतिनिधींना सादर केले होते. शिवाय पूल बांधकामाचा प्रस्तावही ग्रामपंचायतीद्वारे सादर करण्यात आला होता; पण अद्यापही त्या मागणीकडे लक्ष देण्यात आले नाही. पुन्हा पावसाळा सुरू झाल्याने नदीच्या काठावर वसलेल्या दोन्ही गावांतील ग्रामस्थांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्याचा धोका तर आहेच; पण पावसाळ्यात रहदारीही धोक्यात येत असल्याने शेतीची तसेच अन्य कामे खोळंबतात. दरवर्षी घडणाऱ्या या प्रकारामुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.केवळ लोकप्रतिनिधीच नव्हे तर ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनालाही अनेकदा निवेदने दिली; पण अद्याप बोर नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आलेले नाही. सध्या रपट्याची दुरवस्था झाल्याने आष्टा गावापर्यंतच्या बसेसही बंद आहेत. याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.